शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

लघु प्रकल्प तळाला; मासेमारीवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:15 IST

जलसाठ्यांमधील पाणी झपाट्याने कमी होत चालले असून, त्याचा परिणाम मासेफलनावर झाला आहे. त्यामुळे मासेमारीचा व्यवसाय संकटात आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९३ पैकी बहुतांश लघु पाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठलेला असताना मासेमारी परवाने घेण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे. सध्या ९३ लघु प्रकल्पांत १३.५ टक्के जलसाठा आहे. जलसाठ्यांमधील पाणी झपाट्याने कमी होत चालले असून, त्याचा परिणाम मासेफलनावर झाला आहे. त्यामुळे मासेमारीचा व्यवसाय संकटात आहे. ३४ लघु प्रकल्प कोरडे पडले असून, २७ प्रकल्प जोत्याखाली आहेत. एका प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे. १० प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, ११ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, तर १० प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.

जानेवारी २०१६ मध्ये लघु प्रकल्पांमध्ये ४३ टक्के पाणी होते. २०१७ मध्ये ४२ टक्के होते. २०१८-१९ मध्ये १३ टक्के पाणीसाठा आहे. यावरून प्रकल्पांतील जलसाठ्याचे अनुमान लावता येते.

उन्हाळा तोंडावर आहे, अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याबाबत विभागीय आणि जिल्हापातळीवर मोठ्या प्रमाणात नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्यांनी २०१८-१९ या वर्षात तलाव ठेक्याने घेतलेले नाहीत. त्या तलावात, जलाशयात स्थानिक मासेमार, संस्थेच्या सभासदांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासन धोरणानुसार परवाने घेऊन मासेमारी करण्यासाठी विभाग सरसावला आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन असे...जिल्ह्यातील मोटेगाव, हाजी पीरवाडी, खारी खामगाव, अंजनडोह, निंभोरा, दावरवाडी, आळंद, केळगाव, देºहळ, निमखेडी, गोंदेगाव, अंजना, हनुमंतखेडा, वरठाण, बनोटी, गिरसावळी, मावसाळा, निरगुडी, गाढेपिंपळगाव, भिलवणी, मन्याड, औराळा, देवपुडी, मुंगसापूर, गोलटगाव, देवगाव रंगारी, नारंगी-सारंगी, वाकोद, अंबाडी आदी ३० तलाव ठेक्याने गेलेले नाहीत. या तलावात स्थानिक मच्छीमारांना मासेसारी परवाने घेऊन मासेमारी करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. विनापरवाना मासेमारी करू नये. परवाना न घेता अवैध मासेमारी करताना आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा विभागाने दिला आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcollectorजिल्हाधिकारी