शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

औरंगाबादच्या जागेसाठी शिंदेसेनेकडे तीन इच्छुक, मुख्यमंत्री उद्या निर्णय घेणार: संजय शिरसाट

By बापू सोळुंके | Updated: April 15, 2024 16:54 IST

महाविकास आघाडी सोबत असलेल्या उद्धव सेनेने हिंदुत्व सोडले आहे, उबाठा म्हणजे मतासाठी लाचार झालेली जमात

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद  लोकसभेची जागा शिवसेनेचीच आहे, आमच्याकडे पालकमंत्री संदीपान भुमरे, राजेंद्र जंजाळ आणि विनोद पाटील हे तीन जण इच्छुक आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारीसंदर्भात उद्या निर्णय घेणार असल्याचे  शिंदेसेनेचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

महाविकास आघाडी सोबत असलेल्या उद्धव सेनेने हिंदुत्व सोडले आहे, उबाठा म्हणजे मतासाठी लाचार झालेली जमात असल्याची खरमरी टीकाही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली. आजपर्यंत झालेल्या निवडणुकीत शिवसेना खान हवा की बाण असा प्रचार करीत होते. यंदाच्या निवडणूकीत हा मुद्दा बाजुला पडला का, असे विचारले असता आ.शिरसाट म्हणाले की,  उद्धव सेनेसाठी हिंदुत्व हा शब्द संपला आहे.  बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व असे म्हणायचे. आताची उबाठा सेना मतासाठी लाचार झालेली एक जमात बनली आहे. आम्ही जातीपातीचे राजकारण करत नाही, देशविरोधी मुस्लिमांना आमचा विरोध असल्याचे ते म्हणाले. 

उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार पाठवून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये चंदा लो, धंदा लो असा आरोप  समाज माध्यमावर केला आहे , याकडे लक्ष वेधले असता आ. शिरसाट म्हणाले श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे.  या संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना केल्या जाणाऱ्या मदतीवर आक्षेप कशासाठी.  संस्थेच्या कारभाराबाबत  माहिती अधिकारात धर्मादाय आयुक्ताकडून सर्व माहिती घ्यावी, काही चुकीचे घडले तर कारवाई करा,गुन्हे नोंदवा पण असे बेछुट आरोप करू नका असे. आ. शिरसाट म्हणाले. 

अशा आरोप करणाऱ्यावर लोक विश्वास ठेवत नाही. खैरे यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले मात्र शासनाचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप केला आहे. याविषयी शिरसाट म्हणाले. खैरे यांना मुख्यमंत्र्याकडे जाण्यास लाज वाटत असेल तर त्यांनी मुख्य सचिवाकडे जावे आणि शासनाने नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी काय उपाययोजना केली याची माहिती घ्यावी असा टोला लगावला. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मुख्य सचिवांनी नुकतीच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे बैठक घेतली आहे.  नाशिक, छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेचीचमुख्यमंत्र्यांनी एक जागा राष्ट्रवादीला देण्याचे सांगितले होते, यामुळे नाशिकची जागा राष्ट्रवादीला हवी असल्याचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाल्याकडे आ. शिरसाट यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, महायुतीमध्ये सामजंस्याची भूमिका  मुख्यमंत्र्यांनीच घ्यायची का, असा सवाल केला.  पटेल यांनी उगाच उड्या मारू नये, नाशिकची , छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच आहे. ही मिळविण्यासाठी प्रतिष्ठा लागली  असल्याचेही ते म्हणाले.  रत्नागिरी जागेसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४