शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वाहनांची वेगमर्यादा आता ताशी ४० किलोमीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:25 IST

आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार महापालिका हद्दीत आता ताशी ४० किलोमीटर या वेगानेच वाहने चालविता येणार आहेत.

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुसाट वाहने पळविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे लक्षात घेऊन वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार महापालिका हद्दीत आता ताशी ४० किलोमीटर या वेगानेच वाहने चालविता येणार आहेत.

याविषयी वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त एच.एस. भापकर म्हणाले की, ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी वाहनचालक मात्र वेगाची मर्यादा पाळताना दिसत नाही. सुसाट वाहनांमुळे रस्ता अपघात होऊन प्राणहाणी होण्याच्या घटना वाढत आहेत. वेगवान वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याचा निर्णय शुक्रवारी पोलीस आयुक्तांनी घेतला. यासंदर्भात स्वतंत्र अधिसूचना त्यांनी जारी केली.

या अधिसूचनेनुसार महापालिका हद्दीतील वाहनचालकांना त्यांच्या वाहनांचा वेग ताशी ४० किलोमीटर एवढाच ठेवावा लागेल. त्यापेक्षा अधिक वेगात वाहन चालविणाºयाविरोधात मुंबई पोलीस कायदा कलम १३१ नुसार कारवाई केली जाणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूटअत्यावश्यक सेवेत मोडणाºया रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस विभागाच्या वाहनांना मात्र ही वेगमर्यादा लागू होणार नसल्याचे सहायक आयुक्त डॉ. भापकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांना कधीकधी ताशी ४० कि.मी.पेक्षा अधिक वेगाने वाहने चालवावी लागतात. ही बाब लक्षात घेऊन अशा वाहनांना वेगमर्यादेची अट लागू करण्यात आली नाही.

अंमलबजावणी कशी होणार...पोलीस आयुक्तांचा वेगमर्यादेवर अंकुश ठेवण्याचा निर्णस स्वागतार्ह आहे; पण सद्य:स्थितीत वाहतूक पोलिसांकडे केवळ एक स्पीडगन उपलब्ध आहे. शहरासह परिसरातील विविध मार्गांवर या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद