शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

मोबाईल ‘डेटा’च्या ‘मापात पाप’? दिवस मावळण्यापूर्वीच संपतो ‘पॅक’, छोटे ‘रिचार्ज’ची नामुष्की

By संतोष हिरेमठ | Updated: March 14, 2024 11:17 IST

इंटरनेट, सोशल मीडिया आणि आता ‘एआय’ वापराच्या काळात मोबाईलधारकांना दिवसभरात दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो, हे कळत नाही.

छत्रपती संभाजीनगर : मोबाईलचा डेटा अचानक संपत असल्याचा अनुभव मोबाईलधारकांना येत आहे, तर अनेकजण साधा मोबाईल वापरतात. अशा मोबाईलधारकांना रिचार्ज मारताना काही ''''जीबी'''' डेटा मिळतो; परंतु मोबाईल साधा असल्याने तो वापरलाच जात नाही. मग हा डेटा कुठे जातो, मोबाईलच्या ''''डेटा''''त ''''काटा'''' मारला जात आहे का, असा सवाल मोबाईलधारकांकडून उपस्थित केला जातो आहे.

इंटरनेट, सोशल मीडिया आणि आता ‘एआय’ वापराच्या काळात मोबाईलधारकांना दिवसभरात दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो, हे कळत नाही. कोणी सतत मोबाईलवर सक्रिय असतो, तर कोणी दिवसभरात काही वेळेसाठी मोबाईलचा वापर करतात. या सगळ्यांना मोबाईलचा डेटा संपत असल्याचा अनुभव येतो. ‘डेटा’ संपताच छोट्या किमतीचा ‘रिचार्ज’ मारण्याची वेळ ओढावत आहे. मोबाईलमधील इंटरनेट ‘स्पीड’, डाऊनलोडिंग , व्हिडीओची गुणवत्ता आदींवर ‘डेटा’ वापर ठरतो, असे एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

छोट्या रकमेचे ‘रिचार्ज’ विविध कंपन्यांकडून काही तासांसाठी, एका दिवसासाठी, दोन-तीन दिवसांची मुदत असलेले छोट्या रकमेचे डेटा ‘रिचार्ज’ची सुविधा दिली जात आहे. दिवसभरातील डेटा अचानक संपेल आणि हे छोटे रिचार्ज मारले जातील, यासाठीच ते आणले का, असा सवाल मोबाईलधारक उपस्थित करीत आहेत.

असे तुमच्यासोबत होते का? अचानक ‘डेटा’ संपल्याचा मेसेज? मोबाईलचा वापर करताना काही वेळ होत नाही, तोच आधी ‘तुमचा दिवसभरातील ५० टक्के डेटा वापरून झाला आहे...’ असा मेसेज येतो. त्यानंतर मोबाईलधारक नेटचा वापर कमी करतो. त्यानंतर डेटा संपल्याचा मेसेज येतो. त्यामुळे अनेकांना नाईलाजाने काही तासांसाठीचा ‘रिचार्ज’ मारावा लागत असल्याचे मोबाईलधारकांनी सांगितले.

साधा मोबाईल, मग डेटा कुठे जातो? केवळ बोलण्यासाठी साध्या मोबाईलचा वापर होतो. मात्र, जेव्हा ‘रिचार्ज’ टाकला जातो, तेव्हा काही ‘जीबी’ डेटाही मिळत असतो. साधा मोबाईल असल्याने हा डेेटा वापरलाच जात नाही. मग डेटा कुठे जातो, असा सवाल मोबाईलधारकांनी उपस्थित केला.

मोबाईलवर ‘४जी’ची रेंज, पण नेट ठप्पमोबाईलवर ‘४जी’ची रेंज असते; परंतु अचानक इंटरनेटच ठप्प पडते. ‘डेटा’ असतो, ‘रेंज’ असते. मात्र, तरीही इंटरनेट काम करत नाही, असे वारंवार होते. आवश्यकतेच्या वेळेत डेटा वापरताच येत नाही, असेही काही मोबाईलधारकांनी सांगितले.

पारदर्शकतेची अपेक्षा नाहीनफ्याच्या उद्देशाने कंपन्या काम करतात. त्यांच्याकडून पारदर्शकतेची अपेक्षा करू नये. सरकारी कंपनीत ग्राहकांना अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते. खासगी कंपन्यांत तक्रार करणे अवघड होते.- रंजन दाणी, महाराष्ट्र सचिव, नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉइज, बीएसएनएल

रेंज फुल, तरीही अचानक नेट चालत नाहीमोबाईलमध्ये २ ‘जीबी’चा डेटा असूनही अनेकदा अचानक काही वेळेसाठी इंटरनेट चालत नाही. ‘४जी’ची रेंजही फुल दाखवित असते. तरीही नेट चालत नाही. व्हिडीओ पाहणे सोडा, एखादा विषय सर्चदेखील होत नाही. हे वारंवार होते. दिवसभरातील डेटा वापरताच येत नाही.- सय्यद नजीब, मोबाईलधारक.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया