शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते कंत्राटदाराला वाचवण्यासाठी फोडला सांडवा; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 19:17 IST

तलावाला दरवाजा असतानाही सांडवा फोडून पाणी काढण्याचे हे महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.

ठळक मुद्देतलावातून पाणी सोडण्यासाठी एक दरवाजाही आहे. दरवाजाने टप्प्याटप्प्याने पाणी न सोडता सांडवाच फोडला.

औरंगाबादः खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पाटबंधारे विभागानेच राजरोसपणे फोडला. जलक्षेत्रातून गेलेल्या ५०० मीटर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला वाचवण्यासाठी ऐन पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या तलावाचा सांडवा फोडण्याची ''कामगिरी'' अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली.

तलावातून पाणी सोडण्यासाठी एक दरवाजाही आहे. पण त्या दरवाजाने टप्प्याटप्प्याने पाणी न सोडता सांडवाच फोडला. तलावाला दरवाजा असतानाही सांडवा फोडून पाणी काढण्याचे हे महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. तलावाच्या कार्यक्षेत्रात येणारा ५०० मीटर लांबीचा रस्ता सुमार दर्जाचा बनविण्यात आला होता. या कामात लांबी-रुंदी, खडीकरण, डांबरीकरणाचे कोणतेही निकष पाळण्यात आलेले नाहीत. मात्र असे होऊनही एमएसआरडीसी कंत्राटदारावर मेहेरबान झाली. पहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली. तलावाच्या पाण्याने रस्त्याचे अधिक नुकसान होईल म्हणून बांध फोडला, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

'अखेर सांडवा फोडलाच'; ग्रामस्थांचा विरोध डावलून प्रशासनाने २० टक्के पाणी सोडले

तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्या दोन पावसांत आरणवाडी तलाव ८० टक्क्यांहून अधिक भरला. पाण्याच्या दाबामुळे रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाल्याचे कारण पुढे करून कंत्राटदाराने एमएसआरडीसीला हाताशी धरून जलसंधारण विभागाला पत्र लिहून तलावातील पाणी कमी करण्याची विनंती केली. यानुसार एमएसआरडीसी, जलसंधारण विभाग आणि कंत्राटदाराने संगनमत करीत तलावात अधिक पाणी साठल्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे कारण दाखवून चक्क पोकलेन लावून तलावाचा सांडवा फोडला. अधिकारी आणि कंत्राटदारांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हे दाखल करून दंड वसूल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली आहे. धारूरच्या कृउबा सभापती सुनील शिनगारे, आरणवाडी सरपंच लहू फुटाणे, बाळासाहेब चव्हाण, गणेश चव्हाण, मधुकर चव्हाण, लहू शिनगारे, विजय माने, नाना माने, अविनाश माने आदी गावकऱ्यांनी निवेदन पाठविले आहे.

पहाटेच्या अंधारात फोडला तलावपाच गावकऱ्यांनी प्रखर विरोध करत तीन दिवस काम अडवले होते. याच कालावधीत धारूरच्या तहसीलदारांनी तलावाची पाहणी करीत रस्त्याला कोणताही धोका नसल्याचा अहवाल दिला होता. मात्र, जलसंधारण व एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षणात पहाटे अंधारात तलावाचा सांडवा फोडून टाकला.

टॅग्स :BeedबीडAurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयWaterपाणी