शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिळी मिठाई तर तुमच्या माथी मारली जात नाही ना; ‘बेस्ट बिफोर’ लिहिण्यास टाळाटाळ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 30, 2024 19:35 IST

मिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहीत नाही, अशा मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही खातात ती मिठाई किती शुद्ध आहे किंवा कधी तयारी केली व किती दिवसांत खावी, याचा विचार केला आहे का? त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मिठाईच्या ट्रेसमोर ‘बेस्ट बिफोर’ तारीख लिहिण्याची सक्ती केली होती. मात्र, शहरातील सुमारे ७० टक्के मिठाई विक्रेत्यांनी आता मिठाईसमोर ‘बेस्ट बिफोर’ देणे टाळणे सुरू केले आहे. यामुळे तुमच्या माथी शिळी मिठाई तर मारली जात नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.

चार वर्षांत नियम धाब्यावरभारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)ने २५ सप्टेंबर २०२० ला यासंदर्भात आदेश काढला होता. १ ऑक्टोबर २०२० पासून दुकानात मिठाईच्या ट्रेसमोर ‘बेस्ट बिफोर’ तारीख लिहिणे बंधनकारक करण्यात आले होते. ‘बेस्ट’ म्हणजे मिठाई कधी तयार केली आणि ‘बिफोर’ म्हणजे ती मिठाई किती दिवस खाऊ शकतात, असा याचा अर्थ होतो. त्यानंतर काही दिवस विक्रेत्यांनी या आदेशाचे पालन केले. लाॅकडाऊननंतरही काही महिने मिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहिले जात होते; पण अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आणि अनेक मिठाई विक्रेत्यांनी नियम धाब्यावर बसवत बेस्ट बिफोर लिहिणे बंद केले.

नामांकित ३० टक्के दुकानांतच पालनशहरात आजघडीला १५० पेक्षा अधिक लहान-मोठे मिठाईची दुकाने आहेत. यातील ३० टक्के तेही नामांकित दुकानदारच मिठाईच्या ‘ट्रे’समोर ‘बेस्ट बिफोर’ लिहीत असल्याचे आढळून आले आहे. त्यातही २ टक्के मिठाई विक्रेत्यांनी ट्रेसमोर मिठाईचे नाव व त्याखाली किंमत आणि बिफोर तारीख असे लिहिलेले आढळून आले.

अन्न व औषध विभागाच्या दुर्लक्षामुळे संभ्रममिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहीत नाही, अशा मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहेत. मात्र, या विभागाने सुरुवातीच्या काळात दंडात्मक कारवाई केली. पण नंतर विभागाचे दुर्लक्ष झाले. मनुष्यबळ कमी असल्याने दुर्लक्ष झाले. याचा वेगळा अर्थ मिठाई विक्रेत्यांनी घेतला व आता बेस्ट बिफोरचा निर्णय बदलला असाच सोयीचा अर्थ काढला. यामुळे संभ्रम निर्माण झाला. पण आदेश कायम आहेत. यामुळे जिथे बेस्ट बिफोर लिहिले तीच मिठाई खरेदी करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोणती मिठाई किती दिवस टिकते१) दुधापासून बनविलेला पेढा २ दिवस२) अधिक साखर टाकलेला पेढा १० दिवस३) बेसनापासून तयार केलेली मिठाई, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, म्हैसूरपाक, सोनपापडी-१५ दिवस४) खव्यापासून बनविलेले कंदीपेढे, केशरी पेढे, चाॅकलेट बर्फी, गुलकंद बर्फी- ६ ते ७ दिवस५) दुधापासून बनविलेले मिल्क केक, कलाकंद, अंजीर बर्फी, रसमलाई, रबडी- २ दिवस६) ड्रायफ्रुट मिठाई, काजू कतली, काजू रोल, ड्रायफ्रुट बर्फी- ७ ते ८ दिवस

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न