शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

तपास यंत्रणेला गतीमान करणार

By admin | Updated: May 18, 2015 00:18 IST

संजय कुलकर्णी , जालना महाराष्ट्रात गुन्ह्यांच्या शिक्षेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ते वाढविण्यासाठी तपास यंत्रणा अधिक गतीमान करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली.

संजय कुलकर्णी , जालनामहाराष्ट्रात गुन्ह्यांच्या शिक्षेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ते वाढविण्यासाठी तपास यंत्रणा अधिक गतीमान करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीद्वारे दिली.रविवारी औरंगाबाद येथून परभणीकडे जाताना गृहराज्यमंत्री शिंदे हे काही काळ शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, राज्यात सद्यस्थितीत पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रकरणात शिक्षेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अनेक प्रकरणांमध्ये साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण तसेच काही ठिकाणी तपासात पोलिस यंत्रणा सक्षम नसणे, सरकारी वकिलांकडून सक्षमपणे बाजू न मांडली जाणे इत्यादी कारणांमुळे शिक्षांचे प्रमाण कमी आहे.शिक्षांचे प्रमाण वाढविण्यासाठी तपास यंत्रणा अधिक गतीमान करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात न्याय वैद्यक प्रयोगशळा, सायबर क्राईम कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या सुविधा देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. कामाचा भार अधिक असल्याने व ताण, तणावांमुळे पोलिसांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत विचारणा केली असता शिंदे म्हणाले, आत्महत्यांचे कारण केवळ कामाचा ताण, तणावच नाही, तर घरातील ताण, तणाव व इतरही आहे. राज्य सरकारने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, पोलिसांच्या कामाचा ताण कमी व्हावा, यासाठी योग्य पाऊल उचलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्वी केवळ ६८ रूपये दिले जात होते. आता एक दिवसाच्या पगाराची रक्कम दिली जाणार आहे. तसेच पोलिसांचे निवासस्थान व इतर सुविधांसाठी शासनाने अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पोलिस खात्यातील बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेपाबद्दल शिंदे म्हणाले, आता बदली प्रक्रियेत राज्य सरकारने पारदर्शकता आणली असून बदल्यांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण केले आहे. तसेच शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उच्चश्रेणीच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही कायद्यानुसार पारदर्शकता आणली आहे.सरकारी वकिलांची नियुक्ती पूर्वी राजकीय हस्तक्षेपातून होत होती. परंतु आता राज्य सरकारने हा राजकीय हस्तक्षेप दूर केला आहे. यापुढे सरकारी वकिलांची नियुक्ती त्रिसदस्यीय समितीद्वारे केली जाणार आहे. विविध खटल्यांचे निकाल लवकर लागावेत, यासाठी न्यायाधिशांची संख्या वाढविण्यात आली आहे.राज्यातील पोलिस भरतीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पोलिसांची संख्या अधिक आहे. राज्यात २ लाख ९० हजार पोलिस कार्यरत आहेत. वेळोवेळी पोलिसांची भरती प्रक्रिया केली जाते, असेही गृह राज्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.