शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

७१ टक्के क्षेत्रावर होणार सोयाबीनचा पेरा

By admin | Updated: June 6, 2016 00:26 IST

लातूर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, यंदा खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार

लातूर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, यंदा खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचा कृषी विभागाचा निष्कर्ष असून, केवळ २९ टक्के क्षेत्रावर अन्य पिके घेतली जातील. त्यामुळे कृषी विभागाने सोयाबीनच्या बियाणांबाबत तसेच खताच्या पुरवठ्याचे नियोजन केले असून, २.५८ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागणार आहेत.लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ३ लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. ५ लाख ५६ हजारांपैकी ३ लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. ७१ टक्के क्षेत्र सोयाबीनने व्यापणार आहे. केवळ २९ टक्के क्षेत्रावर तूर, मूग, उडीद, साळ, हायब्रीड ज्वारी, सूर्यफुल, तीळ, भुईमूग, लहान कारळ, पिवळी ज्वारी आदी पिके घेतली जाणार आहेत. हायब्रीड ज्वारी ७५ हजार हेक्टर, तूर १ लाख १ हजार हेक्टर, मूग २० हजार, उडीद ११ हजार आणि कापूस २ हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. पण सोयाबीनचा पेरा तब्बल ३ लाख ९७ हजार हेक्टर होणार आहे. या खरीप पिकासाठी ऐनवेळी शेतकऱ्यांची धावपळ होऊ नये म्हणून बियाणी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. एकूण बियाणे २.५८ लाख क्विंटल लागणार आहेत. या बियाण्यात गतवर्षीचे सोयाबीन ३० टक्के बियाणे म्हणून उपलब्ध होईल. १.३० लाख शेतकऱ्यांकडून बियाणे उपलब्ध होतील. तर विविध कंपन्यांकडून १.२९ लाख बियाणे उपलब्ध होत आहेत. महाबीजकडून ८० हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्यापैकी ६५ हजार क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहेत. अन्य कंपन्यांकडूनही बियाणे उपलब्ध होत असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रबी हंगामातील ४२ टन खत शिल्लक असून, तो खरीप हंगामासाठी वापरता येणार आहे. शिवाय, या हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक टन खत मंजूर झाला असून, रबी व या हंगामातील मिळून १ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. खताची या हंगामात कसलीही कमतरता भासणार नाही, असेही जिल्हा विकास कृषी अधिकारी रणदिवे यांनी सांगितले. सोयाबीन बियाणासाठी महाबीजची एक बॅग २५०० रुपयाला असून, महाबीज गुजरात २३५० रुपये, महाबीज गुजरात २७०० रुपये, रायझिंग सीडस् २५५०, एमटीके यशोदा २५०० रुपयाला उपलब्ध आहे. ही एमआरपी किंमत असून, या एमआरपी किंमती पाहूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावेत. त्याची पावती विक्रेत्यांकडून हस्तगत करावी. सोयाबीन उगवेपर्यंत ती जपून ठेवावी. काही तक्रार असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक खताची गरज आहे. परंतु, रबी हंगामातील ४२ हजार मेट्रिक टन आणि यंदा या हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आला आहे. एकूण १ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झालेला आहे. गरजेपेक्षा ४६ हजार मेट्रिक टन खत आपल्याकडे अधिकचा आहे. त्यामुळे खत टंचाई यंदा उद्भवणार नाही, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले.