शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल ‘डेटा’च्या ‘मापात पाप’? दिवस मावळण्यापूर्वीच संपतो ‘पॅक’, छोटे ‘रिचार्ज’ची नामुष्की

By संतोष हिरेमठ | Updated: March 14, 2024 11:17 IST

इंटरनेट, सोशल मीडिया आणि आता ‘एआय’ वापराच्या काळात मोबाईलधारकांना दिवसभरात दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो, हे कळत नाही.

छत्रपती संभाजीनगर : मोबाईलचा डेटा अचानक संपत असल्याचा अनुभव मोबाईलधारकांना येत आहे, तर अनेकजण साधा मोबाईल वापरतात. अशा मोबाईलधारकांना रिचार्ज मारताना काही ''''जीबी'''' डेटा मिळतो; परंतु मोबाईल साधा असल्याने तो वापरलाच जात नाही. मग हा डेटा कुठे जातो, मोबाईलच्या ''''डेटा''''त ''''काटा'''' मारला जात आहे का, असा सवाल मोबाईलधारकांकडून उपस्थित केला जातो आहे.

इंटरनेट, सोशल मीडिया आणि आता ‘एआय’ वापराच्या काळात मोबाईलधारकांना दिवसभरात दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो, हे कळत नाही. कोणी सतत मोबाईलवर सक्रिय असतो, तर कोणी दिवसभरात काही वेळेसाठी मोबाईलचा वापर करतात. या सगळ्यांना मोबाईलचा डेटा संपत असल्याचा अनुभव येतो. ‘डेटा’ संपताच छोट्या किमतीचा ‘रिचार्ज’ मारण्याची वेळ ओढावत आहे. मोबाईलमधील इंटरनेट ‘स्पीड’, डाऊनलोडिंग , व्हिडीओची गुणवत्ता आदींवर ‘डेटा’ वापर ठरतो, असे एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

छोट्या रकमेचे ‘रिचार्ज’ विविध कंपन्यांकडून काही तासांसाठी, एका दिवसासाठी, दोन-तीन दिवसांची मुदत असलेले छोट्या रकमेचे डेटा ‘रिचार्ज’ची सुविधा दिली जात आहे. दिवसभरातील डेटा अचानक संपेल आणि हे छोटे रिचार्ज मारले जातील, यासाठीच ते आणले का, असा सवाल मोबाईलधारक उपस्थित करीत आहेत.

असे तुमच्यासोबत होते का? अचानक ‘डेटा’ संपल्याचा मेसेज? मोबाईलचा वापर करताना काही वेळ होत नाही, तोच आधी ‘तुमचा दिवसभरातील ५० टक्के डेटा वापरून झाला आहे...’ असा मेसेज येतो. त्यानंतर मोबाईलधारक नेटचा वापर कमी करतो. त्यानंतर डेटा संपल्याचा मेसेज येतो. त्यामुळे अनेकांना नाईलाजाने काही तासांसाठीचा ‘रिचार्ज’ मारावा लागत असल्याचे मोबाईलधारकांनी सांगितले.

साधा मोबाईल, मग डेटा कुठे जातो? केवळ बोलण्यासाठी साध्या मोबाईलचा वापर होतो. मात्र, जेव्हा ‘रिचार्ज’ टाकला जातो, तेव्हा काही ‘जीबी’ डेटाही मिळत असतो. साधा मोबाईल असल्याने हा डेेटा वापरलाच जात नाही. मग डेटा कुठे जातो, असा सवाल मोबाईलधारकांनी उपस्थित केला.

मोबाईलवर ‘४जी’ची रेंज, पण नेट ठप्पमोबाईलवर ‘४जी’ची रेंज असते; परंतु अचानक इंटरनेटच ठप्प पडते. ‘डेटा’ असतो, ‘रेंज’ असते. मात्र, तरीही इंटरनेट काम करत नाही, असे वारंवार होते. आवश्यकतेच्या वेळेत डेटा वापरताच येत नाही, असेही काही मोबाईलधारकांनी सांगितले.

पारदर्शकतेची अपेक्षा नाहीनफ्याच्या उद्देशाने कंपन्या काम करतात. त्यांच्याकडून पारदर्शकतेची अपेक्षा करू नये. सरकारी कंपनीत ग्राहकांना अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते. खासगी कंपन्यांत तक्रार करणे अवघड होते.- रंजन दाणी, महाराष्ट्र सचिव, नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉइज, बीएसएनएल

रेंज फुल, तरीही अचानक नेट चालत नाहीमोबाईलमध्ये २ ‘जीबी’चा डेटा असूनही अनेकदा अचानक काही वेळेसाठी इंटरनेट चालत नाही. ‘४जी’ची रेंजही फुल दाखवित असते. तरीही नेट चालत नाही. व्हिडीओ पाहणे सोडा, एखादा विषय सर्चदेखील होत नाही. हे वारंवार होते. दिवसभरातील डेटा वापरताच येत नाही.- सय्यद नजीब, मोबाईलधारक.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया