शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

निसर्गरम्य शूलिभंजन उपेक्षित पर्यटनस्थळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 19:11 IST

पर्यटनाच्या दृष्टीने शूलिभंजनचा विकास होणे गरजेचे आहे

- ऋचिका पालोदकर

औरंगाबादहून वेरूळ मार्गावर असणारे शूलिभंजन हे ठिकाण आजही उपेक्षित पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी असणारे हे ठिकाण जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि दौलताबाद किल्ला यांच्या अगदी जवळ आहे. या दोन्ही ठिकाणी येणारे पर्यटक शूलिभंजनला जाऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. मात्र, या ठिकाणचा पर्यटन स्थळ म्हणून विकास न झाल्यामुळे आजही हे ठिकाण पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.

औरंगाबादपासून ३० कि.मी. अंतरावर असलेले शूलिभंजन हे ठिकाण दत्तात्रयाचा साक्षात्कार झालेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. ‘शूलिभंजन’, ‘सूर्यभंजन’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. खुलताबादपासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर असलेल्या शूलिभंजनबाबत अनेक धार्मिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. हिंदू गं्रथातील काशीखंड, पद्मपुराण, दत्त प्रबोध, नाथचरित्र या प्राचीन गं्रथातही या ठिकाणचा उल्लेख आढळतो. मार्कं डेयऋषींनी याठिकाणी तपश्चर्या केल्याचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आहे. 

नाथचरित्रात आलेल्या उल्लेखानुसार संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी साधना केली होती. म्हणून या स्थळाला संत एकनाथांचे साधनास्थळ म्हणूनही ओळखले जाते, असे म्हणतात की, एकनाथ महाराज दररोज देवगिरी किल्ल्यावरून शूलिभंजन गडावर यायचे आणि येथे येऊन आराधना करायचे. देवगिरी किल्ल्यापासून शूलिभंजनपर्यंत एक भूमिगत मार्ग असावा आणि याच मार्गाने एकनाथ महाराज ये-जा करत असावेत, असा अंदाजही बांधला जातो. सध्या या गडावर जेथे दत्त मंदिर आहे, त्याच ठिकाणी दत्तात्रयाने एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला होता, असे सांगितले जाते.

मंदिराच्या बाहेर एक शिळा आहे. या शिळेवर बसून एकनाथांनी साधना केली होती, असे म्हणतात. त्या शिळेवर एका लहान दगडाने आघात केल्यास त्या गोलाकार शिळेतून घंटीप्रमाणे मंजूळ आवाज येतो. मंदिर परिसरातील इतर कोणत्याही शिळांमधून असा स्वर ऐकू येत नाही. एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी यांची पहिली भेटही याच स्थळी झाली होती, असे मानले जाते. ४०० फूट उंचावर असलेल्या शूलिभंजन येथे कायम थंड हवा असते. याशिवाय ध्यानधारणा करण्यासाठी ही जागा सर्वोत्तम असल्याचे मानले जाते. मंदिराच्या जवळ गरम पाण्याचे दोन झरे आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणचे सौंदर्य अधिकच बहरून येते. अनेक आकर्षक फुलांचे ताटवे ठिकठिकाणी फुलून आलेले दिसतात. अनेक लहान-मोठे धबधबे वाहू लागतात. निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण असून, पर्यटनाच्या दृष्टीने शूलिभंजनचा विकास होणे गरजेचे आहेत. 

तीन वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हैसमाळ- खुलताबाद- शूलिभंजन पर्यटन प्राधिकरणाला मंजुरी देण्यात आली होती. दोन वर्षांमध्ये या परिसराचा संपूर्ण विकास करून येथे पर्यटनाला चालना देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अजूनही परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच असून शूलिभंजनचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांपासून दूरच आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा