शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

तपास यंत्रणेला गतीमान करणार

By admin | Updated: May 18, 2015 00:18 IST

संजय कुलकर्णी , जालना महाराष्ट्रात गुन्ह्यांच्या शिक्षेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ते वाढविण्यासाठी तपास यंत्रणा अधिक गतीमान करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली.

संजय कुलकर्णी , जालनामहाराष्ट्रात गुन्ह्यांच्या शिक्षेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ते वाढविण्यासाठी तपास यंत्रणा अधिक गतीमान करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीद्वारे दिली.रविवारी औरंगाबाद येथून परभणीकडे जाताना गृहराज्यमंत्री शिंदे हे काही काळ शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, राज्यात सद्यस्थितीत पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रकरणात शिक्षेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अनेक प्रकरणांमध्ये साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण तसेच काही ठिकाणी तपासात पोलिस यंत्रणा सक्षम नसणे, सरकारी वकिलांकडून सक्षमपणे बाजू न मांडली जाणे इत्यादी कारणांमुळे शिक्षांचे प्रमाण कमी आहे.शिक्षांचे प्रमाण वाढविण्यासाठी तपास यंत्रणा अधिक गतीमान करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात न्याय वैद्यक प्रयोगशळा, सायबर क्राईम कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या सुविधा देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. कामाचा भार अधिक असल्याने व ताण, तणावांमुळे पोलिसांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत विचारणा केली असता शिंदे म्हणाले, आत्महत्यांचे कारण केवळ कामाचा ताण, तणावच नाही, तर घरातील ताण, तणाव व इतरही आहे. राज्य सरकारने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, पोलिसांच्या कामाचा ताण कमी व्हावा, यासाठी योग्य पाऊल उचलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्वी केवळ ६८ रूपये दिले जात होते. आता एक दिवसाच्या पगाराची रक्कम दिली जाणार आहे. तसेच पोलिसांचे निवासस्थान व इतर सुविधांसाठी शासनाने अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पोलिस खात्यातील बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेपाबद्दल शिंदे म्हणाले, आता बदली प्रक्रियेत राज्य सरकारने पारदर्शकता आणली असून बदल्यांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण केले आहे. तसेच शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उच्चश्रेणीच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही कायद्यानुसार पारदर्शकता आणली आहे.सरकारी वकिलांची नियुक्ती पूर्वी राजकीय हस्तक्षेपातून होत होती. परंतु आता राज्य सरकारने हा राजकीय हस्तक्षेप दूर केला आहे. यापुढे सरकारी वकिलांची नियुक्ती त्रिसदस्यीय समितीद्वारे केली जाणार आहे. विविध खटल्यांचे निकाल लवकर लागावेत, यासाठी न्यायाधिशांची संख्या वाढविण्यात आली आहे.राज्यातील पोलिस भरतीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पोलिसांची संख्या अधिक आहे. राज्यात २ लाख ९० हजार पोलिस कार्यरत आहेत. वेळोवेळी पोलिसांची भरती प्रक्रिया केली जाते, असेही गृह राज्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.