शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

तथाकथित समाजवाद्यांचा विद्यापीठ स्थापनेपासूनच बाबासाहेबांच्या नावाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 18:57 IST

लढा नामविस्ताराचा : १९५७ साली औरंगाबादेत विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासूनच या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी पुढे येत होती. पण तत्कालीन तथाकथित समाजवाद्यांनी बाबासाहेबांच्या नावाला तेव्हाही विरोधच दर्शविला होता.

- स. सो. खंडाळकर

मराठवाडा विकास आंदोलनानंतर रिपब्लिकन विद्यार्थी संघाचा अध्यक्ष या नात्याने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे २६ जून १९७४ रोजी पत्र पाठवून विविध मागण्यांसह पहिल्यांदा मी  मराठवाडा विद्यापीठ नामांतराची मागणी केली होती, याकडे प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांनी लक्ष वेधले आहे. येत्या १४ जानेवारी रोजी विद्यापीठ नामांतराचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. वाहूळ हे ‘लोकमत’शी बोलत होते. 

मागणी मी केली, हे वास्तव व त्याला अवघ्या वीस दिवसांत वसंतराव नाईक यांनी लेखी उत्तर देऊन अनुकूलता दर्शविली होती, हेही वास्तवच. मात्र सरकारी नोकरीत गेल्यानंतर मी नामांतर लढ्यात प्रत्यक्ष सहभागी नव्हतो, असे वाहूळ यांनी सांगितले. विद्यापीठ स्थापनेच्या वेळी इतर नावांप्रमाणेच बाबासाहेबांचेही नाव होते. पण विद्यापीठांना त्या- त्या प्रदेशाची वा शहरांची नावे दिली जातात, असा युक्तिवाद करून मराठवाडा विद्यापीठ असे नाव दिले गेले. पण बाबासाहेबांचे नाव न देणे हे त्या काळच्या विद्यार्थ्यांना खटकले होते. १९६० साली कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ सुरू झाले. १९७० साली अंबाजोगाईला सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ असे नाव देण्यात आले. वसमतला गोळीबार झाल्यानंतर राज्यभरात चार कृषी विद्यापीठे सुरू झाली. पण कोकण आणि परभणी येथील कृषी विद्यापीठास नावे दिली गेली नाहीत. अकोल्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व राहुरीला महात्मा जोतिबा फुले कृषी विद्यापीठ सुरू करण्यात आले.

१९७२ च्या मराठवाडा विकास आंदोलनात माझे मतभेद झाले. त्या काळात वसंतराव नाईक यांच्या विरोधात वातावरण पेटविण्यात आले होते. समतोल विकास म्हणत असताना विकास कुणाचा? असा सवाल मी उपस्थित केला होता व मी बाहेर पडलो. पुढे कल्याणराव पाटील यांच्यामार्फत मी नाईक यांच्या संपर्कात आलो आणि आमच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी हा विद्यापीठ नामांतराचा विषय निघाला होता. मराठवाडा नावाचे दोन विद्यापीठे असल्याने संभ्रम निर्माण होतो म्हणून औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, ही माझ्या निवेदनातील पाचव्या क्रमांकावर मागणी होती, अशी माहिती वाहूळ यांनी दिली.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद