शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून गाळ उपसा

By admin | Updated: April 16, 2016 01:44 IST

शिवना : शिवना येथील रहिवासी पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांना रबीची पिके घेता आली नाहीत

शिवना : शिवना येथील रहिवासी पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांना रबीची पिके घेता आली नाहीत. शिवाय गावातील निजामकालीन साठवण तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. त्यामुळे तलावाची साठवण क्षमता कमी झाली. ही बाब निदर्शनास येताच गावकऱ्यांनी लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्यास एक महिन्यापासून सुरुवात केली. आतापर्यंत सुमारे २० हजार ब्रॉस गाळ काढण्यात आला आहे.येथील निजामकालीन तलावातील गाळ काढण्यासाठी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी उर्त्स्फू त सहभाग नोंदविला आहे. दोन जेसीबी, चारशे ट्रॅक्टरच्या माध्यमातून रोज शेकडो ब्रास गाळ काढण्यात येत आहे. शेतकरी हा गाळ काढून आपल्या शेतात नेऊन टाकत आहेत. शिवना येथील गावतलाव निजामकालीन असून, तलावाच्या निर्मितीनंतर पाऊस, सांडपाणी व अन्य माध्यमातून तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तलावातील साठवण क्षमता कमी झाली आहे. गावासह आजूबाजूच्या परिसरातील शेतीला पिण्याच्या पाण्यासाठी हा तलाव महत्त्वाचा होता. या तलावात निम्म्याहून अधिक प्रमाणात गाळ साचल्याने तलावाची साठवण क्षमता कमी झालेली आहे.२००२ मध्ये शिवना येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. तेव्हा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तत्कालीन आमदार स्व. किसनराव काळे यांच्या पुढाकाराने अमृत जलधारा अभियानांतर्गत या तलावातील गाळ काढण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व्ही. राधा यांनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर २००३ मध्ये या तलावाचा जलसाठा वाढल्याने पाणीटंचाईवर मात करण्यात गावकरी यशस्वी झाले होते.२००४ मध्ये महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाची शिवना- मादणी संयुक्त पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. परिणामी, २००४ पासून गावतलावाकडे दुर्लक्ष झाले होते. या वर्षी शेतकऱ्यांनी पुढाकार घेत शिवना तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. लोकसहभागातून एक महिन्यापूर्वी ही मोहीम सुरू झाली. परिसरातील खडकाळ जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा पोत सुधारण्याच्या उद्देशाने स्वखर्चाने या तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली. आता गाळ काढून नेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. तेथे दोन जेसीबी, एक पोकलेन आणि चारशे ट्रॅक्टरच्या साहाय्याने जवळपास २० हजार ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला आहे.