शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 17:47 IST

देशातील एकूण राजकारण पाहता येत्या डिसेंबर महिन्यात दोन्ही निवडणुका होतील, असे बोलले जात आहे; परंतु माझे मत तसे नाही. माध्यमातही निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याबाबत वृत्त येत आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची तयारी पाहण्याच्या अनुषंगाने दोन दिवस मराठवाड्यातील संघटना व संघटनात्मक बैठक घेत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद : देशातील एकूण राजकारण पाहता येत्या डिसेंबर महिन्यात दोन्ही निवडणुका होतील, असे बोलले जात आहे; परंतु माझे मत तसे नाही. माध्यमातही निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याबाबत वृत्त येत आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची तयारी पाहण्याच्या अनुषंगाने दोन दिवस मराठवाड्यातील संघटना व संघटनात्मक बैठक घेत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. या बैठकीला काही लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबळ हे स्वबळावर लढण्याइतके  सक्षम आहे काय? पक्षाकडून लढणार, पक्षातून जाणार  कोण, याची चाचपणी ठाकरे यांनी केली.

सुभेदारी विश्रामगृह येथे मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे म्हणाले, भाजपसोबत युती करणार नाही, असे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठरले आहे. इतर पक्षाची तयारी वेगाने सुरू आहे. निवडणुकीत कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. शिवाय नेत्यांनी दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठवाड्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावले होते. संघटनेबाबत चर्चा केली, बैठक घेणे हा नवीन प्रकार नाही. शिवसेना पदाधिकाऱ्यांशी मोकळेपणाने बोलता आले, त्यांच्या सूचना व प्रश्न ऐकले. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मराठवाड्यानंतर इतर महाराष्ट्रातही बैठका घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पक्षाची भूमिका ठरविण्यात येणार आहे. मराठवाड्यातील बैठकीत कोणतीही तक्रार आली नसल्याचा दावा त्यांनी केला. 

कदम यांच्या कचाट्यातून कुणी सुटणार नाहीपालकमंत्री म्हणून जर रामदास कदम असते तर कचराकोंडी झाली नसती. पक्षप्रमुखांना क्षमा मागण्याची वेळ आली नसती, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, कदम यांच्यावर दुसरी जबाबदारी दिली ती खैरेंच्या तक्रारींमुळे नाही. जेथे गरज असेल तेथे कदम पक्षासाठी काम करतात. त्यांनी आजवर यशच मिळवून दिले आहे. कदम औरंगाबाद सोडून कुठेही गेलेले नाहीत, ते येथेच बसलेले आहेत. त्यांच्या कचाट्यातून कुणी सुटणार नाही, असा सूचक टोला ठाकरे यांनी उपस्थिताना लगावला. डॉ.दीपक सावंत आणि खा.चंद्रकांत खैरे यांच्यात वाद सुरू झाले आहेत. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या विरोधातही खा.खैरेंनी तक्रारी केल्या होत्या. यावर ठाकरे म्हणाले, पालकमंत्री सावंत दुसऱ्या जिल्ह्यात होते. जिथे जिथे गरज असते तिथे ते जातात, त्यामुळे कुणातही वाद नाही, असे वाटते. 

शिस्त मोडून कुणी वागू शकत नाहीकन्नडचे आ.हर्षवर्धन जाधवांचा बंदोबस्त करणार की, तक्रार ज्यांच्या विरोधात त्यांचा बंदोबस्त करणार. यावर पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, बंदोबस्त हा शब्द आला कुठून. आ.जाधव यांनी माझ्याकडे काहीही तक्रार केली नाही. त्यांना मी पुन्हा भेटीला बोलावले आहे. त्यांनी जरी तक्रार केली असली तरी ते मला काहीही बोलले नाहीत. शिवसेना शिस्तबद्ध संघटना आहे. शिस्त मोडून कुणी वागू शकत नाही. खैरे व जाधव या दोघांमध्ये काही गैरसमज असतील तर दूर करू. ठाकरे यांनी जाधव यांना अल्टिमेटम दिले की, त्यांच्या तक्रारीचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे, हे कळण्यास  मार्ग नाही.  

विमानाने फिरणारे; इमानाने वागणारेपक्षप्रमुख ठाकरे यांनी आ.संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाचे गुरुवारी सकाळी उद्घाटन केले. याप्रसंगी ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांनी मोठे व्हावे, हीच भावना आहे. शिरसाट यांच्या कार्यालयात विमानाच्या प्रतिकृतीचे अ‍ॅण्टीचेंबर केले आहे. ते जरी विमानाने फिरणारे असले तरी ते इमानाने वागणारे आहेत. मागील वर्षी आ.शिरसाट हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्या अनुषंगाने विमान आणि इमान यांची तुलना करणारे   मोजकेच शब्द शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी काढून सूचक इशारा दिला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेRamdas Kadamरामदास कदमHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव