शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रूंदीकरणात वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 22:25 IST

राज्य शासनाने सध्या रस्ते विकासावर भर दिला आहे. बहुतांश रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात असून रस्ते रूंद केले जात आहेत. हे सिमेंटचे जंगल उभे करण्यासाठी लाखमोलाच्या वृक्षांची मात्र सर्रास कत्तल केली जात आहे. तेवढी झाडे लावली तर ठीक; पण त्याकडेही कंत्राटदार दुर्लक्ष करतात.

ठळक मुद्देसेवाग्राम ते मांडगाव मार्गावरील प्रकार : वर्धा ते देवळी रस्त्यासह शहरातही वृक्षतोड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाने सध्या रस्ते विकासावर भर दिला आहे. बहुतांश रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात असून रस्ते रूंद केले जात आहेत. हे सिमेंटचे जंगल उभे करण्यासाठी लाखमोलाच्या वृक्षांची मात्र सर्रास कत्तल केली जात आहे. तेवढी झाडे लावली तर ठीक; पण त्याकडेही कंत्राटदार दुर्लक्ष करतात. परिणामी, मार्ग भकास होत आहेत. याकडे लक्ष देत कंत्राटदारांकडून तोडलेल्या झाडांच्या दुप्पट-तिप्पट झाडे लावून घेणे गरजेचे झाले आहे.जिल्ह्यात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. वर्धा शहरात बॅचलर रोड, बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सेवाग्राम ते मांडगाव व वर्धा ते यवतमाळ या मार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. हे करीत असताना रस्त्याच्या कडेला कित्येक वर्षांपासून असलेले वृक्ष सर्रास कापली जात आहेत. यामुळे हे मार्ग भकास होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता मागील काही वर्षांपासून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे; पण त्याची फलश्रूती होत नसल्याचेच दिसून येत आहे. एकीकडे वृक्ष लागवड करायची आणि तीच झाडे विकासाच्या नावावर सर्रास कापायची, असा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू आहे. सेवाग्राम ते मांडगाव मार्गावर शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. आता रस्त्याच्या दुतर्फा किती वृक्ष लावले जातील की त्याकडे दुर्लक्ष केले जाईल, हे वेळच सांगणार आहे. असे असले तरी वृक्षतोडीमुळे सध्यातरी रस्ते भकास झाले असून पर्यावरणाची हानी झाली आहे.वृक्षतोडीतूनही कंत्राटदार करतात कमाईरस्ते विकासाची कामे सुरू असताना शेकडो झाडे कापली जातात. वास्तविक, सदर वृक्ष शासनाची मालमत्ता असते; पण बहुतांश ठिकाणी कंत्राटदारच यातून कमाई करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. रस्ता रूंदीकरणाचे काम घेतलेले कंत्राटदार रस्त्याच्या बाजूची झाडे कापण्याकरिता अन्य कंत्राटदाराला कंत्राट देतात. यात शासनाला महसूल बुडविला जात असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.शिवाय लाकूड चोरही यात हात साफ करीत असल्याचे दिसून येत आहे. सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रास वृक्षतोड केली जात आहे. देवळी मार्गावरही वृक्षतोड करण्यात आली आहे. शहरातील रस्ता रूंदीकरणासाठीही लाखमोलाची झाडे कापली गेली. यामुळे सर्वत्र सिमेंटचे जंगल निर्माण होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी, पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता प्रत्येक मार्गावर वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.