शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

SSC Result 2020 : औरंगाबाद विभाग राज्यात सर्वात शेवटी तरीही १७ टक्क्यांनी वाढला निकाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 19:05 IST

औरंगाबाद विभागात २ हजार ५६० माध्यमिक शाळांमधील १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यात १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

ठळक मुद्देविभागात जालना जिल्हा टॉपवर, परभणी तळाला

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत कोकण विभागाने ९८.७७ टक्के निकालाची नोंदवत आघाडी कायम राखली. औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला असून, राज्यात शेवटचा क्रमांक मिळाला. तरीही मागील वर्षीच्या तुलनेत विभागाचा निकाल १६.८० टक्के अधिक लागला. बुधवारी औरंगाबाद विभागाचा निकाल विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी जाहीर केला. यावेळी सहसचिव विजय जोशी, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण उपस्थित होते. 

औरंगाबाद विभागात २ हजार ५६० माध्यमिक शाळांमधील १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यात १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ लाख ६९ हजार ९९१  जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९२ आहे. १५ हजार ९४६ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी होते. त्यापैकी १५ हजार ७६०  जणांनी परीक्षा दिली. त्यात १०, ९२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६९.३४ आहे. 

६२४ केंद्रावर परीक्षाविभागात दहावीची परीक्षा ६२४ केंद्रावर झाली. यासाठी ६३ परीक्षक, ६२४ केंद्र संचालक आणि सहकेंद्रसंचालक, ११ हजार २३१ पर्यवक्षकांनी कार्य केले होते. परीक्षेच्या कालावधीत पाच जिल्ह्यांत एकूण १८१ गैरप्रकार घडले होते. त्यापैकी ७० गैरप्रकारांच्या चौकशीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून, त्यातील ६९ जणांच्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली. दहावीच्या निकालात कोणत्याही विशिष्ट विषयात संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे आॅनलाईन पद्धतीने करता येईल, असेही सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र