शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

धक्कादायक! पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; कोरडे वस्तीत पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 17:50 IST

पैठण तालुक्यात दोन दिवसात दहाजणांचा पाण्यात बुडून मृत्यू ओढवल्याने तालुकाभर शोककळा पसरली आहे.

पैठण -  तालुक्यात शनिवारी विविध घटनेत पाच जणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेस २४ तास उलटत नाही तोच आज पुन्हा विहामांडवा येथे शेततळ्यात पोहत असताना जीवरक्षक दोर तुटल्याने बुडून चार विद्यार्थ्यांसह एका जणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विहामांडवा ता पैठण येथील कोरडे वस्तीतील एकाच कुटुंबातील हे पाच जण असल्याने या कुटुंबावर दु:खा चा डोंगर कोसळला आहे.मृत पावलेल्या पाच जणात बाप- लेक व दोन सख्खा भावाचा समावेश आहे. दोन दिवसात दहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याने पैठण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

लक्ष्मण निवृत्ती कोरडे (४२), वैभव रामनाथ कोरडे (१२), सार्थक लक्ष्मण कोरडे (९), समर्थ ज्ञानदेव कोरडे (७), अलंकार रामनाथ कोरडे (९) अशी आजच्या घटनेत बुडून मरण पावलेल्यांची नावे आहेत. यात लक्ष्मण कोरडे व त्यांचा मुलगा  सार्थक यांच्यासह वैभव व अलंकार कोरडे या दोन सख्खा भावांचा समावेश आहे.  दुपारच्या समयी ही दुर्देवी घटना घडल्याने वस्तीवरील नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. घटनेमुळे विहामांडवा परिसरात शोककळा पसरली.

आज दुपारी कोरडे वस्तीवरील लक्ष्मण कोरडे हे मुलगा व पुतणे यांना पोहणे शिकविण्यासाठी वस्तीवरील शेततळ्यात घेऊन गेले. दरम्यान, पोहताना बुडू नये म्हणून दोर शेततळ्यात सोडण्यात आली होती. सुरवातीला लक्ष्मण  कोरडे हे शेततळ्यात मुलांसोबत होते, मुलांना दोर धरूण पोहण्याच्या  सूचना दिल्यानंतर ते बाहेर आले. लक्ष्मण कोरडे बाहेर येताच काही वेळातच शेततळ्यात बांधलेला दोर तुटला व चारही मुले पाण्यात बुडू लागली यावेळी मुलांनी केलेला आरडाओरडा लक्ष्मण कोरडे यांच्या कानावर पडला त्यांनी धावत जात शेततळ्यात मुलांना वाचविण्यासाठी उडी मारली. परंतु, दोर तुटलेला असल्याने व शेततळे शेवाळलेले असल्याने त्यांनी मदतीसाठी धावा केला मात्र ऐकण्यासाठी कुणीही नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही, शेवटी पाचही जण पाण्यात बुडाले. घटना समताच सर्वांना पाचोड येथील रूग्णालयात हलविण्यात आले, मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.

पैठण तालुक्यात दोन दिवसात दहाजणांचा पाण्यात बुडून मृत्यू ओढवल्याने तालुकाभर शोककळा पसरली आहे. या दहा पैकी सात जणांचा मृत्यू शेततळ्यात बुडून झाल्याने शेततळ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेततळ्यात बुडून दुर्घटना होऊ नये म्हणून उपाय योजना राबविणे काळाची गरज असल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.  एकाच दिवशी खेळते बागडते चार बालके व एक तरूण गेल्याने कोरडे वस्ती सुन्न झाली आहे. बालकांच्या मातांनी केलेला आक्रोश हेलावून टाकणारा होता. दरम्यान विहामांडवा येथील नागरिकांनी वस्तीवरील नागरिकांना धीर दिला आहे.

टॅग्स :Waterपाणी