शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

स्मार्ट शहरांना वाढीव निधी नाही; दोन हजार कोटी अतिरिक्त देण्याची घोषणा हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 19:14 IST

केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांनी १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील ८ स्मार्ट शहरांना अतिरिक्त २ हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

ठळक मुद्दे सध्या सुरू असलेल्या कामांना अंतिम स्वरूप देणे, निविदा प्रक्रियेतील कामे संपविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च २०२२ पर्यंत प्रकल्प गुंडाळण्याचा इशारा यापूर्वीच केंद्राने दिला आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील ८ स्मार्ट शहरांना अतिरिक्त २ हजार कोटी रुपये देण्याची घोषणा अलीकडेच केंद्र शासनाने केली होती. मात्र, ही घोषणा हवेतच विरली आहे. राज्यातील एकाही स्मार्ट सिटी शहराला यासंदर्भात किती निधी देणार याचा तपशील देण्यात आलेला नाही. उलट सध्या सुरू असलेले, तसेच निविदा प्रक्रियेतील कामे मार्च २०२२ पर्यंत संपवा, असा तगादा केंद्र शासनाने लावला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांनी १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील ८ स्मार्ट शहरांना अतिरिक्त २ हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली. यासाठी राज्यस्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली होती. मात्र, मागील दहा दिवसांमध्ये राज्यातील एकाही स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापनाला अतिरिक्त निधी किती दिला जाणार आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही घोषणाही हवेतच विरणार असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी केंद्राकडून अतिरिक्त निधी देण्यासंदर्भात कोणतीही सूचना, पत्रव्यवहार अद्यापपर्यंत झालेला नाही. उलट सध्या सुरू असलेल्या कामांना अंतिम स्वरूप देणे, निविदा प्रक्रियेतील कामे संपविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च २०२२ पर्यंत प्रकल्प गुंडाळण्याचा इशारा यापूर्वीच केंद्राने दिला आहे. त्यामुळे आता अतिरिक्त निधी कशासाठी मिळेल, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. २०१५-१६ या आर्थिक वर्षात केंद्र शासनाला वेगवेगळ्या स्मार्ट शहरांनी आपले प्रकल्प अहवाल सादर केले. त्यानुसार केंद्राने सर्वांना ५० टक्के दिला आहे. २५ टक्के राज्य शासनाचा वाटा, २५ टक्के संबधित महापालिकांचा वाटा निश्चित करण्यात आला आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आम्हाला अद्याप कोणतीही पूर्वसूचना नाहीकेंद्र शासन राज्यातील ८ शहरांना अतिरिक्त निधी मिळणार असल्याचे वर्तमानपत्रातच वाचले. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतीही पूर्वसूचना आतापर्यंत देण्यात आलेली नाही. केंद्राकडून कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. प्रकल्प आराखड्यानुसार केंद्र, राज्याने आतापर्यंत निधी दिला आहे. अतिरिक्त निधीतून कोणती कामे करणार, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.- अरुण शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटी