शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result : औरंगाबाद विभागाचा ९९.९६ टक्के निकाल; विशेष प्राविण्यात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 16:04 IST

SSC Result of Aurangabad Division : औरंगाबाद विभागात नियमित परिक्षार्थी म्हणून १ लाख ७६ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७६ हजार २९० विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले.

ठळक मुद्देविभागात १०६३ पुनर्परिक्षार्थी तर १७४ बहिस्त विद्यार्थी, तर ६७ नियमीत विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत

औरंगाबाद : औरंगाबाद विभागातील १ लाख ७६ हजार २२३ (९९.९६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलींनी बाजी मारली असून यंदा ९९.९५ टक्के मुले तर ९९.९७ मुली टक्के मुली दहावी पास झाल्या. तर प्राविण्य श्रेणीत सर्वाधिक तर केवळ उत्तीर्ण श्रेणीत सर्वात कमी विद्यार्थी आहेत.

औरंगाबाद विभागात नियमित परिक्षार्थी म्हणून १ लाख ७६ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७६ हजार २९० विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. त्यापैकी १ लाख ७६ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. एकूण निकालात ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्राविण्य श्रेणीत ९६,५४२, प्रथम श्रेणी ६० ते ७४ टक्के दरम्यान ७१ हजार ७७४, द्वितीय श्रेणी ४५ ते ५९ टक्के ७ हजार ७२१ तर ३५ टक्के व उत्तीर्ण श्रेणीत केवळ १८६ विद्यार्थी आहेत.

पुनर्परिक्षार्थ्यांत ८ हजार ८७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार ८४९ विद्यार्थ्यी प्रविष्ठ झाले असून ७१७२ विद्यार्थई उत्तीर्ण झाले. एकुण ८१.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राविण्य श्रेणी ५९, प्रथम श्रेणी ३४०, द्वितीय श्रेणी ३३३, तर उत्तीर्ण श्रेणीत ६४४० विद्यार्थी आहेत.कला गुणांसाठी १३ हजार १७४ तर क्रीडा गुणांसाठी ७९० प्रस्ताव आले होते त्याचा आंतर्भाव निकालात करण्यात आलेला आहे. १२६७ जणांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यात अनेकांची कागदपत्रांची पुर्तता नाही. तर काही राखीव निकालातील विद्यार्थी अपघाती, कोरोनामुळे, नैसर्गिक मृत्यू ओढावल्याचेही बोर्डाकडे कळवण्यात आले आहे. असे बोर्डाकडून सांगण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांच्यासह बोर्डाचे अधिकारी उपस्थिती होते.

त्रुटी पुर्ण झाल्यावर वाढेल निकालविभागात १०६३ पुनर्परिक्षार्थी तर १७४ बहिस्त विद्यार्थी, तर ६७ नियमीत विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत. त्रुटी पूर्ण झाल्यावर त्यांचा निकाल लागेल. त्यासाठी शाळांशी बोर्डाकडून संपर्क साधून त्रुटींची पुर्तता करण्याचे सांगण्यात येत आहे. त्या त्रुटींच्या पुर्ततेनंतर निकालाचे प्रमाण वाढेल. गुणपत्रिकेत त्रुटी, शंका वाटल्यास शाळांशी संपर्क साधावा, मुल्यांकनाची सर्व प्रक्रीया शाळा स्तरावर झाली आहे. पुनर्मुल्यांकनाची सुविधा या परिक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध नसेल. असे बोर्डाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.

विभागात श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थीजिल्हा - प्राविण्य श्रेणी - प्रथम श्रेणी - द्वितीय श्रेणी - उत्तीर्णऔरंगाबाद -३३,११६ -२६,६२८ -३,०८२ -७८बीड -२५,८६२ -१३,५६१ -१,१११ -१८परभणी -१५,३३८ -१०,४०४ -१,१७६ -१४जालना -१४,७६१ -१३८१९ -१,७७० -६७हिंगोली -७४९५ -७३६२ -५८२ -९

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबाद