शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

शिवसेनेतील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरातूनच तिकिटासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 20:23 IST

दबक्या आवाजातील सवाल, कार्यकर्त्यांनी काय जन्मभर सतरंज्या उचलायच्या का?

ठळक मुद्देचर्चा तर होणारच वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष

औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेच्या विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून आपल्याच घरात उमेदवारी रहावी यासाठी प्रयत्न केले जात असून, किमान १५ जागा या नेत्यांना हव्या असल्याची माहिती समोर येत आहे. नेत्यांच्या या प्रयत्नांमुळे सेनेतील इच्छुक कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाण्याची दाट शक्यता आहे. 

घरातील सदस्याबरोबरच काहींनी निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी उमेदवारीचे प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे शिवसेना नेते, लोकप्रतिनिधी, आणि पदाधिकाऱ्यांच्याच घरात अधिक जागा जातील, अशी  चर्चा सध्या महापालिका वर्तुळात सुरू आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरात ३ जागा मिळाव्यात यासाठी तयारी सुरू आहे. यात चिरंजीव, पुतण्यासह अन्य एका कुटुंब सदस्याचा समावेश आहे. आ. प्रदीप जैस्वाल यांच्या घरातून मुलगा व नातलगातून एक, अशा दोघांना उमेदवारी हवी आहे.  आ. संजय शिरसाट यांनाही मुलगा आणि अन्य एक अशा दोन जागा हव्या आहेत. चिरंजीव आणि कन्या निवडणुकीच्या रणांगणात ते आणतील, अशी चर्चा आहे.

सभागृह नेते विकास जैन यांना स्वत:ला आणि पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांना तीन जागा हव्या आहेत. चिरंजीव, पत्नी आणि स्वत:साठी उमेदवारी मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे हे भावासाठी उमेदवारी मिळावी, या प्रयत्नात आहेत. राजू वैद्य हेही स्वत:सह आणखी एका समर्थकाला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. राजेंद्र जंजाळ स्वत:साठी किंवा पत्नीसाठी आणि त्र्यंबक तुपे हे स्वत:साठी पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निष्ठावान कायकर्ते तसेच विद्यमान नगरसेवकांपैकी काही जणांना स्वत:ला, आईला उमेदवारी आहे. तसेच पत्नी, पती आणि चिरंजीवालादेखील उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा आहे. मनपातील एका ज्येष्ठ अभियंत्यांच्या भाच्याला उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनीही सेना नेत्यांमार्फत उमेदवारी मिळण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा कानावर येत आहे. 

इच्छुकांच्या गुपचूप बैठका; मात्र युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नाही शिवसेनेकडून सध्या इच्छुकांच्या गुपचूप बैठका सुरू असून, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या बैठकीचे निमंत्रणही नसते. तसेच इतर पदाधिकाऱ्यांनादेखील इच्छुकांच्या बैठकीला निरोप दिला जात नाही, त्यांनाही नियमित बैठकीला बोलावले जात नाही. रचनेनंतर वॉर्डाची सीमा कुठून कुठपर्यंत आहे, याचीही माहिती अनेक इच्छुकांना नाही. त्यांना मात्र निरोप दिले जात आहेत, अशी ओरड सध्या सुरू आहे. बंडखोरी करणारे, पक्षकार्यात कोणतेही योगदान नसलेल्यांऐवजी निष्ठावानांना आतापासूनच डावलले जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ज्यांनी सतरंज्या उचलल्या, पक्षाचे काम केले, जे तरुणांचे युवक आणि युवकांचे प्रौढ झाले, त्यांचा विचार होण्याऐवजी नेत्यांच्या घरातच उमेदवारीच्या वाटाघाटी होत असतील तर कसे करायचे, यावर कार्यकर्ते चिंतन करू लागले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक