शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

चार हजार जणांचे व-हाड जाणार शिर्डीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:42 IST

शुक्रवारी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान आवास योजनेंतर्गत’ पूर्ण झालेल्या घरकुलांचा ई- गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सरकारी पैशातून जिल्ह्यातील ४ हजार वºहाडींना नेले जाणार आहे.

विजय सरवदेऔरंगाबाद : शुक्रवारी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान आवास योजनेंतर्गत’ पूर्ण झालेल्या घरकुलांचा ई- गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सरकारी पैशातून जिल्ह्यातील ४ हजार वºहाडींना नेले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने यासाठी तब्बल १२ लाख रुपये खर्चून राज्य परिवहन मंडळाच्या ८० बसेस आरक्षित केल्या आहेत.

शुक्रवारी श्रीसाई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप आहे. या कार्यक्रमाचा मुहूर्त साधून राज्य सरकारने शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घरकुलांच्या ई- प्रवेश सोहळ्याचे आयोजन केले आहे. राज्य सरकारने या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला अलोट गर्दी दिसली पाहिजे म्हणून की काय, प्रत्येक जिल्ह्यातून पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारी पैशातून नेले जाणार आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या तीन वर्षांत ६ हजार १९२ घरकुले पूर्ण झाली आहेत. यापैकी २ हजार घरकुलांचे लाभार्थी व त्यांच्यासोबत प्रत्येकी एक नातेवाईक असे एकूण ४ हजार जणांना शिर्डीला नेण्यासाठी सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

शिर्डीला नेण्यात येणारे २ हजार लाभार्थी व त्यांचे २ हजार नातेवाईक, अशा ४ हजार नागरिकांच्या प्रवासासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ८० बसेस आरक्षित केल्या आहेत. बस व नाश्ता-पाण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला शासनाकडून निधीदेखील प्राप्त झाला आहे. प्रती बस १५ हजार रुपयांप्रमाणे ८० बसेससाठी १२ लाख रुपये व सरकारी वºहाडाच्या नाश्ता- पाण्यासाठी वेगळा निधी मिळाला आहे. गुरुवारी मध्यरात्रीच परिवहन मंडळाच्या बसेस तालुका तसेच मोठ्या गावांमध्ये दाखल होतील. तेथून शिर्डीला नेण्यात येणारे लाभार्थी व त्यांच्या नातेवाईकांना बसमध्ये घेऊन जाण्यासाठी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंते व अन्य सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या उपक्रमावर गटविकास अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणार आहे.

जिल्ह्यात सहा हजार घरकुले पूर्णयासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले की, जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेला सन २०१६-१७ पासून प्रारंभ झाला. सन २०२२ पर्यंत २१ हजार ३०६ घरकुले उभारली जाणार आहेत. तीन वर्षांत १० हजार २०५ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, आजपर्यंत ६ हजार १९२ घरकुले पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहे. घरकुल उभारण्यासाठी प्रती लाभार्थी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान टप्प्या टप्प्याने दिले जाते.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद