शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात एसटी महामंडळाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात एसटी महामंडळाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याची स्थिती वारंवार उद्भवत आहे. त्यात कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलेही थकली आहेत. वैद्यकीय खर्चासाठी काहींनी नातेवाइकांकडून उसने पैसे घेतले आहेत, तर कोणी कर्ज घेतले. खासगी रुग्णालयांची महागडी बिले भरताना कर्मचारी मेटाकुटीला येत आहेत.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही वैद्यकीय उपचाराचा खर्च आधी स्वत:च्या खिशातून करावा लागत असल्याची स्थिती आहे. नंतर एसटी महामंडळाकडून त्याची नियमानुसार रक्कम दिली जाते; परंतु कोरोनामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिघडली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच निधी नसल्याने दोन-दोन महिने पगार होत नाहीत. यात गेल्या दीड वर्षांपासून वैद्यकीय बिले मिळत नसल्याचीही स्थिती आहे. कर्मचाऱ्यांना डाॅक्टरांच्या कागदपत्रांसह वैद्यकीय बिले कार्यालयास सादर करावी लागतात. त्याची पडताळणी केली जाते. बिल विभागीय पातळीवरील असेल त्याची मंजुरी विभागीय पातळीवरच मिळते, अन्यथा ते मुंबईला पाठविले जाते.

--

जिल्ह्यातील एकूण आगार- ८

- अधिकारी-४२

- कर्मचारी-७५८

-बसचालक- १२००

- वाहक-९००

--

पगार दोन महिन्यांतून एकदा

कोरोनाकाळात गेल्या १७ महिन्यांत वारंवार वेतन विलंबाला सामोरे जावे लागत आहे. त्यातही जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबरच्या प्रारंभी मिळाले. दोन महिन्यांतून एकदा पगार होत असल्याची स्थिती आहे. वेतनाअभावी कोणाचे घरभाडे थकते, तर कोणाकडे किराणा दुकानदारांची थकबाकी वाढते. या सगळ्याला सामोरे जात एसटी कर्मचारी सेवा देत आहेत.

---

वैद्यकीय बिले दीड वर्षे मिळेनात

कोरोनामुळे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. वैद्यकीय बिलांचा परतावा देण्यासाठी निधीच उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. दीड वर्षे होत आहे. तरी अनेक कर्मचाऱ्यांना बिलाचा परवाना मिळत नसल्याचे कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले.

-----

उपचारावर झालेला खर्च कोठून आणायचा

बिले लवकर द्यावीत

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून वैद्यकीय बिले मिळत नसल्याची स्थिती आहे. पूर्वी महिना, दोन महिन्यांत बिले मिळत होती. आता कर्मचाऱ्यांना खिशातून वैद्यकीय खर्च करावा लागत आहे. किमान वैद्यकीय बिले लवकरात लवकर देण्यात यावीत.

- मकरंद कुलकर्णी, विभागीय सचिव, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन

---

वारंवार फोन करावे लागतात

एक लाखापेक्षा अधिक बिल असले तरी ते मुंबईतून मंजूर केले जाते; परंतु सध्या कर्मचारी संख्या आणि निधी अपुरा आहे. त्यामुळे बिले मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. बिलासाठी वारंवार फोन करून विचारणा करावी लागत आहे.

- एक कर्मचारी

--------

निधीच्या उपलब्धतेनुसार बिले

वैद्यकीय बिल सादर केल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार ते मंजूर करून कर्मचाऱ्यांना देण्यात येते. अधिक रकमेचे वैद्यकीय बिल असेल तर मुंबईला पाठविले जाते. अशा बिलांना लाँग बिल म्हटले जाते. बायपास, ॲन्जिओप्लास्टी यासारख्या आजारांसाठी ॲडव्हान्स दिला जातो.

- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ