शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 17:47 IST

देशातील एकूण राजकारण पाहता येत्या डिसेंबर महिन्यात दोन्ही निवडणुका होतील, असे बोलले जात आहे; परंतु माझे मत तसे नाही. माध्यमातही निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याबाबत वृत्त येत आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची तयारी पाहण्याच्या अनुषंगाने दोन दिवस मराठवाड्यातील संघटना व संघटनात्मक बैठक घेत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद : देशातील एकूण राजकारण पाहता येत्या डिसेंबर महिन्यात दोन्ही निवडणुका होतील, असे बोलले जात आहे; परंतु माझे मत तसे नाही. माध्यमातही निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याबाबत वृत्त येत आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची तयारी पाहण्याच्या अनुषंगाने दोन दिवस मराठवाड्यातील संघटना व संघटनात्मक बैठक घेत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. या बैठकीला काही लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबळ हे स्वबळावर लढण्याइतके  सक्षम आहे काय? पक्षाकडून लढणार, पक्षातून जाणार  कोण, याची चाचपणी ठाकरे यांनी केली.

सुभेदारी विश्रामगृह येथे मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे म्हणाले, भाजपसोबत युती करणार नाही, असे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठरले आहे. इतर पक्षाची तयारी वेगाने सुरू आहे. निवडणुकीत कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. शिवाय नेत्यांनी दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठवाड्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावले होते. संघटनेबाबत चर्चा केली, बैठक घेणे हा नवीन प्रकार नाही. शिवसेना पदाधिकाऱ्यांशी मोकळेपणाने बोलता आले, त्यांच्या सूचना व प्रश्न ऐकले. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मराठवाड्यानंतर इतर महाराष्ट्रातही बैठका घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पक्षाची भूमिका ठरविण्यात येणार आहे. मराठवाड्यातील बैठकीत कोणतीही तक्रार आली नसल्याचा दावा त्यांनी केला. 

कदम यांच्या कचाट्यातून कुणी सुटणार नाहीपालकमंत्री म्हणून जर रामदास कदम असते तर कचराकोंडी झाली नसती. पक्षप्रमुखांना क्षमा मागण्याची वेळ आली नसती, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, कदम यांच्यावर दुसरी जबाबदारी दिली ती खैरेंच्या तक्रारींमुळे नाही. जेथे गरज असेल तेथे कदम पक्षासाठी काम करतात. त्यांनी आजवर यशच मिळवून दिले आहे. कदम औरंगाबाद सोडून कुठेही गेलेले नाहीत, ते येथेच बसलेले आहेत. त्यांच्या कचाट्यातून कुणी सुटणार नाही, असा सूचक टोला ठाकरे यांनी उपस्थिताना लगावला. डॉ.दीपक सावंत आणि खा.चंद्रकांत खैरे यांच्यात वाद सुरू झाले आहेत. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या विरोधातही खा.खैरेंनी तक्रारी केल्या होत्या. यावर ठाकरे म्हणाले, पालकमंत्री सावंत दुसऱ्या जिल्ह्यात होते. जिथे जिथे गरज असते तिथे ते जातात, त्यामुळे कुणातही वाद नाही, असे वाटते. 

शिस्त मोडून कुणी वागू शकत नाहीकन्नडचे आ.हर्षवर्धन जाधवांचा बंदोबस्त करणार की, तक्रार ज्यांच्या विरोधात त्यांचा बंदोबस्त करणार. यावर पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, बंदोबस्त हा शब्द आला कुठून. आ.जाधव यांनी माझ्याकडे काहीही तक्रार केली नाही. त्यांना मी पुन्हा भेटीला बोलावले आहे. त्यांनी जरी तक्रार केली असली तरी ते मला काहीही बोलले नाहीत. शिवसेना शिस्तबद्ध संघटना आहे. शिस्त मोडून कुणी वागू शकत नाही. खैरे व जाधव या दोघांमध्ये काही गैरसमज असतील तर दूर करू. ठाकरे यांनी जाधव यांना अल्टिमेटम दिले की, त्यांच्या तक्रारीचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे, हे कळण्यास  मार्ग नाही.  

विमानाने फिरणारे; इमानाने वागणारेपक्षप्रमुख ठाकरे यांनी आ.संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाचे गुरुवारी सकाळी उद्घाटन केले. याप्रसंगी ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांनी मोठे व्हावे, हीच भावना आहे. शिरसाट यांच्या कार्यालयात विमानाच्या प्रतिकृतीचे अ‍ॅण्टीचेंबर केले आहे. ते जरी विमानाने फिरणारे असले तरी ते इमानाने वागणारे आहेत. मागील वर्षी आ.शिरसाट हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्या अनुषंगाने विमान आणि इमान यांची तुलना करणारे   मोजकेच शब्द शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी काढून सूचक इशारा दिला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेRamdas Kadamरामदास कदमHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव