शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
5
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
6
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
7
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
8
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
9
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
10
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
11
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
12
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
13
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
14
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
15
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
16
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
17
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
18
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
19
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
20
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका

जलयुक्तच्या कामांना गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 12:34 AM

जिल्ह्यात यंदा जलयुक्त शिवार योजनेतील कामे तत्काळ सुरू करण्याची संधी असल्याने या कामांना गती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात यंदा जलयुक्त शिवार योजनेतील कामे तत्काळ सुरू करण्याची संधी असल्याने या कामांना गती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे.जिल्हा कचेरीत यासाठी बैठक झाली. यात २0१६-१७ च्या आराखड्यातील राहिलेली कामे तत्काळ करण्यास बजावले. यात मंजूर ३१४५ पैकी २७३२ कामे पूर्ण झाली आहेत. तर १३९ कामे रखडलेली आहेत. ती तत्काळ सुरू करण्यास सांगितले. जि.प. व जलसंधारण विभागाची कामे निविदेतच असल्याने या विभागांनी गती देण्यास सांगण्यात आले.२0१७-१८ च्या आराखड्यातही ८0 गावे निवडण्यात आली आहेत. मात्र आता शासनाने या योजनेत मोठा बदल केला आहे. आता प्रत्येक गावात ७0 टक्के क्षेत्रविकासाच्या कामांना प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे. या योजनेला यंदा ७.६0 लाख मंजूर आहेत. तर ७.४0 कोटींच्या विशेष निधीतील २६७ कामांना ७0 टक्के क्षेत्रविकासांतर्गत मंजुरी दिली आहे. या नव्या बदलामुळे पहिल्या टप्प्यात वनविभाग व कृषी विभागालाच कामे करावी लागणार आहेत. त्यानंतर परिसरातील ड्रेनेज ट्रिटमेंटची कामे केली जाणार आहेत. यात सिमेंट बांध, पाझर तलाव आदी मोठ्या कामांचा समावेश राहणार आहे.