शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

निसर्गरम्य शूलिभंजन उपेक्षित पर्यटनस्थळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 19:11 IST

पर्यटनाच्या दृष्टीने शूलिभंजनचा विकास होणे गरजेचे आहे

- ऋचिका पालोदकर

औरंगाबादहून वेरूळ मार्गावर असणारे शूलिभंजन हे ठिकाण आजही उपेक्षित पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी असणारे हे ठिकाण जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि दौलताबाद किल्ला यांच्या अगदी जवळ आहे. या दोन्ही ठिकाणी येणारे पर्यटक शूलिभंजनला जाऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. मात्र, या ठिकाणचा पर्यटन स्थळ म्हणून विकास न झाल्यामुळे आजही हे ठिकाण पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.

औरंगाबादपासून ३० कि.मी. अंतरावर असलेले शूलिभंजन हे ठिकाण दत्तात्रयाचा साक्षात्कार झालेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. ‘शूलिभंजन’, ‘सूर्यभंजन’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. खुलताबादपासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर असलेल्या शूलिभंजनबाबत अनेक धार्मिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. हिंदू गं्रथातील काशीखंड, पद्मपुराण, दत्त प्रबोध, नाथचरित्र या प्राचीन गं्रथातही या ठिकाणचा उल्लेख आढळतो. मार्कं डेयऋषींनी याठिकाणी तपश्चर्या केल्याचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आहे. 

नाथचरित्रात आलेल्या उल्लेखानुसार संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी साधना केली होती. म्हणून या स्थळाला संत एकनाथांचे साधनास्थळ म्हणूनही ओळखले जाते, असे म्हणतात की, एकनाथ महाराज दररोज देवगिरी किल्ल्यावरून शूलिभंजन गडावर यायचे आणि येथे येऊन आराधना करायचे. देवगिरी किल्ल्यापासून शूलिभंजनपर्यंत एक भूमिगत मार्ग असावा आणि याच मार्गाने एकनाथ महाराज ये-जा करत असावेत, असा अंदाजही बांधला जातो. सध्या या गडावर जेथे दत्त मंदिर आहे, त्याच ठिकाणी दत्तात्रयाने एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला होता, असे सांगितले जाते.

मंदिराच्या बाहेर एक शिळा आहे. या शिळेवर बसून एकनाथांनी साधना केली होती, असे म्हणतात. त्या शिळेवर एका लहान दगडाने आघात केल्यास त्या गोलाकार शिळेतून घंटीप्रमाणे मंजूळ आवाज येतो. मंदिर परिसरातील इतर कोणत्याही शिळांमधून असा स्वर ऐकू येत नाही. एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी यांची पहिली भेटही याच स्थळी झाली होती, असे मानले जाते. ४०० फूट उंचावर असलेल्या शूलिभंजन येथे कायम थंड हवा असते. याशिवाय ध्यानधारणा करण्यासाठी ही जागा सर्वोत्तम असल्याचे मानले जाते. मंदिराच्या जवळ गरम पाण्याचे दोन झरे आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणचे सौंदर्य अधिकच बहरून येते. अनेक आकर्षक फुलांचे ताटवे ठिकठिकाणी फुलून आलेले दिसतात. अनेक लहान-मोठे धबधबे वाहू लागतात. निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण असून, पर्यटनाच्या दृष्टीने शूलिभंजनचा विकास होणे गरजेचे आहेत. 

तीन वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हैसमाळ- खुलताबाद- शूलिभंजन पर्यटन प्राधिकरणाला मंजुरी देण्यात आली होती. दोन वर्षांमध्ये या परिसराचा संपूर्ण विकास करून येथे पर्यटनाला चालना देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अजूनही परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच असून शूलिभंजनचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांपासून दूरच आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा