शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

साहेब, आमदार रोडवर जायचे कसे? सातारावासीयांना पडला प्रश्न; वाहनधारकांचा जीव मुठीत

By साहेबराव हिवराळे | Updated: February 29, 2024 19:06 IST

संग्रामनगर पुलावरून उतरल्यावर बायपासला जावे लागते ‘विरुद्ध दिशेला’

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासचा कायापालट करून नुकतेच तीन फ्लायओव्हर उभारण्यात आले. मात्र, या बायपासला सर्व्हिस रोडचे काम सुरू करून नागरिकांना पुन्हा वेठीस धरणे सुरू झाले आहे. पादचारी, वाहनधारक सर्वांनाच जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून जावे लागत आहे. सर्व्हिस रोडचे काम सुरू झाल्याने नाइलाजाने संग्रामनगर पुलावरून बायपासच्या खालून विरुद्ध दिशेने तर कायमच अपघातास आमंत्रण दिले जात आहे. इथे या रस्त्यावरील प्रवास नेमका जीवघेणा ठरत आहे.

नेमके काय होत आहे ?- सातारा आमदार रोडवरून घरी जाताना त्यांंना या रस्त्याचा अंदाजच येत नसल्याने या रस्त्यावरील प्रवास गुंतागुंतीचा ठरत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलिस, महानगरपालिका प्रशासनाने एकत्र लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.- पुलावरून येताना सातारा यू टर्न घेऊन जाणे सोपे; परंतु संग्रामनगरकडून दवाखान्यासमोरून चार रस्ते ओलांडून यू टर्न करून गाडी चालवणे धोक्याचे ठरते आहे. कारण इथे सिग्नल नाही. वाहतूक पोलिसही नसतो आणि असल्यास तो काहीही सांगत नाही. यामुळे वारंवार अपघात होत आहेत.

किती दिवस लागणार ?रस्त्याच्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम सुरू असून, एमआयटीकडून येणाऱ्या रस्त्यावर पुलाखालूनच जीव मुठीत धरून सातारा गावात प्रवास करावा लागणार का?- गणेश पवार (नागरिक)

महिला, मुलांसाठी अधिक धोकाशहरातून येणाऱ्या महिला व लहान मुलांंना ये-जा करावी लागते. विरुद्ध दिशेने वाहने पळविणे त्रासदायक ठरते आहे.- विजय कुडे (नागरिक)

अपघात नको म्हणून पूल...अपघाताच्या घटना टाळाव्यात म्हणून रस्ता मोठा झाला. पूल टाकला; परंतु रस्ता बनविताना सामान्य नागरिकांना का विचारात घेतले नाही. साताऱ्यात जावे कसे ?- प्रवीण पवार (नागरिक)

येथे अनेकदा भांडणे होतात...पुलावर जाणे तर दूरच राहिले. वाहतूक पोलिसांसमोरच सर्व वाहनधारक या गुंतागुतींच्या रस्त्यावरून आडवे जातात. गावात जाताना अडचणीला तोंड दिले जाते.- शैलेश सांगोळे (नागरिक)

सिग्नल हवेसिग्नल लावण्याची जबाबदारी कोणाची हे पाहायला हवे. वाहतुकीला नियम लावण्याचे काम पोलिसांचे तर सिग्नल लावण्याची जबाबदारी मनपाची असून त्याकडे लक्ष प्रशासनाने द्यावे, अन्यथा यू टर्न मार्ग पुलावरून घ्यावा.- सुनील कोळसे, शाखा अभियंता. 

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा