शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

लघु प्रकल्प तळाला; मासेमारीवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:15 IST

जलसाठ्यांमधील पाणी झपाट्याने कमी होत चालले असून, त्याचा परिणाम मासेफलनावर झाला आहे. त्यामुळे मासेमारीचा व्यवसाय संकटात आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९३ पैकी बहुतांश लघु पाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठलेला असताना मासेमारी परवाने घेण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे. सध्या ९३ लघु प्रकल्पांत १३.५ टक्के जलसाठा आहे. जलसाठ्यांमधील पाणी झपाट्याने कमी होत चालले असून, त्याचा परिणाम मासेफलनावर झाला आहे. त्यामुळे मासेमारीचा व्यवसाय संकटात आहे. ३४ लघु प्रकल्प कोरडे पडले असून, २७ प्रकल्प जोत्याखाली आहेत. एका प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे. १० प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, ११ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, तर १० प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.

जानेवारी २०१६ मध्ये लघु प्रकल्पांमध्ये ४३ टक्के पाणी होते. २०१७ मध्ये ४२ टक्के होते. २०१८-१९ मध्ये १३ टक्के पाणीसाठा आहे. यावरून प्रकल्पांतील जलसाठ्याचे अनुमान लावता येते.

उन्हाळा तोंडावर आहे, अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याबाबत विभागीय आणि जिल्हापातळीवर मोठ्या प्रमाणात नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्यांनी २०१८-१९ या वर्षात तलाव ठेक्याने घेतलेले नाहीत. त्या तलावात, जलाशयात स्थानिक मासेमार, संस्थेच्या सभासदांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासन धोरणानुसार परवाने घेऊन मासेमारी करण्यासाठी विभाग सरसावला आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन असे...जिल्ह्यातील मोटेगाव, हाजी पीरवाडी, खारी खामगाव, अंजनडोह, निंभोरा, दावरवाडी, आळंद, केळगाव, देºहळ, निमखेडी, गोंदेगाव, अंजना, हनुमंतखेडा, वरठाण, बनोटी, गिरसावळी, मावसाळा, निरगुडी, गाढेपिंपळगाव, भिलवणी, मन्याड, औराळा, देवपुडी, मुंगसापूर, गोलटगाव, देवगाव रंगारी, नारंगी-सारंगी, वाकोद, अंबाडी आदी ३० तलाव ठेक्याने गेलेले नाहीत. या तलावात स्थानिक मच्छीमारांना मासेसारी परवाने घेऊन मासेमारी करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. विनापरवाना मासेमारी करू नये. परवाना न घेता अवैध मासेमारी करताना आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा विभागाने दिला आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcollectorजिल्हाधिकारी