शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात एसटी महामंडळाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात एसटी महामंडळाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याची स्थिती वारंवार उद्भवत आहे. त्यात कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलेही थकली आहेत. वैद्यकीय खर्चासाठी काहींनी नातेवाइकांकडून उसने पैसे घेतले आहेत, तर कोणी कर्ज घेतले. खासगी रुग्णालयांची महागडी बिले भरताना कर्मचारी मेटाकुटीला येत आहेत.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही वैद्यकीय उपचाराचा खर्च आधी स्वत:च्या खिशातून करावा लागत असल्याची स्थिती आहे. नंतर एसटी महामंडळाकडून त्याची नियमानुसार रक्कम दिली जाते; परंतु कोरोनामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिघडली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच निधी नसल्याने दोन-दोन महिने पगार होत नाहीत. यात गेल्या दीड वर्षांपासून वैद्यकीय बिले मिळत नसल्याचीही स्थिती आहे. कर्मचाऱ्यांना डाॅक्टरांच्या कागदपत्रांसह वैद्यकीय बिले कार्यालयास सादर करावी लागतात. त्याची पडताळणी केली जाते. बिल विभागीय पातळीवरील असेल त्याची मंजुरी विभागीय पातळीवरच मिळते, अन्यथा ते मुंबईला पाठविले जाते.

--

जिल्ह्यातील एकूण आगार- ८

- अधिकारी-४२

- कर्मचारी-७५८

-बसचालक- १२००

- वाहक-९००

--

पगार दोन महिन्यांतून एकदा

कोरोनाकाळात गेल्या १७ महिन्यांत वारंवार वेतन विलंबाला सामोरे जावे लागत आहे. त्यातही जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबरच्या प्रारंभी मिळाले. दोन महिन्यांतून एकदा पगार होत असल्याची स्थिती आहे. वेतनाअभावी कोणाचे घरभाडे थकते, तर कोणाकडे किराणा दुकानदारांची थकबाकी वाढते. या सगळ्याला सामोरे जात एसटी कर्मचारी सेवा देत आहेत.

---

वैद्यकीय बिले दीड वर्षे मिळेनात

कोरोनामुळे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. वैद्यकीय बिलांचा परतावा देण्यासाठी निधीच उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. दीड वर्षे होत आहे. तरी अनेक कर्मचाऱ्यांना बिलाचा परवाना मिळत नसल्याचे कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले.

-----

उपचारावर झालेला खर्च कोठून आणायचा

बिले लवकर द्यावीत

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून वैद्यकीय बिले मिळत नसल्याची स्थिती आहे. पूर्वी महिना, दोन महिन्यांत बिले मिळत होती. आता कर्मचाऱ्यांना खिशातून वैद्यकीय खर्च करावा लागत आहे. किमान वैद्यकीय बिले लवकरात लवकर देण्यात यावीत.

- मकरंद कुलकर्णी, विभागीय सचिव, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन

---

वारंवार फोन करावे लागतात

एक लाखापेक्षा अधिक बिल असले तरी ते मुंबईतून मंजूर केले जाते; परंतु सध्या कर्मचारी संख्या आणि निधी अपुरा आहे. त्यामुळे बिले मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. बिलासाठी वारंवार फोन करून विचारणा करावी लागत आहे.

- एक कर्मचारी

--------

निधीच्या उपलब्धतेनुसार बिले

वैद्यकीय बिल सादर केल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार ते मंजूर करून कर्मचाऱ्यांना देण्यात येते. अधिक रकमेचे वैद्यकीय बिल असेल तर मुंबईला पाठविले जाते. अशा बिलांना लाँग बिल म्हटले जाते. बायपास, ॲन्जिओप्लास्टी यासारख्या आजारांसाठी ॲडव्हान्स दिला जातो.

- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ