शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म-डॉ. यू. म. पठाण सुचिता...

By admin | Updated: May 6, 2014 10:52 IST

मन-कल्पना बोडीत ना । करित शरिराची विटंबना ।।१।। चारा वर्षाची पर्थणी ।। केस वोडून नासले पाणी ।।२।। कामे अभिलासी नरनारी । काय करिल काशी गोदावरी? ।।३।। विधि, प्रयाग वांया गेले । काग, बग गोंदी नाहाले ।।४।। शेख महंमद हुदई चांग । गोदा, वाराणसी अष्टांग ।।५।।

मन-कल्पना बोडीत ना । करित शरिराची विटंबना ।।१।। चारा वर्षाची पर्थणी ।। केस वोडून नासले पाणी ।।२।। कामे अभिलासी नरनारी । काय करिल काशी गोदावरी? ।।३।।विधि, प्रयाग वांया गेले । काग, बग गोंदी नाहाले ।।४।।शेख महंमद हुदई चांग । गोदा, वाराणसी अष्टांग ।।५।।शरीराच्या पावित्र्याबरोबरच मनाचं पावित्र्यही महत्त्वाचं आहे, इतकंच नव्हे, तर तसेच अधिक महत्त्वाचं आहे, याविषयी संत कवी शेख महमदांनी या अभंगात विवेचन केलेलं आहे. उपासना करण्याचे तीन मार्ग आहेत. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग हे ते तीन मार्ग होत. खरं तर, हे तिन्ही मार्ग एकमेकांना पूरक असेच आहेत, पण काही वेळेला त्यांचा उपयोग एकारल्यासारखा होतो. ज्ञानमार्गी पोथीपांडित्याच्या मागं लागले, कर्ममार्गी कर्मठ होऊन केवळ कर्मकांडी झाले किंवा भक्तिमार्गीयांनी डोळस होऊन भक्तीचा स्वीकार केला नाही, तर निखळ साधना किंवा उपासना होणार नाही आणि या सर्वांच्या मागं मनाच्या शुचितेचं अधिष्ठान असणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ मुंडन करून किंवा गंगेत वा गोदावरीत स्नान करून आपण पवित्र झालो, असं कुणाला वाटत असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. शेख महंमद म्हणतात, की असे तर कावळे नि बगळेदेखील या नद्यांत स्नान करतात. मन पवित्र नसेल तर आणि मनात वासना असेल तर अशा स्नानाचा काय उपयोग? अशी माणसं काशी किंवा प्रयागसारख्या तीर्थांना गेली, तरी ती अशुद्धच राहतील. मन पवित्र नसेल, तर या सर्व गोष्टी व्यर्थ होत. ज्ञानदेवांनीदेखील शुचितेची व्याख्या करताना तिची तुलना सूर्याशी केली आहे. ते म्हणतात, सूर्य हा जसा अंतर्बाह्य तेजस्वी असतो, तसं साधकाचं किंवा भक्तांचं अंत:करणही पवित्र असावं नि शरीरही पवित्र असावं.