शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

कुलगुरूंच्या वाहनचालकासह १६ जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 19:32 IST

विद्यापीठात १५ टक्के कर्मचारी येत असताना, नियमांचे पालन केले जात असतानाही कोरोना होत आहे. या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे. 

ठळक मुद्देविद्यापीठात आठ दिवसांच्या लॉकडाऊनपूर्वीच कोरोनाने शिरकाव केला होता.लॉकडाऊननंतर कोरोनाचा विळखा विद्यापीठाला पडला आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरूंच्या वाहनचालकासह १६ अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सव्वालाख विद्यार्थ्यांची परीक्षा या काळात कशी घेणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे. 

विद्यापीठात आठ दिवसांच्या लॉकडाऊनपूर्वीच कोरोनाने शिरकाव केला होता. दोन प्राध्यापक पॉझिटिव्ह आढळले होते. लॉकडाऊननंतर कोरोनाचा विळखा विद्यापीठाला पडला आहे. एका उपकुलसचिवांसह काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची कोविड-१९ ची तपासणी केली असता पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामुळे विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याशिवाय कुलगुरूंच्या वाहनचालकासह इतर एक वाहनचालक पॉझिटिव्ह आढळला आहे. आतापर्यंत विद्यापीठात एकूण १६ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मात्र, विद्यापीठ प्रशासनाने त्यास दुजोरा दिला नाही. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन प्राध्यापकांसह एक अधिकारी आणि इतर काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगितले, तसेच विद्यापीठ परिसर, मुख्य प्रशासकीय इमारत आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.  याशिवाय तापमान तपासणी, सॅनिटायझर उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच विद्यापीठात १५ टक्के कर्मचारी कामावर येत आहेत. ज्याच्या टेबलवर काम आहे असे लोक येऊन काम करून जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी महापालिकेला अर्ज पाठवून विद्यापीठातील सर्वच कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्याची विनंती केली जाणार असल्याचेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. विद्यापीठात १५ टक्के कर्मचारी येत असताना, नियमांचे पालन केले जात असतानाही कोरोना होत आहे. या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे. 

कुलपती, कुलगुरू असुरक्षित, तिथे विद्यार्थ्यांचे काय होणार विद्यापीठाचे कुलपती राहत असलेल्या राजभवनात कोरोनाचा शिरकाव झाला. आता विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या वाहनचालकाला कोरोना झाला. कुलपती, कुलगुरू सुरक्षित राहू शकत नाहीत, त्याठिकाणी कोणत्याही सुविधा नसणारा विद्यार्थी कसा सुरक्षित राहील. कुलपतींनी तर मुंबई सोडून नागपूरला मुक्काम हलवला आहे. त्यांना स्वत:ची काळजी वाटते. मग विद्यार्थ्यांची काळजी कोण घेणार आहे. - डॉ. नीलेश आंबेवाडीकर, प्रवक्ता, युवक काँग्रेस

युजीसी, कुलपतींनी विचार करावाविद्यापीठात सध्या १५ टक्के कर्मचारी कामावर येत आहेत. त्यातील १६ जणांना बाधा झाली. कामावर येणारे १०० पेक्षा कमी कर्मचारी सुरक्षित राहू शकत नाहीत, तर एकाच वेळी सव्वालाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्यास ते कसे सुरक्षित राहतील, याचा विचार युजीसी, कुलपती यांनी केला पाहिजे. - डॉ. तुकाराम सराफ, विद्यार्थी सेना 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद