शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

७१ टक्के क्षेत्रावर होणार सोयाबीनचा पेरा

By admin | Updated: June 6, 2016 00:26 IST

लातूर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, यंदा खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार

लातूर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, यंदा खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचा कृषी विभागाचा निष्कर्ष असून, केवळ २९ टक्के क्षेत्रावर अन्य पिके घेतली जातील. त्यामुळे कृषी विभागाने सोयाबीनच्या बियाणांबाबत तसेच खताच्या पुरवठ्याचे नियोजन केले असून, २.५८ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागणार आहेत.लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ३ लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. ५ लाख ५६ हजारांपैकी ३ लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. ७१ टक्के क्षेत्र सोयाबीनने व्यापणार आहे. केवळ २९ टक्के क्षेत्रावर तूर, मूग, उडीद, साळ, हायब्रीड ज्वारी, सूर्यफुल, तीळ, भुईमूग, लहान कारळ, पिवळी ज्वारी आदी पिके घेतली जाणार आहेत. हायब्रीड ज्वारी ७५ हजार हेक्टर, तूर १ लाख १ हजार हेक्टर, मूग २० हजार, उडीद ११ हजार आणि कापूस २ हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. पण सोयाबीनचा पेरा तब्बल ३ लाख ९७ हजार हेक्टर होणार आहे. या खरीप पिकासाठी ऐनवेळी शेतकऱ्यांची धावपळ होऊ नये म्हणून बियाणी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. एकूण बियाणे २.५८ लाख क्विंटल लागणार आहेत. या बियाण्यात गतवर्षीचे सोयाबीन ३० टक्के बियाणे म्हणून उपलब्ध होईल. १.३० लाख शेतकऱ्यांकडून बियाणे उपलब्ध होतील. तर विविध कंपन्यांकडून १.२९ लाख बियाणे उपलब्ध होत आहेत. महाबीजकडून ८० हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्यापैकी ६५ हजार क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहेत. अन्य कंपन्यांकडूनही बियाणे उपलब्ध होत असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रबी हंगामातील ४२ टन खत शिल्लक असून, तो खरीप हंगामासाठी वापरता येणार आहे. शिवाय, या हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक टन खत मंजूर झाला असून, रबी व या हंगामातील मिळून १ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. खताची या हंगामात कसलीही कमतरता भासणार नाही, असेही जिल्हा विकास कृषी अधिकारी रणदिवे यांनी सांगितले. सोयाबीन बियाणासाठी महाबीजची एक बॅग २५०० रुपयाला असून, महाबीज गुजरात २३५० रुपये, महाबीज गुजरात २७०० रुपये, रायझिंग सीडस् २५५०, एमटीके यशोदा २५०० रुपयाला उपलब्ध आहे. ही एमआरपी किंमत असून, या एमआरपी किंमती पाहूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावेत. त्याची पावती विक्रेत्यांकडून हस्तगत करावी. सोयाबीन उगवेपर्यंत ती जपून ठेवावी. काही तक्रार असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक खताची गरज आहे. परंतु, रबी हंगामातील ४२ हजार मेट्रिक टन आणि यंदा या हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आला आहे. एकूण १ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झालेला आहे. गरजेपेक्षा ४६ हजार मेट्रिक टन खत आपल्याकडे अधिकचा आहे. त्यामुळे खत टंचाई यंदा उद्भवणार नाही, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले.