शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

राज्यात शिवसेना-भाजपचा पोरखेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:53 IST

मुख्यमंत्री, मंत्री हे केंद्रातून हाकलले जातात. रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नियंत्रण आहे. कोणाला काही बोलू दिले जात नाही. देशात ही एक प्रकारे आणीबाणीची परिस्थिती आहे. दुसरीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपचा पोरखेळ सुरू आहे, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.

ठळक मुद्देराज ठाकरे : पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज्य, केंद्र सरकारवर निशाणा; देशात आणीबाणीची परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुख्यमंत्री, मंत्री हे केंद्रातून हाकलले जातात. रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नियंत्रण आहे. कोणाला काही बोलू दिले जात नाही. देशात ही एक प्रकारे आणीबाणीची परिस्थिती आहे. दुसरीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपचा पोरखेळ सुरू आहे, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.मनसेनेच्या पदाधिकाºयांचा गुरुवारी (दि. १९) तापडिया नाट्यमंदिरात मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. मनसेचे अभिजित पानसे, राजू पाटील, संदीप देशपांडे, आदित्य शिरोडकर, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरी, राजेश येरुनकर, भास्कर गाडेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, शहर उपाध्यक्ष आशिष सुरडकर, अब्दुल रशीद खान यांची उपस्थिती होती.ठाकरे म्हणाले, सत्तेवर बसलेल्यांना लोक विटले आहेत. लोकांसमोर पर्याय नाही. त्यामुळे मराठवाड्यात अनेक प्रश्न आ वासून उभा आहे. देशात सध्या सदृृढ लोकशाही नाही. नोटाबंदीनंतर देशात साडेतीन कोटी लोकांच्या नोकºया गेल्या. केंद्र सरकार विकासकामे दाखवू शकत नाही. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दंगली घडविल्या जातात. पुढेही हाच धोका आहे.नोटाबंदीनंतर भाजपकडे पैसानोटाबंदीनंतर भाजपकडे जेवढे पैसे आले तेवढे त्यापूर्वी नव्हते. उद्योगपतींकडे पैसे मागत असे. आता उद्योगपती नको आहेत. निवडणुकीत काळा पैसा बाहेर येत आहे, असा आरोप त्यांनी केला.दंगलीने २५०० कोटींचीगुंतवणूक रद्दविप्रो कंपनी २ हजार ५०० कोटींची गुंतवणूक औरंगाबादेत करणार होती. नवीन नोकºया निर्माण होणार होत्या; परंतु ज्या दिवशी औरंगाबादेत दंगल झाली, त्या दिवशी विप्रो कंपनीने शहरातील प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. एका दंगलीने हे सगळे झाले.काँग्रेस- राष्टÑवादी परवडलीठाकरे म्हणाले, मोदी सरकार खोटं बोलणारं सरकार असून, काँँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस परवडले, असे म्हणण्याची वेळ येत आहे. शिवसेना-भाजप एकमेकांवर आरोप करतात. केंद्र सरकारवर अविश्वास ठराव येत आहे. त्यात शिवसेना काय करते, हे पाहायचे आहे. शिवसेना नाणार प्रकल्पाला विरोध करीत आहे. केंद्र सरकार पाठिंबा देत आहे.मनपा खाऊन रिकामी करण्यासाठी नाहीऔरंगाबादेत कचºयाचा प्रश्न भीषण बनला आहे. नाशिक महापालिका ५ वर्षे मनसेच्या हातात होती. कचरा व्यवस्थापनाचे तेथे केलेले नियोजन जाऊन पहा. ज्यांच्या हातात २५ ते ३० वर्षे शहराची सत्ता दिली, त्यांच्याकडून हे झाले नाही. शहर बकाल होत आहे. पालिका खाऊन फक्त रिकामी करण्यासाठी नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी मेळाव्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. मनसेने नाशिकमध्ये कचरा व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन केले आहे. डम्पिंग ग्राऊंड, कचरा गोळा करण्याची पद्धत, घंटागाड्यांना जीपीआरएसने जोडले आहे. त्यावर काटेकोर निरीक्षण ठेवले जाते. ओला-सुक्या कचºयातून खत प्रकल्प केला. प्लास्टिक पिशव्यांपासून इथोनॉल बनविले जाते. ते उद्योगांकडून विकत घेतले जाते. ही सर्व यंत्रणा केवळ पाच वर्षात उभारली. औरंगाबादेत शिवसेनेच्या हातात इतके वर्षे सत्ता दिली. सत्ताधाºयांनी काहीही केले नाही, याबाबत नागरिकांनी जाब विचारला पाहिजे.‘लोकमत’चे कौतुकसरकारवर टीका करू नये, अशी परिस्थिती देशात निर्माण केली जात आहे. काही लिहू द्यायचे नाही, बोलू द्यायचे नाही. माध्यमांवर दबाव आणला जातो. याविरुद्ध कुणीच काही बोलत नाही. काही जण सरकारच्या धोरणांवर टीका करीत आहेत, आपली जबाबदारी पार पाडत आहेत, असे सांगत राज ठाकरे यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले. यावेळी त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीचा अणि दोन वर्तमानपत्रांचाही उल्लेख केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादMNSमनसेState Governmentराज्य सरकार