शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

शिवसेना सत्तारांच्या भेटीला; भाजप मतदारांची गुप्त बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:58 IST

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात आता फोडाफ ोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांची सिल्लोडला जाऊन भेट घेऊन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर याला प्रत्युत्तर म्हणून दोन्ही जिल्ह्यांतील भाजप मतदारांनी बुधवारी गुप्त ठिकाणी बैठक घेऊन औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेससोबतची युती तातडीने तोडावी, यासाठी आग्रह धरला.

ठळक मुद्दे फोडाफोडीस सुरुवात : जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँगे्रससोबतची युती तोडण्याची मागणी

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात आता फोडाफ ोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांची सिल्लोडला जाऊन भेट घेऊन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर याला प्रत्युत्तर म्हणून दोन्ही जिल्ह्यांतील भाजप मतदारांनी बुधवारी गुप्त ठिकाणी बैठक घेऊन औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेससोबतची युती तातडीने तोडावी, यासाठी आग्रह धरला. दरम्यान, भाजपने दगा फटका केल्यास काँग्रेसमधील काही मते फोडण्यासाठी तसेच आ. सत्तारांच्या गटातील मतेही मिळावीत, यासाठी शिवसेनेने रणनीती आखल्याचे उमेदवार दानवे आणि आ. सत्तार यांच्या भेटीतून दिसते आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या जि. प. निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक गट सदस्य निवडून आलेले असतानाही केवळ तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि भाजप-शिवसेनेत राज्यपातळीवर पेटलेला राजकीय संघर्ष समोर ठेवून शिवसेनेने काँग्रेससोबत युती करीत भाजपला जि.प.मध्ये सत्तेत येण्यापासून रोखले. अध्यक्षपद शिवसेनेकडे आले, तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले. या सगळ्या राजकीय व्यूहरचनेत महायुतीचे उमेदवार दानवे आणि आ. सत्तार हे आघाडीवर होते. त्याचा राग भाजप सदस्यांच्या मनात कायम आहे. त्याचे पडसाद ४ आॅगस्ट रोजी चिकलठाण्यातील भाग्यश्री लॉनमध्ये झालेल्या एका बैठकीत उमटले. महापौर नंदकुमार घोडेले हे उमेदवार दानवे यांच्यासाठी मतदान मागण्यासाठी गेले, त्यावेळी भाजप सदस्यांनी त्यांना भाषण करू दिले नाही. आधी जि.प.मधील काँग्रेससोबतची युती तोडा, त्यानंतर भाजपचे मतदान मागण्यासाठी या, अशी आक्रमक भूमिका घेत सदस्यांनी महापौरांना बोलण्यास विरोध केला.भाजप मतदारांत संतापशिवसेनेच्या ‘डबलगेम’मुळे भाजपचे मतदार संतापले आहेत. एकीकडे जि.प.मध्ये सत्ता सोडायची नाही आणि दुसरीकडे भाजपच्या मतांची अपेक्षा ठेवायची, यावरून भाजपच्या मतदारांनी बुधवारी एका गुप्त ठिकाणी बैठक घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या बैठकीबाबत भाजपने कमालीचे मौन बाळगले असून, त्याची माहिती बाहेर येऊ दिलेली नाही. जिल्हा परिषदेतून सेनेने तातडीने बाहेर पडावे आणि भाजपला सहकार्य करावे, अशी भूमिका सध्या तरी भाजपची आहे. या सगळ्या राजकारणाचा काय परिणाम होणार, हे २२ आॅगस्ट रोजी मतमोजणीअंती स्पष्ट होईल.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादJalanaजालना