शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

७१ टक्के क्षेत्रावर होणार सोयाबीनचा पेरा

By admin | Updated: June 6, 2016 00:26 IST

लातूर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, यंदा खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार

लातूर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, यंदा खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचा कृषी विभागाचा निष्कर्ष असून, केवळ २९ टक्के क्षेत्रावर अन्य पिके घेतली जातील. त्यामुळे कृषी विभागाने सोयाबीनच्या बियाणांबाबत तसेच खताच्या पुरवठ्याचे नियोजन केले असून, २.५८ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागणार आहेत.लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ३ लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. ५ लाख ५६ हजारांपैकी ३ लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. ७१ टक्के क्षेत्र सोयाबीनने व्यापणार आहे. केवळ २९ टक्के क्षेत्रावर तूर, मूग, उडीद, साळ, हायब्रीड ज्वारी, सूर्यफुल, तीळ, भुईमूग, लहान कारळ, पिवळी ज्वारी आदी पिके घेतली जाणार आहेत. हायब्रीड ज्वारी ७५ हजार हेक्टर, तूर १ लाख १ हजार हेक्टर, मूग २० हजार, उडीद ११ हजार आणि कापूस २ हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. पण सोयाबीनचा पेरा तब्बल ३ लाख ९७ हजार हेक्टर होणार आहे. या खरीप पिकासाठी ऐनवेळी शेतकऱ्यांची धावपळ होऊ नये म्हणून बियाणी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. एकूण बियाणे २.५८ लाख क्विंटल लागणार आहेत. या बियाण्यात गतवर्षीचे सोयाबीन ३० टक्के बियाणे म्हणून उपलब्ध होईल. १.३० लाख शेतकऱ्यांकडून बियाणे उपलब्ध होतील. तर विविध कंपन्यांकडून १.२९ लाख बियाणे उपलब्ध होत आहेत. महाबीजकडून ८० हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्यापैकी ६५ हजार क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहेत. अन्य कंपन्यांकडूनही बियाणे उपलब्ध होत असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रबी हंगामातील ४२ टन खत शिल्लक असून, तो खरीप हंगामासाठी वापरता येणार आहे. शिवाय, या हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक टन खत मंजूर झाला असून, रबी व या हंगामातील मिळून १ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. खताची या हंगामात कसलीही कमतरता भासणार नाही, असेही जिल्हा विकास कृषी अधिकारी रणदिवे यांनी सांगितले. सोयाबीन बियाणासाठी महाबीजची एक बॅग २५०० रुपयाला असून, महाबीज गुजरात २३५० रुपये, महाबीज गुजरात २७०० रुपये, रायझिंग सीडस् २५५०, एमटीके यशोदा २५०० रुपयाला उपलब्ध आहे. ही एमआरपी किंमत असून, या एमआरपी किंमती पाहूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावेत. त्याची पावती विक्रेत्यांकडून हस्तगत करावी. सोयाबीन उगवेपर्यंत ती जपून ठेवावी. काही तक्रार असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक खताची गरज आहे. परंतु, रबी हंगामातील ४२ हजार मेट्रिक टन आणि यंदा या हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आला आहे. एकूण १ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झालेला आहे. गरजेपेक्षा ४६ हजार मेट्रिक टन खत आपल्याकडे अधिकचा आहे. त्यामुळे खत टंचाई यंदा उद्भवणार नाही, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले.