शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

शिवसेना सत्तारांच्या भेटीला; भाजप मतदारांची गुप्त बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:58 IST

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात आता फोडाफ ोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांची सिल्लोडला जाऊन भेट घेऊन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर याला प्रत्युत्तर म्हणून दोन्ही जिल्ह्यांतील भाजप मतदारांनी बुधवारी गुप्त ठिकाणी बैठक घेऊन औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेससोबतची युती तातडीने तोडावी, यासाठी आग्रह धरला.

ठळक मुद्दे फोडाफोडीस सुरुवात : जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँगे्रससोबतची युती तोडण्याची मागणी

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात आता फोडाफ ोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांची सिल्लोडला जाऊन भेट घेऊन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर याला प्रत्युत्तर म्हणून दोन्ही जिल्ह्यांतील भाजप मतदारांनी बुधवारी गुप्त ठिकाणी बैठक घेऊन औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेने काँग्रेससोबतची युती तातडीने तोडावी, यासाठी आग्रह धरला. दरम्यान, भाजपने दगा फटका केल्यास काँग्रेसमधील काही मते फोडण्यासाठी तसेच आ. सत्तारांच्या गटातील मतेही मिळावीत, यासाठी शिवसेनेने रणनीती आखल्याचे उमेदवार दानवे आणि आ. सत्तार यांच्या भेटीतून दिसते आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या जि. प. निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक गट सदस्य निवडून आलेले असतानाही केवळ तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि भाजप-शिवसेनेत राज्यपातळीवर पेटलेला राजकीय संघर्ष समोर ठेवून शिवसेनेने काँग्रेससोबत युती करीत भाजपला जि.प.मध्ये सत्तेत येण्यापासून रोखले. अध्यक्षपद शिवसेनेकडे आले, तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले. या सगळ्या राजकीय व्यूहरचनेत महायुतीचे उमेदवार दानवे आणि आ. सत्तार हे आघाडीवर होते. त्याचा राग भाजप सदस्यांच्या मनात कायम आहे. त्याचे पडसाद ४ आॅगस्ट रोजी चिकलठाण्यातील भाग्यश्री लॉनमध्ये झालेल्या एका बैठकीत उमटले. महापौर नंदकुमार घोडेले हे उमेदवार दानवे यांच्यासाठी मतदान मागण्यासाठी गेले, त्यावेळी भाजप सदस्यांनी त्यांना भाषण करू दिले नाही. आधी जि.प.मधील काँग्रेससोबतची युती तोडा, त्यानंतर भाजपचे मतदान मागण्यासाठी या, अशी आक्रमक भूमिका घेत सदस्यांनी महापौरांना बोलण्यास विरोध केला.भाजप मतदारांत संतापशिवसेनेच्या ‘डबलगेम’मुळे भाजपचे मतदार संतापले आहेत. एकीकडे जि.प.मध्ये सत्ता सोडायची नाही आणि दुसरीकडे भाजपच्या मतांची अपेक्षा ठेवायची, यावरून भाजपच्या मतदारांनी बुधवारी एका गुप्त ठिकाणी बैठक घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या बैठकीबाबत भाजपने कमालीचे मौन बाळगले असून, त्याची माहिती बाहेर येऊ दिलेली नाही. जिल्हा परिषदेतून सेनेने तातडीने बाहेर पडावे आणि भाजपला सहकार्य करावे, अशी भूमिका सध्या तरी भाजपची आहे. या सगळ्या राजकारणाचा काय परिणाम होणार, हे २२ आॅगस्ट रोजी मतमोजणीअंती स्पष्ट होईल.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादJalanaजालना