शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

Shiv Sena-BJP tussle : जालना रोडवर उड्डाणपूल बांधण्यावरून शिवसेना-भाजपात ‘सोशल’ वॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 15:48 IST

गेल्यावर्षी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर जालना रोडवरील उड्डाणपूल विमानतळासमोर ऐवजी अमरप्रीत चौकात बांधण्याचे ठरले होते.

ठळक मुद्देविमानतळासमोरचा पूल अमरप्रीत चौकात बांधण्याची भाजपाची मागणीशिवसेनेने आजवरच्या अपघाताचे दाखले देत पुलाची जागा योग्य म्हटले

औरंगाबाद: नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने जालना रोड पुनर्बांधणीच्या ४०० कोटींच्या मूळ प्रस्तावाला फाटा देत फक्त ७४ कोटींचा निधी दिला असून त्यातून जालना रोडच्या साईडड्रेनसह उड्डाणपुलांचे काम करण्यात येणार आहे. विमानतळासमोर उड्डाणपूल प्रस्तावित असून तो पूल अमरप्रीत किंवा आकाशवाणी चौकात बांधण्याची गरज आहे. यासाठी सोशल मीडियातून भाजपानेच विरोध सुरू केला आहे. त्यात शिवसेनेने उडी घेत विमानतळासमोरच पूल बांधणे गरजेचे असल्याचे सांगून आजवरच्या अपघाताचे दाखले सोशल मीडियातून दिले आहेत.

गेल्यावर्षी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर जालना रोडवरील उड्डाणपूल विमानतळासमोर ऐवजी अमरप्रीत चौकात बांधण्याचे ठरले होते. क्रांतीचौक येथील उड्डाणपुलाला जोडून मोंढा नाक्यापर्यंत नवीन पूल ‘लँड’ करण्याचा निर्णय झाला होता. परंतु अमरप्रीत चौकात पूल बांधणे शक्य नाही. तेथे अंडरग्राऊंडला जलवाहिन्यांचे मोठे जाळे आहे. ते जाळे विस्कळीत झाल्यास ५० वसाहतींच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होईल. अमरप्रीत चौकात होणारा पूल तांत्रिक दृष्ट्या सुरक्षित असेल की नाही, याबाबत एनएचएआयच्या यंत्रणेला साशंकता होती. त्यामुळे पूल पुन्हा विमानतळासमोरच बांधण्याचे निश्चित झाल्याचे एनएचएआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

विमानतळासमोरील पूल का केला होता रद्दविमानतळासमोर जास्त वाहतूक नसते असा अहवाल वाहतूक पोलिसांनी दिला होता. अमरप्रीत चौकात बीडबायपास, दर्गा रोडवरून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तेथे पूल प्रस्तावित करण्याबाबत तत्कालीन प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी विभागीय बैठकीत सांगितले होते.

भाजपाचा विरोध असाभाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत देसरडा यांनी सोशल मीडियातून विमानतळासमोरील पुलाला विरोध केला आहे. वाहतुकीचा विचार करता अमरप्रीत किंवा आकाशवाणी चौकात हा पूल बांधण्यात यावा. विमानतळासमोर पुलाची गरज नसून नागरिकांनी त्याला विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. याप्रकरणी देसरडा यांनी सांगितले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. दोन्ही ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या पूल बांधणे शक्य आहे.

शिवसेनेने दिलेले उत्तर असेशिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज गांगवे यांनी सोशल मीडियातूनच विमानतळापासून रामनगरपर्यंत किती अपघात झाले आहेत, वाहतूक किती आहे याचे दाखले दिले आहेत. केंद्रात सरकार भाजपाचे आहे, त्यामुळे भाजपाने शहरासाठी आणखी दोन पुलांसाठी निधी आणावा असे आव्हानही दिले आहे. विमानतळासमोरील पुलाचे लोकेशन आता पुन्हा बदलले तर या भागातील सर्व वॉर्डातील नागरिकांसह आंदोलन उभारण्याचा इशारा गांगवे यांनी दिला..

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादBJPभाजपा