शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

वाहनांची वेगमर्यादा आता ताशी ४० किलोमीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:25 IST

आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार महापालिका हद्दीत आता ताशी ४० किलोमीटर या वेगानेच वाहने चालविता येणार आहेत.

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुसाट वाहने पळविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे लक्षात घेऊन वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार महापालिका हद्दीत आता ताशी ४० किलोमीटर या वेगानेच वाहने चालविता येणार आहेत.

याविषयी वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त एच.एस. भापकर म्हणाले की, ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी वाहनचालक मात्र वेगाची मर्यादा पाळताना दिसत नाही. सुसाट वाहनांमुळे रस्ता अपघात होऊन प्राणहाणी होण्याच्या घटना वाढत आहेत. वेगवान वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याचा निर्णय शुक्रवारी पोलीस आयुक्तांनी घेतला. यासंदर्भात स्वतंत्र अधिसूचना त्यांनी जारी केली.

या अधिसूचनेनुसार महापालिका हद्दीतील वाहनचालकांना त्यांच्या वाहनांचा वेग ताशी ४० किलोमीटर एवढाच ठेवावा लागेल. त्यापेक्षा अधिक वेगात वाहन चालविणाºयाविरोधात मुंबई पोलीस कायदा कलम १३१ नुसार कारवाई केली जाणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूटअत्यावश्यक सेवेत मोडणाºया रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस विभागाच्या वाहनांना मात्र ही वेगमर्यादा लागू होणार नसल्याचे सहायक आयुक्त डॉ. भापकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांना कधीकधी ताशी ४० कि.मी.पेक्षा अधिक वेगाने वाहने चालवावी लागतात. ही बाब लक्षात घेऊन अशा वाहनांना वेगमर्यादेची अट लागू करण्यात आली नाही.

अंमलबजावणी कशी होणार...पोलीस आयुक्तांचा वेगमर्यादेवर अंकुश ठेवण्याचा निर्णस स्वागतार्ह आहे; पण सद्य:स्थितीत वाहतूक पोलिसांकडे केवळ एक स्पीडगन उपलब्ध आहे. शहरासह परिसरातील विविध मार्गांवर या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद