शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करा, स्मार्ट योजनेंतर्गत ३ कोटींपर्यंत अनुदान घ्या

By बापू सोळुंके | Updated: July 21, 2023 19:47 IST

शेतकऱ्यांच्या मालाचा दर्जा वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने स्मार्ट योजना सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगर: स्टेट ऑफ महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट योजनेंतर्गत औरंगाबाद, बीड आणि जालना या तीन जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी आणि गटांच्या ५४ प्रकल्पांना शासनाने मंजुरी दिली आहे.

या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या कृषी माल प्रक्रिया उद्योग सुरू करणे, गोदाम बांधणे यासाठी या कंपन्यांना तीन कोटी रुपयांपर्यंत अनुदान शासनाकडून मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांच्या मालाचा दर्जा वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने स्मार्ट योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी आणि स्वत:चा विकास करावा, यासाठी ‘स्मार्ट’चे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. यावर्षी औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटांसाठी एकूण ९७ प्रकल्पांचे उद्दिष्ट कृषी सहसंचालक कार्यालयास होते.

या जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गटांकडून विविध प्रकल्पाचे ६५ प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाले होते. यापैकी ५४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्मार्टचे कृषी अधीक्षक उमेश घाटगे यांनी दिली. ते म्हणाले की, यातील बहुतेक शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांचे प्रस्ताव हे धान्य क्लिनिंग, ग्रेडिंग यंत्रणा उभी करणे, पशुखाद्य तयार करणे, भाजीपाला प्रक्रिया उद्योग, फळप्रक्रिया उद्योग, दाल मिल, ऑईल मिल सुरू करणे आणि गोदाम बांधण्यासाठी सुमारे ६० टक्के अनुदान देण्यात येते. औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यात आतापर्यंत ६५ प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. बहुतेक कंपन्यांचे प्रस्ताव हे गोडावून बांधणे आणि धान्य क्लिनिंग, ग्रेडिंग युनिट उभारण्यासंदर्भातील आहेत.

पाच टप्प्यात अनुदानशेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटांमुळे शेतकऱ्यांचे उत्थान होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन स्मार्टकडून गोडावून बांधण्याच्या पाच कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी ३ कोटी रुपये अनुदान देण्यात येते. तसेच फळप्रक्रिया उद्योगासाठी २ कोटींपर्यंत अनुदान दिले जाते. हे अनुदान पाच टप्प्यात मिळते.

टॅग्स :Farmerशेतकरीfoodअन्नAurangabadऔरंगाबाद