शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

शिळी मिठाई तर तुमच्या माथी मारली जात नाही ना; ‘बेस्ट बिफोर’ लिहिण्यास टाळाटाळ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 30, 2024 19:35 IST

मिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहीत नाही, अशा मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही खातात ती मिठाई किती शुद्ध आहे किंवा कधी तयारी केली व किती दिवसांत खावी, याचा विचार केला आहे का? त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मिठाईच्या ट्रेसमोर ‘बेस्ट बिफोर’ तारीख लिहिण्याची सक्ती केली होती. मात्र, शहरातील सुमारे ७० टक्के मिठाई विक्रेत्यांनी आता मिठाईसमोर ‘बेस्ट बिफोर’ देणे टाळणे सुरू केले आहे. यामुळे तुमच्या माथी शिळी मिठाई तर मारली जात नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.

चार वर्षांत नियम धाब्यावरभारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)ने २५ सप्टेंबर २०२० ला यासंदर्भात आदेश काढला होता. १ ऑक्टोबर २०२० पासून दुकानात मिठाईच्या ट्रेसमोर ‘बेस्ट बिफोर’ तारीख लिहिणे बंधनकारक करण्यात आले होते. ‘बेस्ट’ म्हणजे मिठाई कधी तयार केली आणि ‘बिफोर’ म्हणजे ती मिठाई किती दिवस खाऊ शकतात, असा याचा अर्थ होतो. त्यानंतर काही दिवस विक्रेत्यांनी या आदेशाचे पालन केले. लाॅकडाऊननंतरही काही महिने मिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहिले जात होते; पण अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आणि अनेक मिठाई विक्रेत्यांनी नियम धाब्यावर बसवत बेस्ट बिफोर लिहिणे बंद केले.

नामांकित ३० टक्के दुकानांतच पालनशहरात आजघडीला १५० पेक्षा अधिक लहान-मोठे मिठाईची दुकाने आहेत. यातील ३० टक्के तेही नामांकित दुकानदारच मिठाईच्या ‘ट्रे’समोर ‘बेस्ट बिफोर’ लिहीत असल्याचे आढळून आले आहे. त्यातही २ टक्के मिठाई विक्रेत्यांनी ट्रेसमोर मिठाईचे नाव व त्याखाली किंमत आणि बिफोर तारीख असे लिहिलेले आढळून आले.

अन्न व औषध विभागाच्या दुर्लक्षामुळे संभ्रममिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहीत नाही, अशा मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहेत. मात्र, या विभागाने सुरुवातीच्या काळात दंडात्मक कारवाई केली. पण नंतर विभागाचे दुर्लक्ष झाले. मनुष्यबळ कमी असल्याने दुर्लक्ष झाले. याचा वेगळा अर्थ मिठाई विक्रेत्यांनी घेतला व आता बेस्ट बिफोरचा निर्णय बदलला असाच सोयीचा अर्थ काढला. यामुळे संभ्रम निर्माण झाला. पण आदेश कायम आहेत. यामुळे जिथे बेस्ट बिफोर लिहिले तीच मिठाई खरेदी करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोणती मिठाई किती दिवस टिकते१) दुधापासून बनविलेला पेढा २ दिवस२) अधिक साखर टाकलेला पेढा १० दिवस३) बेसनापासून तयार केलेली मिठाई, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, म्हैसूरपाक, सोनपापडी-१५ दिवस४) खव्यापासून बनविलेले कंदीपेढे, केशरी पेढे, चाॅकलेट बर्फी, गुलकंद बर्फी- ६ ते ७ दिवस५) दुधापासून बनविलेले मिल्क केक, कलाकंद, अंजीर बर्फी, रसमलाई, रबडी- २ दिवस६) ड्रायफ्रुट मिठाई, काजू कतली, काजू रोल, ड्रायफ्रुट बर्फी- ७ ते ८ दिवस

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न