शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! ६० रुपये पेन्शनसाठी वृद्ध महिलेची १८ वर्षे न्यायालयीन लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 19:09 IST

पेन्शनची प्रकरणे प्राप्त झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर निर्णय घेण्याचे खंडपीठाचे निर्देश

ठळक मुद्देज्येष्ठ महिलेला मिळाला अखेर न्याय

- प्रभुदास पाटोळे 

औरंगाबाद : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे केवळ ६० रुपये मासिक ‘फॅमिली पेन्शन’साठी ८० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेला तब्बल १८ वर्षांची न्यायालयीन लढाई लढावी लागली. २००० साली याचिका दाखल केली तेव्हा याचिकाकर्तीचे वय ६० वर्षे होते. तिने ‘अवमान याचिका’ दाखल केली तेव्हा तिचे वय ७५ वर्षे होते. अखेर न्यायालयाच्या आदेशाने मंजूर झालेले ६० रुपये मासिक फॅमिली पेन्शन प्राप्त करण्यासाठी तिला आणखी चार वर्षे वाट पाहावी लागली.

प्रशासनाने थोडा समंजसपणा आणि सहानुभूती दाखविली असती, तर याचिकाकर्तीला वारंवार न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले नसते आणि १८ वर्षांची न्यायालयीन लढाई लढावी लागली नसती, अशा तीव्र शब्दांत प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. अविनाश जी. घारोटे यांनी पेन्शनची प्रकरणे प्राप्त झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर निर्णय घेण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर येथील जुलेखाबी महंमद यासीन यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेच्या सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. 

महंमद यासीन हे १ जानेवारी १९५४ ला शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते आणि ९ फेब्रुवारी १९८५ ला त्यांचे निधन झाले होते; परंतु १६ एप्रिल १९८४ च्या शासन निर्णयातील अटींची पूर्तता करीत नसल्यामुळे तसेच मृत्यूच्या वेळी यासीन यांना पेन्शन मिळत नव्हते, म्हणून त्यांना महाराष्टÑ नागरी सेवा (पेन्शन) नियम १९८२ लागू होत नव्हते. प्रशासनाने गुणवत्तेवर अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेणे अपेक्षित असले तरी प्रस्तुत ‘फॅमिली पेन्शन’सारख्या प्रकरणामध्ये दिरंगाई केल्याबाबत खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फॅमिली पेन्शन हा निवृत्त कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबियांसाठीचा आर्थिक साहाय्याचा स्रोत असतो. त्याचा लाभ त्यांना निर्धारित वेळेत मिळावा, अशी दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या, तसेच फॅमिली पेन्शनसाठीचा आपला वाटा संस्थेकडे जमा केलेल्या कर्मचाऱ्यांची माफक अपेक्षा असते, असे खंडपीठाने म्हटले आहे. 

प्रस्तुत प्रकरणाचा संदर्भ देत खंडपीठाने शासनाला निर्देश दिले आहेत की, येथून पुढे पेन्शनची प्रकरणे प्राप्त झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर निर्णय घ्यावा. निर्णय घेण्यास अमर्याद उशीर झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला वैयक्तिकरीत्या जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई, तसेच सेवा नियमानुसार कारवाई करावी. त्याचप्रमाणे निर्णयास उशीर केलेल्या कालावधीसाठी कसूरदार अधिकाऱ्याला व्याज द्यावे लागेल, असे आदेशात म्हटले आहे. सुनावणीदरम्यान याचिकाकर्तीला फॅमिली पेन्शन मंजूर केल्याचे प्रतिवाद्यांनी शपथपत्र दाखल केल्यामुळे खंडपीठाने अवमान याचिका निकाली काढली.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठPensionनिवृत्ती वेतनAurangabadऔरंगाबाद