शहरं
Join us  
Trending Stories
1
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
3
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
4
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
5
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
6
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
7
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
8
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
9
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
10
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
11
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
12
तुम्ही दुबार मतदार असाल तर सादर करावे लागणार २ पुरावे; मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतले जाणार
13
अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
14
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
15
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
16
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
17
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
18
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
19
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
20
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून आता उद्धव ठाकरे भाजपासोबत येणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितली मन की बात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 17:07 IST

शिवसेना-भाजपा एकत्र आले पाहिजे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

शिवसेना-भाजपा एकत्र आले पाहिजे. दोन्ही काँग्रेससोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. जुन्या फार्मुल्यावर एक असल्यास भाजपा देखील तयार होईल, असं मत केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे प्रमुख नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद येथील बिडकीन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात बोलत होते.

भाजपा आणि शिवसेनेचा २५ वर्षांचा संसार केवळ मुख्यमंत्रिपदामुळे तुटला. मुख्यमंत्रिपदाचा शब्दच दिला नव्हता त्यामुळे ५ वर्ष की अडीज वर्ष हा विषयच नसून दिलेला शब्द मोडण्याची आमची संस्कृती नाही, असं भाजपने अनेकवेळा स्पष्टीकरण दिलेलं आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर आम्हाला नक्कीच आनंद झाला असता, पण त्यांना आता पाच वर्षे पूर्ण मिळाले असल्याने ते आता भाजपसोबत येणार नाही, असं मत देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

सरकार पाडण्याचा आमचा मानस नाही, त्यामुळे संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीचा होत नाही, मोदी सरकारला अशा छोट्या चौकशी करण्याची गरज नाही. केंद्र विकास आराखडा घेऊन पुढे जात आहे.आमचे सरकार मुद्दाम कोणाला त्रास देणार नाही. राज्यात आताच्या घडीला सुरू असलेले भांडण मिटले पाहिजे, असे आम्हाला वाटते. उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा आणि संजय राऊत यांना समज द्यावी, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

ठोस पुरावे नसताना आरोप करू नये- 

ठोस पुरावे नसताना आरोप करू नये. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावर कारवाई करणारे अधिकारी इतके वर्ष झोपले होते का? सुडाची भूमिका असू नये. कंगना यांचे कार्यालय देखील तोडण्यात आले होते, असे रामदास आठवले म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRamdas Athawaleरामदास आठवलेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी