शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2020 : औरंगाबाद विभाग राज्यात सर्वात शेवटी तरीही १७ टक्क्यांनी वाढला निकाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 19:05 IST

औरंगाबाद विभागात २ हजार ५६० माध्यमिक शाळांमधील १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यात १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

ठळक मुद्देविभागात जालना जिल्हा टॉपवर, परभणी तळाला

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत कोकण विभागाने ९८.७७ टक्के निकालाची नोंदवत आघाडी कायम राखली. औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला असून, राज्यात शेवटचा क्रमांक मिळाला. तरीही मागील वर्षीच्या तुलनेत विभागाचा निकाल १६.८० टक्के अधिक लागला. बुधवारी औरंगाबाद विभागाचा निकाल विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी जाहीर केला. यावेळी सहसचिव विजय जोशी, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण उपस्थित होते. 

औरंगाबाद विभागात २ हजार ५६० माध्यमिक शाळांमधील १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यात १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ लाख ६९ हजार ९९१  जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९२ आहे. १५ हजार ९४६ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी होते. त्यापैकी १५ हजार ७६०  जणांनी परीक्षा दिली. त्यात १०, ९२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६९.३४ आहे. 

६२४ केंद्रावर परीक्षाविभागात दहावीची परीक्षा ६२४ केंद्रावर झाली. यासाठी ६३ परीक्षक, ६२४ केंद्र संचालक आणि सहकेंद्रसंचालक, ११ हजार २३१ पर्यवक्षकांनी कार्य केले होते. परीक्षेच्या कालावधीत पाच जिल्ह्यांत एकूण १८१ गैरप्रकार घडले होते. त्यापैकी ७० गैरप्रकारांच्या चौकशीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून, त्यातील ६९ जणांच्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली. दहावीच्या निकालात कोणत्याही विशिष्ट विषयात संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे आॅनलाईन पद्धतीने करता येईल, असेही सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र