शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

युती झाल्याने राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:04 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्याचे शिवसेना-भाजपतर्फे सोमवारी जाहीर करण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चिंतेतही वाढ झाली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि युतीचा उमेदवार निश्चित झाला आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस आघाडीला आता तुल्यबळ उमेदवार शोधावा लागणार आहे. युतीला थेट टक्क र देणारा उमेदवार म्हणून आघाडीकडून कोण मैदानात उतरणार याकडे आता लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देआघाडीच्या चिंतेत वाढ: विधानसभेसाठी इच्छुक असलेले अस्वस्थ भाजपच्या गोटात अस्वस्थता

औरंगाबाद : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्याचे शिवसेना-भाजपतर्फे सोमवारी जाहीर करण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चिंतेतही वाढ झाली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि युतीचा उमेदवार निश्चित झाला आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस आघाडीला आता तुल्यबळ उमेदवार शोधावा लागणार आहे. युतीला थेट टक्क र देणारा उमेदवार म्हणून आघाडीकडून कोण मैदानात उतरणार याकडे आता लक्ष लागले आहे.भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनात नसतानाही त्यांना आता शिवसेनेच्या उमेदवाराचे लोकसभेसाठी काम करावे लागणार आहे. केंद्रात सत्ता येण्याच्या अनुषंगाने या भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.चार वर्षांपासून शिवसेनेने भाजपच्या प्रत्येक धोरणावर टीका केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बेबनावाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत त्या बेबनावाच्या वातावरणाची खुन्नस काढण्याची संधी यावेळी मिळण्याच्या अपेक्षेत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते होते. परंतु युती झाल्यामुळे भाजप आणि सेना दोघांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शिवसेनेलाही संभाव्य उमेदवाराचे काम करण्याची इच्छा नाही, तर भाजपलाही शिवसेनेच्या त्याच उमेदवाराचे काम करावे लागणार असल्यामुळे अस्वस्थ वाटू लागले आहे. परिवर्तनाच्या अनुषंगाने वर्षभरापासून भाषणबाजी करणाऱ्या भाजप नेत्यांची दातखिळी बसली आहे. तर मनात नसतानाही त्याच उमेदवाराचे काम करावे लागणार असल्याने शिवसेनेतील एका गटाची पाचावर धारण बसली आहे.आघाडीचं काय चाललंयकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडायची की काँग्रेसने लढवायची याचा निर्णय अजून झालेला नाही. या सगळ्या चर्चेत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर करण्यात बाजी मारली आहे. मनसे, शिवस्वराज्य बहुजन पक्षाने अजून तरी काही निर्णय जाहीर केलेला नाही. सध्या तरी तिरंगी लढतीचे चित्र असेल, अशी शक्यता आहे. २० फेबु्रवारीनंतर काय राजकीय घडामोडी होतात, त्यावर सर्व काही अवलंबून आहे. अनेकांच्या मनसुब्यावर पाणीलोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही युती झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यात दोन्ही पक्ष़ांतील खरी नाराजी उमटली आहे ती विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची जागा युतीच्या कोट्यात शिवसेनेकडे आहे. यामुळे शिवसेनेच्या विद्यमान आमदार संजय शिरसाट यांना युतीमुळे दिलासा मिळाला आहे. भाजपतर्फे मोर्चेबांधणी करणाºया अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर मात्र पाणी फिरले आहे. याचबरोबर औरंगाबाद मध्य मतदारसंघ सध्या एमआयएमकडे आहे. युतीमध्ये हा मतदारसंघही शिवसेनेकडे आहे. यामुळे याठिकाणी गेल्या पाच वर्षांपासून युती होणार नाही, असे गृहित धरुन तयारी करत असलेल्या भाजपच्या किशनचंद तनवाणी यांना मोठा झटका बसला आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही शिवसेनेला भाजपचे काम करावे लागणार आहे. इतर मतदारसंघातील युतीमधील अनेक इच्छुकांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी नाराजी पसरण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा