शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

समृद्धी महामार्गाच्या कामास वेग; बोगद्यासाठी झटतेय परप्रांतीय कामगारांची फौज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:47 IST

सध्या सावंगी जंक्शनच्या पूर्वेला डोंगरातून बोगदा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

ठळक मुद्देफेब्रुवारीअखेरपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचनेमुळे कामाने घेतला वेग२६० मिटर लांबिच्या या बोगद्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करण्याची ‘डेड लाईन’

- विजय सरवदे

औरंगाबाद : समृद्धी महामार्ग अर्थात ‘नागपूर- मुंबई सुपर एक्स्प्रेस वे’ हा औरंगाबादसाठी वरदान ठरणार आहे. सध्या सावंगी जंक्शनच्या पूर्वेला डोंगरातून बोगदा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्या कामावर अत्याधुनिक यंत्र व परप्रांतीय निष्णात कामागारांची फौज रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. बोगद्याचे काम पूर्ण करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने ९० दिवसांची मुदत दिली आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामाचे अवलोकन करण्यासाठी सोमवारी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी सावंगी जक्शनच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला भेट दिली. चौका घाटाकडे जाताना अलिकडे डाव्या बाजूला डोंगराच्या पलिकडे गेल्यास माळीवाड्याकडून डोंगराच्यापायथ्यापर्यंत या महामार्गाचे काम आले आहे. सध्या तिथे डोंगर फोडण्याचे काम मोठमोठ्या यंत्रांद्वारे केले जात आहे.  जळगावर रोडवर सावंगी जंक्शनचे कामही जोरात सुरू आहे. जळगाव रोडवरून समृद्धी महामार्ग हा मुंबईकडे जाणार असून तिथे उड्डाणपुल उभारण्याचे काम सुरू आहे.

याशिवाय या महामार्गाला औरंगाबादची कनेक्टिव्ही देण्यासाठी तिथे वाहनांना खाली उतरण्यासाठी व महामार्गावर जाण्यासाठी सुविधा तयार केली जात आहे. त्यालाच ‘जंक्शन’ असे म्हटले जाते. या जंक्शनपासून पूर्वेला भला मोठा डोंगर असून त्यातून बोगदा तयार केला जात आहे. सध्या जालन्याकडून त्या  डोंगरापर्यंत समृद्धी महामार्गाचे काम आले आहे. पोखरी शिवारात असलेल्या हा डोंगर पोखरण्यासाठी एक अत्याधुनिक यंत्र, जेसीबी व अन्य यंत्रसामुग्री अहोरात्र परिश्रम घेत आहे. या कामावर झारखंड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, सिक्कीम येथील अनुभवी कामगारांची फौज जुंपली असून २६० मिटर लांबिच्या या बोगद्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करण्याची ‘डेड लाईन’ राज्य रस्ते विकास महामंडळाने ‘मेग इंजिनिअरिंग’ या कंत्राटदार संस्थेला दिली आहे. डोंगराला काँक्रिटीकरणातून  लोखंडी जाळी बसविण्यात आली असून यंत्राच्या सहाय्याने डोंगराला छिद्र पाडले जाते. त्या छिद्धात स्फोटके भरुन मग त्याचा स्फोट केला जातो. जेसीबी, पोकलेनद्वारे दगडांचा ढीग बाजूला करुन लगेच वरच्या दिशेने व बाजूला आधार देऊन हे काम पुढे केले जाते. 

मेपासून रस्ता वाहतुकीचा संकल्प समोर ठेवून अंतिम मुदत निश्चितयासंदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ए. बी. साळुंके यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावरून नाशिकपर्यंत १ मे रोजी वाहतूक सुरू करण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टिकोनातून फेब्रुवारीअखेरपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण करण्याची मेगा इंजिनिअरिंगला मुदत दिली आहे. ६ पदरी असलेल्या या रस्त्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. २६० मीटर लांबीच्या या बोगद्याचे काम दोन्ही बाजूने केले जाणार आहे. सध्या दुसरे यंत्र येईपर्यंत एका बाजूने काम सुरू आहे. लवकरात लवकर दुसरे यंत्र प्राप्त झाले, तर फेब्रुवारीअखेरपर्यंत काम पूर्ण होऊ शकते, असे ते म्हणाले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग