शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

मोबाईल ‘डेटा’च्या ‘मापात पाप’? दिवस मावळण्यापूर्वीच संपतो ‘पॅक’, छोटे ‘रिचार्ज’ची नामुष्की

By संतोष हिरेमठ | Updated: March 14, 2024 11:17 IST

इंटरनेट, सोशल मीडिया आणि आता ‘एआय’ वापराच्या काळात मोबाईलधारकांना दिवसभरात दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो, हे कळत नाही.

छत्रपती संभाजीनगर : मोबाईलचा डेटा अचानक संपत असल्याचा अनुभव मोबाईलधारकांना येत आहे, तर अनेकजण साधा मोबाईल वापरतात. अशा मोबाईलधारकांना रिचार्ज मारताना काही ''''जीबी'''' डेटा मिळतो; परंतु मोबाईल साधा असल्याने तो वापरलाच जात नाही. मग हा डेटा कुठे जातो, मोबाईलच्या ''''डेटा''''त ''''काटा'''' मारला जात आहे का, असा सवाल मोबाईलधारकांकडून उपस्थित केला जातो आहे.

इंटरनेट, सोशल मीडिया आणि आता ‘एआय’ वापराच्या काळात मोबाईलधारकांना दिवसभरात दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो, हे कळत नाही. कोणी सतत मोबाईलवर सक्रिय असतो, तर कोणी दिवसभरात काही वेळेसाठी मोबाईलचा वापर करतात. या सगळ्यांना मोबाईलचा डेटा संपत असल्याचा अनुभव येतो. ‘डेटा’ संपताच छोट्या किमतीचा ‘रिचार्ज’ मारण्याची वेळ ओढावत आहे. मोबाईलमधील इंटरनेट ‘स्पीड’, डाऊनलोडिंग , व्हिडीओची गुणवत्ता आदींवर ‘डेटा’ वापर ठरतो, असे एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

छोट्या रकमेचे ‘रिचार्ज’ विविध कंपन्यांकडून काही तासांसाठी, एका दिवसासाठी, दोन-तीन दिवसांची मुदत असलेले छोट्या रकमेचे डेटा ‘रिचार्ज’ची सुविधा दिली जात आहे. दिवसभरातील डेटा अचानक संपेल आणि हे छोटे रिचार्ज मारले जातील, यासाठीच ते आणले का, असा सवाल मोबाईलधारक उपस्थित करीत आहेत.

असे तुमच्यासोबत होते का? अचानक ‘डेटा’ संपल्याचा मेसेज? मोबाईलचा वापर करताना काही वेळ होत नाही, तोच आधी ‘तुमचा दिवसभरातील ५० टक्के डेटा वापरून झाला आहे...’ असा मेसेज येतो. त्यानंतर मोबाईलधारक नेटचा वापर कमी करतो. त्यानंतर डेटा संपल्याचा मेसेज येतो. त्यामुळे अनेकांना नाईलाजाने काही तासांसाठीचा ‘रिचार्ज’ मारावा लागत असल्याचे मोबाईलधारकांनी सांगितले.

साधा मोबाईल, मग डेटा कुठे जातो? केवळ बोलण्यासाठी साध्या मोबाईलचा वापर होतो. मात्र, जेव्हा ‘रिचार्ज’ टाकला जातो, तेव्हा काही ‘जीबी’ डेटाही मिळत असतो. साधा मोबाईल असल्याने हा डेेटा वापरलाच जात नाही. मग डेटा कुठे जातो, असा सवाल मोबाईलधारकांनी उपस्थित केला.

मोबाईलवर ‘४जी’ची रेंज, पण नेट ठप्पमोबाईलवर ‘४जी’ची रेंज असते; परंतु अचानक इंटरनेटच ठप्प पडते. ‘डेटा’ असतो, ‘रेंज’ असते. मात्र, तरीही इंटरनेट काम करत नाही, असे वारंवार होते. आवश्यकतेच्या वेळेत डेटा वापरताच येत नाही, असेही काही मोबाईलधारकांनी सांगितले.

पारदर्शकतेची अपेक्षा नाहीनफ्याच्या उद्देशाने कंपन्या काम करतात. त्यांच्याकडून पारदर्शकतेची अपेक्षा करू नये. सरकारी कंपनीत ग्राहकांना अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते. खासगी कंपन्यांत तक्रार करणे अवघड होते.- रंजन दाणी, महाराष्ट्र सचिव, नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉइज, बीएसएनएल

रेंज फुल, तरीही अचानक नेट चालत नाहीमोबाईलमध्ये २ ‘जीबी’चा डेटा असूनही अनेकदा अचानक काही वेळेसाठी इंटरनेट चालत नाही. ‘४जी’ची रेंजही फुल दाखवित असते. तरीही नेट चालत नाही. व्हिडीओ पाहणे सोडा, एखादा विषय सर्चदेखील होत नाही. हे वारंवार होते. दिवसभरातील डेटा वापरताच येत नाही.- सय्यद नजीब, मोबाईलधारक.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया