शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ST Strike : प्रस्ताव मान्य नाही, पगारवाढ नको, विलीनीकरण करा; एसीटी कर्मचारी संपावर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 20:39 IST

ST Strike : पगार वाढ फारच कमी आहे, विलीनीकरणामुळेच योग्य तो न्याय मिळेल.

औरंगाबाद : आमचा लढा शासनात विलीकारणाचा आहे, मंत्री महोदयांनी दिलेला पगारवाढीचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. यासाठी ४२ कर्मचाऱ्यांनी बलिदान दिले आहे. विलीनीकरण प्रस्ताव स्वीकारणे म्हणजे त्यांच्या बलिदानाचा अपमान करण्यासारखे आहे. आम्ही विलीनीकरणावर ठाम आहोत, असा निर्धार औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. 

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ जाहीर केली. त्यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेणारे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते. अनुभवानुसार मूळ वेतनात पगार वाढीचा ऐतिहासिक प्रस्ताव मंत्री परब यांनी सादर करत एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर रुजू होण्याची विनंती केली. तसेच कर्मचाऱ्यांवरील निलंबन देखील मागे घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. मात्र, या प्रस्तावास शहरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. 

आमचा लढा विलीनीकरणाचा सिडको, चिकलठाणा वर्कशॉप आणि मध्यवर्ती बसस्थानकात एसीटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप करत आहेत. आज संध्याकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेला प्रस्ताव आम्हाला अमान्य असल्याची भूमिका आंदोलकांनी जाहीर केली आहे. विद्यार्थी, सामान्य जनता यांचे हाल होत आहेत त्याबद्दल आमची सहानभूती आहे. विलीनीकरणाचा फायदा आमच्यासोबत सामान्य जनतेला सुद्धा होणार आहे. पगार वाढ फारच कमी आहे, विलीनीकरणामुळेच योग्य तो न्याय मिळेल, असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपAurangabadऔरंगाबादAnil Parabअनिल परब