शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

आता औरंगाबादमध्ये सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने उघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 2:03 PM

३१ मेपर्यंत जीवनावश्यक वस्तू दुकानास सवलत

ठळक मुद्देमनपा प्रशासकांचे खंडपीठात तोंडी निवेदन लॉकडाऊनचे सर्व नियम लागू राहणार

औरंगाबाद :  जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बुधवारपासून (दि. २७) दररोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहतील, असे तोंडी निवेदन मनपा प्रशासकांतर्फे मंगळवारी खंडपीठात करण्यात आले. याचिकेचा उद्देश सफल झाल्यामुळे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी मंगळवारी, दि. २६ मे रोजी याचिका निकाली काढली.

१५ मेच्या मध्यरात्रीपासून जीवनावश्यक वस्तूंची विक्री व खरेदीवर २० मेपर्यंत पूर्णपणे बंदी घालणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या तोंडी सूचनावजा आदेशाला  आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणी वेळी अ‍ॅड.  संतोष चपळगावकर यांनी वरीलप्रमाणे निवेदन केले. तसा आदेश मनपा आयुक्त मंगळवारी जारी  करीत  आहेत. वरील ७ तासांपैकी  सकाळी दुकाने  उघडल्यानंतर अर्धा तास आणि दुपारी दुकान बंद करण्या  पूर्वी अर्धा तास, असा एकूण एक तास दुकानाची साफसफाई  आणि सामानाची व्यवस्था  लावता  येईल. नागरिक आणि दुकानदारांना सोयीच्या वेळेत सूट देण्याची अपेक्षा  खंडपीठाने  शुक्रवारी (दि.२३) व्यक्त केली होती.

सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सूट का देत नाही?  ज्यामुळे  नागरिकांना  जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी  पुरेसा  वेळ मिळेल आणि गर्दी होणार नाही, अशी विचारणा खंडपीठाने केली होती, तसेच वेळ वाढवून देण्याची विनंती याचिकाकर्त्यानेही केली होती. त्यावरून मनपा प्रशासकांनी मंगळवारी वरीलप्रमाणे निवेदन केले. लोकांच्या  आणि दुकानदारांच्या  सोयीसाठी न्यायमूर्तीद्वय  काही  मार्गदर्शक सूचना  करणार आहेत. त्यासह  सविस्तर आदेश बुधवारी (दि. २७) दिला जाईल,  असे खंडपीठाने सूचित केले.

लॉकडाऊनचे सर्व नियम लागू राहणारमहापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दुपारी अध्यादेश काढून किराणा दुकान आणि भाजीपाला खरेदी- विक्रीला दुपारी २ वाजेपर्यंत मुभा दिली. ३१ मेपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. आदेशात म्हटले आहे की, सकाळी ७ ते ७.३० आणि दुपारी १.३० ते २ हा वेळ दुकाने, हातगाड्या उघडणे व बंद करण्यासाठी राखीव आहे. सुरक्षित अंतर राखणे,  नियमित मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.  यावेळी गर्दी होणार नाही, परिसर वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद