शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिवसेनेने दाखविला काँग्रेसला ‘हात’; औरंगाबाद जि.प. सभापती निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 12:23 IST

राज्यमंत्री सत्तार-अंबादास दानवे यांची खेळी यशस्वी

ठळक मुद्देजि.प. सभापती निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी तीन सभापती शिवसेनेचे, तर एक भाजपचा

औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मंगळवारी चार सभापतीपदांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला हरताळ फासत शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले, तर भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची वर्णी महिला व बालकल्याण सभापतीपदी लागली. ऐनवेळी सभागृहात शिवसेनेने केलेल्या दगाफटक्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसारली होती. शिवसेनेने ठरवून खेळी केल्यामुळेच शिवसेनेचा महत्त्वाचा एकही पदाधिकारी जिल्हा परिषदेत आला नसल्याचीही चर्चा सुरू  होती.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, समाजकल्याण, बांधकाम व वित्त आणि शिक्षण व आरोग्य  सभापती निवडीसाठी मंगळवारी (दि.१४) विशेष सभा आयोजित केली होती. यात महाविकास आघाडीमध्ये बांधकाम आणि समाजकल्याण हे दोन सभापतीपद काँग्रेसच्या वाट्याला आणि शिवसेनेकडे महिला व बालकल्याण आणि शिक्षण व आरोग्य हे दोन सभापती पद देण्यात येणार होते. हे सत्तावाटप ठरले होते. मात्र, उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने ऐनवेळी भाजपशी हातमिळवणी करीत तीन सभापतीपदे मिळवली आहेत. यासाठी त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. 

महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी शिवसेनेकडून मोनाली राठोड आणि भाजपकडून अनुराधा चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली होती. भाजप आणि शिवसेनेत ठरल्याप्रमाणे मोनाली राठोड यांनी माघार घेत भाजपच्या अनुराधा चव्हाण यांना बिनविरोध निवडून दिले. समाजकल्याण सभापतीपदासाठी मनसेचे विजय चव्हाण, शिवसेनेचे रमेश पवार आणि मोनाली राठोड यांनी उमेदवारी दाखल केली. यात विजय चव्हाण आणि रमेश पवार यांनी माघार घेतल्यामुळे मोनाली राठोड बिनविरोध विजयी झाल्या. बांधकाम व वित्त आणि शिक्षण व आरोग्य या विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी शिवसेनेचे अविनाश गलांडे, रमेश पवार, काँग्रेसकडून पंकज ठोंबरे, श्रीराम महाजन आणि शिवसेनेत प्रवेश केलेले राज्यमंत्री सत्तार समर्थक किशोर बलांडे यांनी उमेदवारी दाखल केली. महिला व बालकल्याण सभापतीपदी भाजपच्या अनुराधा चव्हाण यांना बिनविरोध निवडून दिल्यामुळे अविनाश गलांडे आणि किशोर बलांडे यांना भाजपने मदत करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे सभागृहात काँग्रेस अल्पमतात आली. 

याचा परिणाम काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि अपक्षांनीही बलांडे आणि गलांडे यांना मतदान केले. त्यामुळे दोघांना ६० मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीता दीपकसिंग राजपूत या मात्र तटस्थ राहिल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महिला व बालकल्याण सभापती म्हणून अनुराधा चव्हाण आणि समजाकल्याण सभापती म्हणून मोनाली राठोड यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. तसेच अविनाश गलांडे आणि किशोर बलांडे यांच्याकडून विषय समित्यांची निवड येत्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे.

राज्यमंत्री सत्तार-अंबादास दानवे यांची खेळी यशस्वीराज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहा समर्थक सदस्यांना सोबत घेत भाजपच्या मदतीने बंडखोरी केली होती. अध्यक्षपदाला थोडक्यात अपयश आले. उपाध्यक्षपदी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे समर्थक शुभांगी काजे यांचा पराभव झाला. सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपला एक पद देत उर्वरित तीन पदे शिवसेनेने मिळवली. यात सत्तार समर्थक एक आणि जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे समर्थक दोघाला सभापतीपदे मिळाली आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी खैरे यांनी खडसावल्यामुळे बंडखोरी करणाऱ्या मोनाली राठोड यांना सभापतीपदाचे बक्षीस मिळाले, तर सत्तार यांचे खैरे यांच्याशी वाद झाल्यानंतरही त्यांच्या समर्थक सदस्याला महत्त्वाचे सभापती मिळविण्यात त्यांना यश आले. या निवडणुकीत राज्यमंत्री सत्तार व आ. दानवे यांची खेळी यशस्वी ठरल्याची चर्चा करण्यात येत होती. कन्नड, वैजापूर, पैठण तालुक्याला यावेळी कोणतेही पद मिळाले नाही. 

काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळलाकाँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचा धर्म पाळला. मात्र, शिवसेनेने काँग्रेसला ऐनवेळी धोका दिला. अगोदरच असे करणार हे माहीत असते, तर आम्हालाही वेगळी भूमिका घेता आली असती. तरीही सभागृहात महाविकास आघाडीमध्ये फूट नको म्हणून शिवसेनेने दिलेल्या तिन्ही सभापतीपदांच्या उमेदवाराला काँग्रेसने मतदान केले. अशा पद्धतीने दिलेला धोका चुकीचा आहे.    - श्रीराम महाजन, गटनेता, काँग्रेस, जि.प.

काँग्रेसने अवास्तव मागण्या केल्याशिवसेनेने कोणताही धोका काँग्रेसला दिलेला नाही. काँग्रेसकडे संख्याबळ नसतानाही त्यांनी अवास्तव दोन सभापतीपदांची मागणी केली. त्यांना महिला व बालकल्याण हे सभापतीपद देण्याचा निर्णय शिवसेनेने केला होता. मात्र, त्यांना बांधकाम व वित्त आणि समाजकल्याण सभापतीपद हवे होते. ती मागणी शिवसेनेने मान्य केली नाही. तरीही शिवसेनेने महिला व बालकल्याण या सभापतीपदासाठी उमेदवार दिला नाही. काँग्रेसने देणे अपेक्षित होते. त्यामुळे त्याठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी झाला. शिवसेनेचा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची यातून भरपाई झाली आहे.- आ. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस