शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

तथाकथित समाजवाद्यांचा विद्यापीठ स्थापनेपासूनच बाबासाहेबांच्या नावाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 18:57 IST

लढा नामविस्ताराचा : १९५७ साली औरंगाबादेत विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासूनच या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी पुढे येत होती. पण तत्कालीन तथाकथित समाजवाद्यांनी बाबासाहेबांच्या नावाला तेव्हाही विरोधच दर्शविला होता.

- स. सो. खंडाळकर

मराठवाडा विकास आंदोलनानंतर रिपब्लिकन विद्यार्थी संघाचा अध्यक्ष या नात्याने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे २६ जून १९७४ रोजी पत्र पाठवून विविध मागण्यांसह पहिल्यांदा मी  मराठवाडा विद्यापीठ नामांतराची मागणी केली होती, याकडे प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांनी लक्ष वेधले आहे. येत्या १४ जानेवारी रोजी विद्यापीठ नामांतराचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. वाहूळ हे ‘लोकमत’शी बोलत होते. 

मागणी मी केली, हे वास्तव व त्याला अवघ्या वीस दिवसांत वसंतराव नाईक यांनी लेखी उत्तर देऊन अनुकूलता दर्शविली होती, हेही वास्तवच. मात्र सरकारी नोकरीत गेल्यानंतर मी नामांतर लढ्यात प्रत्यक्ष सहभागी नव्हतो, असे वाहूळ यांनी सांगितले. विद्यापीठ स्थापनेच्या वेळी इतर नावांप्रमाणेच बाबासाहेबांचेही नाव होते. पण विद्यापीठांना त्या- त्या प्रदेशाची वा शहरांची नावे दिली जातात, असा युक्तिवाद करून मराठवाडा विद्यापीठ असे नाव दिले गेले. पण बाबासाहेबांचे नाव न देणे हे त्या काळच्या विद्यार्थ्यांना खटकले होते. १९६० साली कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ सुरू झाले. १९७० साली अंबाजोगाईला सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ असे नाव देण्यात आले. वसमतला गोळीबार झाल्यानंतर राज्यभरात चार कृषी विद्यापीठे सुरू झाली. पण कोकण आणि परभणी येथील कृषी विद्यापीठास नावे दिली गेली नाहीत. अकोल्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व राहुरीला महात्मा जोतिबा फुले कृषी विद्यापीठ सुरू करण्यात आले.

१९७२ च्या मराठवाडा विकास आंदोलनात माझे मतभेद झाले. त्या काळात वसंतराव नाईक यांच्या विरोधात वातावरण पेटविण्यात आले होते. समतोल विकास म्हणत असताना विकास कुणाचा? असा सवाल मी उपस्थित केला होता व मी बाहेर पडलो. पुढे कल्याणराव पाटील यांच्यामार्फत मी नाईक यांच्या संपर्कात आलो आणि आमच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी हा विद्यापीठ नामांतराचा विषय निघाला होता. मराठवाडा नावाचे दोन विद्यापीठे असल्याने संभ्रम निर्माण होतो म्हणून औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, ही माझ्या निवेदनातील पाचव्या क्रमांकावर मागणी होती, अशी माहिती वाहूळ यांनी दिली.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद