शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

साहेब, आमदार रोडवर जायचे कसे? सातारावासीयांना पडला प्रश्न; वाहनधारकांचा जीव मुठीत

By साहेबराव हिवराळे | Updated: February 29, 2024 19:06 IST

संग्रामनगर पुलावरून उतरल्यावर बायपासला जावे लागते ‘विरुद्ध दिशेला’

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासचा कायापालट करून नुकतेच तीन फ्लायओव्हर उभारण्यात आले. मात्र, या बायपासला सर्व्हिस रोडचे काम सुरू करून नागरिकांना पुन्हा वेठीस धरणे सुरू झाले आहे. पादचारी, वाहनधारक सर्वांनाच जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून जावे लागत आहे. सर्व्हिस रोडचे काम सुरू झाल्याने नाइलाजाने संग्रामनगर पुलावरून बायपासच्या खालून विरुद्ध दिशेने तर कायमच अपघातास आमंत्रण दिले जात आहे. इथे या रस्त्यावरील प्रवास नेमका जीवघेणा ठरत आहे.

नेमके काय होत आहे ?- सातारा आमदार रोडवरून घरी जाताना त्यांंना या रस्त्याचा अंदाजच येत नसल्याने या रस्त्यावरील प्रवास गुंतागुंतीचा ठरत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलिस, महानगरपालिका प्रशासनाने एकत्र लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.- पुलावरून येताना सातारा यू टर्न घेऊन जाणे सोपे; परंतु संग्रामनगरकडून दवाखान्यासमोरून चार रस्ते ओलांडून यू टर्न करून गाडी चालवणे धोक्याचे ठरते आहे. कारण इथे सिग्नल नाही. वाहतूक पोलिसही नसतो आणि असल्यास तो काहीही सांगत नाही. यामुळे वारंवार अपघात होत आहेत.

किती दिवस लागणार ?रस्त्याच्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम सुरू असून, एमआयटीकडून येणाऱ्या रस्त्यावर पुलाखालूनच जीव मुठीत धरून सातारा गावात प्रवास करावा लागणार का?- गणेश पवार (नागरिक)

महिला, मुलांसाठी अधिक धोकाशहरातून येणाऱ्या महिला व लहान मुलांंना ये-जा करावी लागते. विरुद्ध दिशेने वाहने पळविणे त्रासदायक ठरते आहे.- विजय कुडे (नागरिक)

अपघात नको म्हणून पूल...अपघाताच्या घटना टाळाव्यात म्हणून रस्ता मोठा झाला. पूल टाकला; परंतु रस्ता बनविताना सामान्य नागरिकांना का विचारात घेतले नाही. साताऱ्यात जावे कसे ?- प्रवीण पवार (नागरिक)

येथे अनेकदा भांडणे होतात...पुलावर जाणे तर दूरच राहिले. वाहतूक पोलिसांसमोरच सर्व वाहनधारक या गुंतागुतींच्या रस्त्यावरून आडवे जातात. गावात जाताना अडचणीला तोंड दिले जाते.- शैलेश सांगोळे (नागरिक)

सिग्नल हवेसिग्नल लावण्याची जबाबदारी कोणाची हे पाहायला हवे. वाहतुकीला नियम लावण्याचे काम पोलिसांचे तर सिग्नल लावण्याची जबाबदारी मनपाची असून त्याकडे लक्ष प्रशासनाने द्यावे, अन्यथा यू टर्न मार्ग पुलावरून घ्यावा.- सुनील कोळसे, शाखा अभियंता. 

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा