शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

धक्कादायक ! देशात प्रत्येक तासाला १२ मुलांचे अपहरण; बाल कल्याण समितीची माहिती

By राम शिनगारे | Updated: October 12, 2022 20:23 IST

महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सुचनेनुसार शहर पोलीस आयुक्तालयाने 'बाल हक्क संरक्षण' विषयावर एमजीएममधील आर्यभट्ट सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

औरंगाबाद : देशात प्रत्येक तासाला तब्बल १२ अल्पवयीन मुलांचे अपहरण (मिसिंग) होत असल्याची नोंद होते. प्रत्येक दिवसाचे हे प्रमाण २८८ एवढे अवाढव्य आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार २०२० या वर्षामध्ये तब्बल ६० हजार मुलांचे अपहरण झाले. त्यातील मोठ्या संख्येने मुलांचा शोध लागलेला नसल्याची धक्कादायक माहिती बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने-कटके यांनी कार्यशाळेत बोलताना दिली.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सुचनेनुसार शहर पोलीस आयुक्तालयाने 'बाल हक्क संरक्षण' विषयावर एमजीएममधील आर्यभट्ट सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. आशा शेरखाने-कटके, महिला व बालविकास अधिकारी बी.एल. राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी ॲड.शेरखाने-कटके म्हणाल्या, आपल्या देशात मुले मिसिंग होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्याचवेळी अल्पवयीन मुलांना साबयर क्राईमचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. यात मोबाईलवरुन छेड काढणे, पाठलाग करणे, अश्लिल साहित्य पाठवणे असे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलमांसह सायबर कायद्याचेही कलम लावावे लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नसल्याचेही ॲड.शेरखाने-कटके यांनी सांगितले.

अधीक्षक कलवानिया, राठोड यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा समारोप पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या उपस्थितीत झाला. सूत्रसंचालन ग्रामीण भरोसा सेलच्या सपोनि अर्चना पाटील यांनी तर आभार शहर भरोसा सेलच्या निरीक्षक अम्रपाली तायडे यांनी मानले. कार्यशाळेत शहर आणि ग्रामीण भागातील अंमलदार, अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

कार्यशाळेत यांनी केले मार्गदर्शनफॉरेन्सिक विभागाचे चरणसिंग कायटे यांनी बालक, महिलांविषयीच्या साबयर गुन्ह्यातील पुरावे गोळा करणे, ॲड. अनिता शिऊरकर यांनी बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समितीचे कामकाज, डॉ. मनोहर बन्सवाल यांनी बाल संरक्षणात पोलिसांची भूमिका, प्रा. अपर्णा कोत्तापल्ले यांनी पोक्सो कायद्याचे महत्व, सरकारी अभियोक्त ॲड. देशपांडे यांनी बालकांच्या गुन्ह्यातील दोषसिद्धी वाढविणे, ॲड. सुप्रिया इंगळे यांनी जेजे ॲक्ट आणि बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे यांनी बाल विवाह कायद्याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद