शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मध्यरात्री ‘शुभमंगल सावधान';भक्तांच्या साक्षीने बारवेतील मंदिरात शिव-पार्वतीचे थाटात लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 19:30 IST

रात्री १२ वाजता शिव-पार्वतीवर भक्तांनी टाकल्या अक्षता

औरंगाबाद : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर १ मार्च मध्यरात्री १२ वाजता. भावसिंगपुऱ्यातील बारवेत ५० फूट खोलातील सत्येश्वर मंदिरात... ‘कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान’ असे मंगलष्टकाचे सूर कानावर पडले. अन् उपस्थित शेकडो भाविकांनी नवरा-नवरीवर अक्षता टाकल्या. टाळ्यांचा कडकडाट केला. सनाई-चौघडे वादन आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत दणाणून गेला, भगवान शिव-पार्वतीचे लग्न लागताच त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. ‘याचि देही याचि डोळा’ भगवंतांचा हा लग्नसोहळा पाहून आम्ही धन्य झालोे’, अशी भावना प्रत्येक शिवभक्त व्यक्त करीत होता.

सुमारे ३५० वर्षे जुने सत्येश्वर महादेव मंदिर जु्न्या भावसिंगपुऱ्यात शेतातील एका मोठ्या बारवेत आहे. येथे भगवान शंकर व पार्वतीची समोरासमोर मंदिरे आहेत. येथे परंपरेनुसार महाशिवरात्रीला शिव-पार्वतीचे लग्न रात्री १२ वाजता लावले जाते. आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता महादेव पिंडीला अभिषेक करून महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात झाली. पहाटेपासूनच अभिषेक, दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावणे सुरू केले होते. रात्री पुजारी सदाशिव खेळतोंड यांनी महादेवास तर त्यांच्या पत्नीने पार्वतीच्या मूर्तीला हळद लावली, त्यानंतर पार्वतीला भरजरी साडी नेसविण्यात आली. अलंकाराने नटविण्यात आले. जिथे जागा मिळेल तिथे भाविक उभे राहून देवाचा विवाह सोहळा पाहत होते. दोन्ही मंदिराच्या मधोमध अंतरपाट धरण्यात आला आणि बरोबर १२ वाजेच्या सुमारास ‘मंगलाष्टक़’ सुरू झाले. ‘आली लग्न घटी समीप नवरा घेऊनी यावा घरा.... कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान’ मंगलाष्टक कानी पडले. मंगलधून वाजली आणि फटाक्यांची आतषबाजी झाली. भगवंतांच्या लग्न सोहळ्यासाठी भावसिंगपुरावासीय मध्यरात्री उशिरापर्यंत जागे होते.

लग्नासाठी शहरातून आले भाविकभगवान शिव-पार्वतीचा विवाह सोहळा अनुभवण्यासाठी शहरातून २० कि.मी अंतर पार करीत अनेक भाविक जुन्या भावसिंगपुऱ्यात दाखल झाले होते. यामुळे विवाह सोहळ्याची आणखी रंगत वाढली होती. संपूर्ण बारव रोषणाईने लखलखली होती.

टॅग्स :marriageलग्नMahashivratriमहाशिवरात्रीAurangabadऔरंगाबाद