शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निसर्गरम्य शूलिभंजन उपेक्षित पर्यटनस्थळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 19:11 IST

पर्यटनाच्या दृष्टीने शूलिभंजनचा विकास होणे गरजेचे आहे

- ऋचिका पालोदकर

औरंगाबादहून वेरूळ मार्गावर असणारे शूलिभंजन हे ठिकाण आजही उपेक्षित पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी असणारे हे ठिकाण जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि दौलताबाद किल्ला यांच्या अगदी जवळ आहे. या दोन्ही ठिकाणी येणारे पर्यटक शूलिभंजनला जाऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. मात्र, या ठिकाणचा पर्यटन स्थळ म्हणून विकास न झाल्यामुळे आजही हे ठिकाण पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.

औरंगाबादपासून ३० कि.मी. अंतरावर असलेले शूलिभंजन हे ठिकाण दत्तात्रयाचा साक्षात्कार झालेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. ‘शूलिभंजन’, ‘सूर्यभंजन’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. खुलताबादपासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर असलेल्या शूलिभंजनबाबत अनेक धार्मिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. हिंदू गं्रथातील काशीखंड, पद्मपुराण, दत्त प्रबोध, नाथचरित्र या प्राचीन गं्रथातही या ठिकाणचा उल्लेख आढळतो. मार्कं डेयऋषींनी याठिकाणी तपश्चर्या केल्याचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आहे. 

नाथचरित्रात आलेल्या उल्लेखानुसार संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी साधना केली होती. म्हणून या स्थळाला संत एकनाथांचे साधनास्थळ म्हणूनही ओळखले जाते, असे म्हणतात की, एकनाथ महाराज दररोज देवगिरी किल्ल्यावरून शूलिभंजन गडावर यायचे आणि येथे येऊन आराधना करायचे. देवगिरी किल्ल्यापासून शूलिभंजनपर्यंत एक भूमिगत मार्ग असावा आणि याच मार्गाने एकनाथ महाराज ये-जा करत असावेत, असा अंदाजही बांधला जातो. सध्या या गडावर जेथे दत्त मंदिर आहे, त्याच ठिकाणी दत्तात्रयाने एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला होता, असे सांगितले जाते.

मंदिराच्या बाहेर एक शिळा आहे. या शिळेवर बसून एकनाथांनी साधना केली होती, असे म्हणतात. त्या शिळेवर एका लहान दगडाने आघात केल्यास त्या गोलाकार शिळेतून घंटीप्रमाणे मंजूळ आवाज येतो. मंदिर परिसरातील इतर कोणत्याही शिळांमधून असा स्वर ऐकू येत नाही. एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी यांची पहिली भेटही याच स्थळी झाली होती, असे मानले जाते. ४०० फूट उंचावर असलेल्या शूलिभंजन येथे कायम थंड हवा असते. याशिवाय ध्यानधारणा करण्यासाठी ही जागा सर्वोत्तम असल्याचे मानले जाते. मंदिराच्या जवळ गरम पाण्याचे दोन झरे आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणचे सौंदर्य अधिकच बहरून येते. अनेक आकर्षक फुलांचे ताटवे ठिकठिकाणी फुलून आलेले दिसतात. अनेक लहान-मोठे धबधबे वाहू लागतात. निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण असून, पर्यटनाच्या दृष्टीने शूलिभंजनचा विकास होणे गरजेचे आहेत. 

तीन वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हैसमाळ- खुलताबाद- शूलिभंजन पर्यटन प्राधिकरणाला मंजुरी देण्यात आली होती. दोन वर्षांमध्ये या परिसराचा संपूर्ण विकास करून येथे पर्यटनाला चालना देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अजूनही परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच असून शूलिभंजनचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांपासून दूरच आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा