शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना सत्तारांच्या भेटीला; भाजप मतदारांची गुप्त बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:58 IST

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात आता फोडाफ ोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांची सिल्लोडला जाऊन भेट घेऊन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर याला प्रत्युत्तर म्हणून दोन्ही जिल्ह्यांतील भाजप मतदारांनी बुधवारी गुप्त ठिकाणी बैठक घेऊन औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेससोबतची युती तातडीने तोडावी, यासाठी आग्रह धरला.

ठळक मुद्दे फोडाफोडीस सुरुवात : जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँगे्रससोबतची युती तोडण्याची मागणी

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात आता फोडाफ ोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांची सिल्लोडला जाऊन भेट घेऊन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर याला प्रत्युत्तर म्हणून दोन्ही जिल्ह्यांतील भाजप मतदारांनी बुधवारी गुप्त ठिकाणी बैठक घेऊन औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेससोबतची युती तातडीने तोडावी, यासाठी आग्रह धरला. दरम्यान, भाजपने दगा फटका केल्यास काँग्रेसमधील काही मते फोडण्यासाठी तसेच आ. सत्तारांच्या गटातील मतेही मिळावीत, यासाठी शिवसेनेने रणनीती आखल्याचे उमेदवार दानवे आणि आ. सत्तार यांच्या भेटीतून दिसते आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या जि. प. निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक गट सदस्य निवडून आलेले असतानाही केवळ तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि भाजप-शिवसेनेत राज्यपातळीवर पेटलेला राजकीय संघर्ष समोर ठेवून शिवसेनेने काँग्रेससोबत युती करीत भाजपला जि.प.मध्ये सत्तेत येण्यापासून रोखले. अध्यक्षपद शिवसेनेकडे आले, तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले. या सगळ्या राजकीय व्यूहरचनेत महायुतीचे उमेदवार दानवे आणि आ. सत्तार हे आघाडीवर होते. त्याचा राग भाजप सदस्यांच्या मनात कायम आहे. त्याचे पडसाद ४ आॅगस्ट रोजी चिकलठाण्यातील भाग्यश्री लॉनमध्ये झालेल्या एका बैठकीत उमटले. महापौर नंदकुमार घोडेले हे उमेदवार दानवे यांच्यासाठी मतदान मागण्यासाठी गेले, त्यावेळी भाजप सदस्यांनी त्यांना भाषण करू दिले नाही. आधी जि.प.मधील काँग्रेससोबतची युती तोडा, त्यानंतर भाजपचे मतदान मागण्यासाठी या, अशी आक्रमक भूमिका घेत सदस्यांनी महापौरांना बोलण्यास विरोध केला.भाजप मतदारांत संतापशिवसेनेच्या ‘डबलगेम’मुळे भाजपचे मतदार संतापले आहेत. एकीकडे जि.प.मध्ये सत्ता सोडायची नाही आणि दुसरीकडे भाजपच्या मतांची अपेक्षा ठेवायची, यावरून भाजपच्या मतदारांनी बुधवारी एका गुप्त ठिकाणी बैठक घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या बैठकीबाबत भाजपने कमालीचे मौन बाळगले असून, त्याची माहिती बाहेर येऊ दिलेली नाही. जिल्हा परिषदेतून सेनेने तातडीने बाहेर पडावे आणि भाजपला सहकार्य करावे, अशी भूमिका सध्या तरी भाजपची आहे. या सगळ्या राजकारणाचा काय परिणाम होणार, हे २२ आॅगस्ट रोजी मतमोजणीअंती स्पष्ट होईल.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादJalanaजालना