शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

धक्कादायक ! सरकारी व्हेंटिलेटर गेले शहरातील ‘खाजगी’ रुग्णालयामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:40 IST

सद्य:स्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत असल्याची परिस्थिती आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून तब्बल ६० व्हेंटिलेटर प्राप्त झाले.विविध ७ खाजगी रुग्णालयांना दिले २६ नग

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : शहरातील विविध खाजगी रुग्णालयांत सरकारी म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचे तब्बल २६ व्हेंटिलेटर आहेत.  ज्या रुग्णांना हे व्हेंटिलेटरवर लावले जातात, त्यांना कोणताही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत नाही, त्यातून गंभीर रुग्णांना फायदा होत आहे, असा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दररोज कोरोनामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यात गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत त्यांना जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे. सध्या जिल्ह्यावर कोरोनाचे मोठे संकट ओढवले आहे. रुग्णांमध्ये कोरोनासोबतच इतरही गंभीर स्वरूपाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांची प्रकृती गंभीर असते. परिणामी, त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. त्यानुसार डॉक्टरही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देतात; परंतु सद्य:स्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत असल्याची परिस्थिती आहे.

कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्याप्रमाणेच केंद्र सरकारकडूनही विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये व्हेंटिलेटर पाठविले. त्यात औरंगाबादचाही समावेश झाला. काही दिवसांपूर्वीच तब्बल ६० व्हेंटिलेटर प्राप्त झाले. त्यामुळे मोठा आधार मिळाला. खाजगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर नसल्याचे कारण पुढे करून रुग्णांना परत पाठविण्याचा प्रकार यापूर्वी झालेला आहे. या सगळ्यात जिल्हा शल्यचिकित्सकांतर्गत असलेले म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे २६ व्हेंटिलेटर विविध ७ खाजगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. रुग्णांच्या सुविधेसाठीच ती देण्यात आली आहेत. हे व्हेंटिलेटर लावण्यात येणाऱ्या रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत नसल्याचे सांगितले जाते, घाटीला ३२ व्हेंटिलेटर दिले आहेत. 

ग्रामीण भागांत ओटूकडेच भरग्रामीण भागांत तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. त्यामुळे बहुतांश सरकारी रुग्णालयांत व्हेंटिलेटर ठेवणे अवघड होत आहे. तेथील व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालय, घाटीला दिले जात आहेत. कन्नड, अजिंठा, सिल्लोड, पाचोड, वैजापूर आदी ठिकाणी ऑक्सिजन बेडवरच (ओटू) भर आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरतारुग्णाला व्हेंटिलेटर लावल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांची संपूर्ण यंत्रणा त्यावर देखरेख करते. किती प्रमाणात ऑक्सिजन द्यायचा, प्रत्येक मिनिटाला किती श्वास, शरीरातून बाहेर पडणारे कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण आदींवर देखरेख करण्यासाठी  तज्ज्ञ डॉक्टर काम करतात; परंतु तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने व्हेंटिलेटर देण्याची वेळ ओढवत आहे.

दीड कोटीचे व्हेंटिलेटर : एक व्हेंटिलेटर साधारण ६ ते १५ लाख रुपयांना येते. २६ व्हेंटिलेटरसाठी ६ लाख रुपयांच्या हिशोबाने किमान १ कोटी ५६ लाख रुपये शासनाचे खर्च झाले; परंतु हे व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांत वापरले जात आहेत. 

कोरोना संपल्यानंतर व्हेंटिलेटर परत घेऊशहरातील विविध खाजगी रुग्णालयांत २६ आणि घाटी रुग्णालयास ३२, असे ५८ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. घाटीला आणखी २० व्हेंटिलेटर देण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हे व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. कोरोनाची साथ संपल्यानंतर व्हेंटिलेटर परत घेतले जातील. खाजगी रुग्णालयांना १० दिवसांपूर्वीच व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. हे व्हेंटिलेटर लावल्यानंतर त्याचे शुल्क आकारण्यात येऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल