शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

निसर्गरम्य शूलिभंजन उपेक्षित पर्यटनस्थळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 19:11 IST

पर्यटनाच्या दृष्टीने शूलिभंजनचा विकास होणे गरजेचे आहे

- ऋचिका पालोदकर

औरंगाबादहून वेरूळ मार्गावर असणारे शूलिभंजन हे ठिकाण आजही उपेक्षित पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी असणारे हे ठिकाण जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि दौलताबाद किल्ला यांच्या अगदी जवळ आहे. या दोन्ही ठिकाणी येणारे पर्यटक शूलिभंजनला जाऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. मात्र, या ठिकाणचा पर्यटन स्थळ म्हणून विकास न झाल्यामुळे आजही हे ठिकाण पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.

औरंगाबादपासून ३० कि.मी. अंतरावर असलेले शूलिभंजन हे ठिकाण दत्तात्रयाचा साक्षात्कार झालेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. ‘शूलिभंजन’, ‘सूर्यभंजन’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. खुलताबादपासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर असलेल्या शूलिभंजनबाबत अनेक धार्मिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. हिंदू गं्रथातील काशीखंड, पद्मपुराण, दत्त प्रबोध, नाथचरित्र या प्राचीन गं्रथातही या ठिकाणचा उल्लेख आढळतो. मार्कं डेयऋषींनी याठिकाणी तपश्चर्या केल्याचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आहे. 

नाथचरित्रात आलेल्या उल्लेखानुसार संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी साधना केली होती. म्हणून या स्थळाला संत एकनाथांचे साधनास्थळ म्हणूनही ओळखले जाते, असे म्हणतात की, एकनाथ महाराज दररोज देवगिरी किल्ल्यावरून शूलिभंजन गडावर यायचे आणि येथे येऊन आराधना करायचे. देवगिरी किल्ल्यापासून शूलिभंजनपर्यंत एक भूमिगत मार्ग असावा आणि याच मार्गाने एकनाथ महाराज ये-जा करत असावेत, असा अंदाजही बांधला जातो. सध्या या गडावर जेथे दत्त मंदिर आहे, त्याच ठिकाणी दत्तात्रयाने एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला होता, असे सांगितले जाते.

मंदिराच्या बाहेर एक शिळा आहे. या शिळेवर बसून एकनाथांनी साधना केली होती, असे म्हणतात. त्या शिळेवर एका लहान दगडाने आघात केल्यास त्या गोलाकार शिळेतून घंटीप्रमाणे मंजूळ आवाज येतो. मंदिर परिसरातील इतर कोणत्याही शिळांमधून असा स्वर ऐकू येत नाही. एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी यांची पहिली भेटही याच स्थळी झाली होती, असे मानले जाते. ४०० फूट उंचावर असलेल्या शूलिभंजन येथे कायम थंड हवा असते. याशिवाय ध्यानधारणा करण्यासाठी ही जागा सर्वोत्तम असल्याचे मानले जाते. मंदिराच्या जवळ गरम पाण्याचे दोन झरे आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणचे सौंदर्य अधिकच बहरून येते. अनेक आकर्षक फुलांचे ताटवे ठिकठिकाणी फुलून आलेले दिसतात. अनेक लहान-मोठे धबधबे वाहू लागतात. निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण असून, पर्यटनाच्या दृष्टीने शूलिभंजनचा विकास होणे गरजेचे आहेत. 

तीन वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हैसमाळ- खुलताबाद- शूलिभंजन पर्यटन प्राधिकरणाला मंजुरी देण्यात आली होती. दोन वर्षांमध्ये या परिसराचा संपूर्ण विकास करून येथे पर्यटनाला चालना देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अजूनही परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच असून शूलिभंजनचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांपासून दूरच आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा