शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

औरंगाबादच्या कचऱ्यापासून पिशोर येथे खतनिर्मितीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:32 IST

औरंगाबाद येथून पिशोर येथे हिराजी महाराज कारखान्याच्या आवारात आणून टाकलेल्या कचºयापासून खत तयार झाले असून आ. हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला शब्द पाळत आपल्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिशोर : औरंगाबाद येथून पिशोर येथे हिराजी महाराज कारखान्याच्या आवारात आणून टाकलेल्या कचºयापासून खत तयार झाले असून आ. हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला शब्द पाळत आपल्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.गेल्या दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील महानगरपालिका हद्दीतील कचरा पिशोर येथील हिराजी महाराज सहकारी साखर कारखान्याच्या आवारात आणून टाकला होता. औरंगाबादची घाण कन्नड तालुक्यात नको म्हणून आ. जाधव यांच्या या कृतीला जोरदार विरोध झाला होता. यावर आ. जाधव यांनी या कचºयापासून जैविक खताची निर्मिती करून शेतकºयांना मोफत वाटप करण्याची घोषणा केली होती.त्यानुसार कचºयावर बायोकल्चर फवारणी करण्यात येऊन अनेकदा पलटी मारण्यात आली. सोमवारी (दि.३) सकाळपासून स्क्रीनिंग मशीनद्वारे खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पावसामुळे व्यत्यय आला व खत निर्मिती करण्यास उशीर झाला. सुमारे ८० टन कचºयापासून सुमारे ३० टन जैविक खत निर्माण झाल्याचे प्रकल्प व्यवस्थापक दीपक बोथे यांनी सांगितले. पूर्ण खत तयार होईपर्यंत आ. जाधव हे रात्री उशिरापर्यंत साईटवर ठाण मांडून होते. आपल्या हातात फावडे घेत स्वत: त्यांनी खत गोणीत भरले. यावेळी त्यांच्या चेहºयावर समाधानाचे भाव दिसून येत होते.यावेळी पिशोरसह करंजखेड, वासडी, पिंपरखेडा, गौरपिंप्री, नादरपूर तसेच तालुक्यातील गावांतून आलेल्या शेतकºयांनाही हे जैविक खत तयार होताना बघून सुखदवाटले.यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र मगर, हतनूरचे पं. स. सदस्य किशोर पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत मोकासे, सिद्धेश्वर झाल्टे, गणेश ठोकळ, कैलास दहेतकर, योगेश मोकासे, सुरेश हिंजे, अक्रम पठाण, बाबासाहेब जाधव, प्रदीप बोडखे, सूर्यभान जाधव, भास्कर जाधव, शांताराम जाधव, गंपू जाधव, भास्कर सूर्यवंशी, नीलेश नवले, सचिन जाधव आदींसह परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विरोधकांनाही मोफत खतसदरील कचºयापासून तयार झालेले खत जवळपास ६५० एकर शेतीला पुरेल. विरोधकांनी कचºयाचे राजकारण करून रोगराई पसरेल, अशी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून खत निर्माण होणार नाही, असेही सांगत सुटले होते; परंतु कुणाच्याही आरोग्यास काहीही इजा न होता कचºयापासून खत निर्माण केल्याचा आनंद असून विरोधकांनी मोफत खत आवश्य घेऊन जावे.-आ. हर्षवर्धन जाधव

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMLAआमदार