शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करा, स्मार्ट योजनेंतर्गत ३ कोटींपर्यंत अनुदान घ्या

By बापू सोळुंके | Updated: July 21, 2023 19:47 IST

शेतकऱ्यांच्या मालाचा दर्जा वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने स्मार्ट योजना सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगर: स्टेट ऑफ महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट योजनेंतर्गत औरंगाबाद, बीड आणि जालना या तीन जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी आणि गटांच्या ५४ प्रकल्पांना शासनाने मंजुरी दिली आहे.

या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या कृषी माल प्रक्रिया उद्योग सुरू करणे, गोदाम बांधणे यासाठी या कंपन्यांना तीन कोटी रुपयांपर्यंत अनुदान शासनाकडून मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांच्या मालाचा दर्जा वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने स्मार्ट योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी आणि स्वत:चा विकास करावा, यासाठी ‘स्मार्ट’चे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. यावर्षी औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटांसाठी एकूण ९७ प्रकल्पांचे उद्दिष्ट कृषी सहसंचालक कार्यालयास होते.

या जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गटांकडून विविध प्रकल्पाचे ६५ प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाले होते. यापैकी ५४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्मार्टचे कृषी अधीक्षक उमेश घाटगे यांनी दिली. ते म्हणाले की, यातील बहुतेक शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांचे प्रस्ताव हे धान्य क्लिनिंग, ग्रेडिंग यंत्रणा उभी करणे, पशुखाद्य तयार करणे, भाजीपाला प्रक्रिया उद्योग, फळप्रक्रिया उद्योग, दाल मिल, ऑईल मिल सुरू करणे आणि गोदाम बांधण्यासाठी सुमारे ६० टक्के अनुदान देण्यात येते. औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यात आतापर्यंत ६५ प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. बहुतेक कंपन्यांचे प्रस्ताव हे गोडावून बांधणे आणि धान्य क्लिनिंग, ग्रेडिंग युनिट उभारण्यासंदर्भातील आहेत.

पाच टप्प्यात अनुदानशेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटांमुळे शेतकऱ्यांचे उत्थान होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन स्मार्टकडून गोडावून बांधण्याच्या पाच कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी ३ कोटी रुपये अनुदान देण्यात येते. तसेच फळप्रक्रिया उद्योगासाठी २ कोटींपर्यंत अनुदान दिले जाते. हे अनुदान पाच टप्प्यात मिळते.

टॅग्स :Farmerशेतकरीfoodअन्नAurangabadऔरंगाबाद