शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

शिळी मिठाई तर तुमच्या माथी मारली जात नाही ना; ‘बेस्ट बिफोर’ लिहिण्यास टाळाटाळ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 30, 2024 19:35 IST

मिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहीत नाही, अशा मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही खातात ती मिठाई किती शुद्ध आहे किंवा कधी तयारी केली व किती दिवसांत खावी, याचा विचार केला आहे का? त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मिठाईच्या ट्रेसमोर ‘बेस्ट बिफोर’ तारीख लिहिण्याची सक्ती केली होती. मात्र, शहरातील सुमारे ७० टक्के मिठाई विक्रेत्यांनी आता मिठाईसमोर ‘बेस्ट बिफोर’ देणे टाळणे सुरू केले आहे. यामुळे तुमच्या माथी शिळी मिठाई तर मारली जात नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.

चार वर्षांत नियम धाब्यावरभारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)ने २५ सप्टेंबर २०२० ला यासंदर्भात आदेश काढला होता. १ ऑक्टोबर २०२० पासून दुकानात मिठाईच्या ट्रेसमोर ‘बेस्ट बिफोर’ तारीख लिहिणे बंधनकारक करण्यात आले होते. ‘बेस्ट’ म्हणजे मिठाई कधी तयार केली आणि ‘बिफोर’ म्हणजे ती मिठाई किती दिवस खाऊ शकतात, असा याचा अर्थ होतो. त्यानंतर काही दिवस विक्रेत्यांनी या आदेशाचे पालन केले. लाॅकडाऊननंतरही काही महिने मिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहिले जात होते; पण अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आणि अनेक मिठाई विक्रेत्यांनी नियम धाब्यावर बसवत बेस्ट बिफोर लिहिणे बंद केले.

नामांकित ३० टक्के दुकानांतच पालनशहरात आजघडीला १५० पेक्षा अधिक लहान-मोठे मिठाईची दुकाने आहेत. यातील ३० टक्के तेही नामांकित दुकानदारच मिठाईच्या ‘ट्रे’समोर ‘बेस्ट बिफोर’ लिहीत असल्याचे आढळून आले आहे. त्यातही २ टक्के मिठाई विक्रेत्यांनी ट्रेसमोर मिठाईचे नाव व त्याखाली किंमत आणि बिफोर तारीख असे लिहिलेले आढळून आले.

अन्न व औषध विभागाच्या दुर्लक्षामुळे संभ्रममिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहीत नाही, अशा मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहेत. मात्र, या विभागाने सुरुवातीच्या काळात दंडात्मक कारवाई केली. पण नंतर विभागाचे दुर्लक्ष झाले. मनुष्यबळ कमी असल्याने दुर्लक्ष झाले. याचा वेगळा अर्थ मिठाई विक्रेत्यांनी घेतला व आता बेस्ट बिफोरचा निर्णय बदलला असाच सोयीचा अर्थ काढला. यामुळे संभ्रम निर्माण झाला. पण आदेश कायम आहेत. यामुळे जिथे बेस्ट बिफोर लिहिले तीच मिठाई खरेदी करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोणती मिठाई किती दिवस टिकते१) दुधापासून बनविलेला पेढा २ दिवस२) अधिक साखर टाकलेला पेढा १० दिवस३) बेसनापासून तयार केलेली मिठाई, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, म्हैसूरपाक, सोनपापडी-१५ दिवस४) खव्यापासून बनविलेले कंदीपेढे, केशरी पेढे, चाॅकलेट बर्फी, गुलकंद बर्फी- ६ ते ७ दिवस५) दुधापासून बनविलेले मिल्क केक, कलाकंद, अंजीर बर्फी, रसमलाई, रबडी- २ दिवस६) ड्रायफ्रुट मिठाई, काजू कतली, काजू रोल, ड्रायफ्रुट बर्फी- ७ ते ८ दिवस

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न