शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

नारळी सप्ताहातून सामाजिक सलोख्याला अध्यात्माची जोड !

By admin | Updated: April 8, 2015 00:53 IST

प्रताप नलावडे , बीड अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखण्यासाठी गेली ८२ वर्षापासून भगवान गडावरून नारळी सप्ताहाचे आयोजन केले जात असून सध्या बीड तालुक्यातील हिंगणी

प्रताप नलावडे , बीडअध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखण्यासाठी गेली ८२ वर्षापासून भगवान गडावरून नारळी सप्ताहाचे आयोजन केले जात असून सध्या बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द या छोट्याशा गावात हा सप्ताह सुरू आहे. दररोज एक लाखापेक्षा भाविक या सप्ताहात हजेरी लावत असून ९ एप्रिलला या सप्ताहाच्या समारोपासाठी तीन लाखापेक्षाही अधिक भाविक हिंगणी खुर्दमध्ये दाखल होणार आहेत.सामाजिक सलोखा राखणे आणि अध्यात्माच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम या सप्ताहातून होत असल्याचे न्यायचार्य नामदेव महाराज शास्त्री आवर्जून सांगतात. संत भगवान बाबा यांनी सुरू केलेल्या या नारळी सप्ताहाची व्याप्ती आता इतकी वाढली आहे की यासाठी उपस्थित राहणाऱ्यांची संख्या लाखावर पोहोचली आहे. सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येऊन हा सप्ताह गेली ८२ वर्षापासून करत आहेत. भगवान गडावरून सप्ताहाच्या आयोजनासाठी नारळ घ्यायचा आणि त्यानंतर त्याची तयारी करायची, अशी परंपरा चालत आली आहे. गेली नऊ वर्षापूर्वी हिंगणी खुर्द गावाला हा मानाचा नारळ मिळाला होता. तेव्हापासून गावकरी सप्ताहाच्या आयोजनाच्या तयारीत गुंतले आहेत. यासाठी वर्गणी गोळा करतानाही शेतकऱ्यानी आपल्या शेतीशी याचा मेळ घातला. एका एकरासाठी तीन हजार रूपये वर्गणी स्वखुशीने गावकऱ्यांनी दिली. नऊ वर्षात चाळीस लाखापेक्षाही अधिक रक्कम जमा करण्यात आली. यातूनच हा खर्च भागविला जातो.काही लोकांनी वस्तूच्या स्वरूपात मदत केली आहे. संभाजी चव्हाण यांनी २५ किंव्टल साखर, राजेंद्र मुंडे यांनी ५१ किंव्टल गहु, अशोक लोढा यांनी तेलाचे डबे असे जमेल तसे प्रत्येकाने या सप्ताहाचा भार उचलला आहे. रक्कम कमी पडली तर भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य नामदेव महाराज स्वत: खर्च करतात.दररोज भजन, कीर्तन, रामकथा, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. स्वत: नामदेव महाराज शास्त्री जातीने सर्व व्यवस्थेवर लक्ष देतात. हिंगणी हे अवघ्या दोन हजार लोकसंख्येचे गाव. या गावाला सध्या जत्रेचे स्वरूप आले आहे. गावाकडे जाणाऱ्या छोट्याशा कच्च्या रस्त्यावर मोटार गाड्यांची रांग लागली आहे. २५ एकराच्या परिसरात सप्ताह साजरा केला जात आहे. १० एकर परिसरात मंडपाची उभारणी केली असून कार्यक्रमासाठी, भोजनासाठी आणि स्वयपाकासाठी वेगवेगळे विभाग केले आहेत.संपूर्ण गावातील लोक नियोजनात सहभागी तर झाले आहेतच, परंतु बाहेर गावावरून आलेल्या लोकांचीही लगबग सुरू आहे.