शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

औरंगाबादच्या जागेसाठी शिंदेसेनेकडे तीन इच्छुक, मुख्यमंत्री उद्या निर्णय घेणार: संजय शिरसाट

By बापू सोळुंके | Updated: April 15, 2024 16:54 IST

महाविकास आघाडी सोबत असलेल्या उद्धव सेनेने हिंदुत्व सोडले आहे, उबाठा म्हणजे मतासाठी लाचार झालेली जमात

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद  लोकसभेची जागा शिवसेनेचीच आहे, आमच्याकडे पालकमंत्री संदीपान भुमरे, राजेंद्र जंजाळ आणि विनोद पाटील हे तीन जण इच्छुक आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारीसंदर्भात उद्या निर्णय घेणार असल्याचे  शिंदेसेनेचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

महाविकास आघाडी सोबत असलेल्या उद्धव सेनेने हिंदुत्व सोडले आहे, उबाठा म्हणजे मतासाठी लाचार झालेली जमात असल्याची खरमरी टीकाही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली. आजपर्यंत झालेल्या निवडणुकीत शिवसेना खान हवा की बाण असा प्रचार करीत होते. यंदाच्या निवडणूकीत हा मुद्दा बाजुला पडला का, असे विचारले असता आ.शिरसाट म्हणाले की,  उद्धव सेनेसाठी हिंदुत्व हा शब्द संपला आहे.  बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व असे म्हणायचे. आताची उबाठा सेना मतासाठी लाचार झालेली एक जमात बनली आहे. आम्ही जातीपातीचे राजकारण करत नाही, देशविरोधी मुस्लिमांना आमचा विरोध असल्याचे ते म्हणाले. 

उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार पाठवून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये चंदा लो, धंदा लो असा आरोप  समाज माध्यमावर केला आहे , याकडे लक्ष वेधले असता आ. शिरसाट म्हणाले श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे.  या संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना केल्या जाणाऱ्या मदतीवर आक्षेप कशासाठी.  संस्थेच्या कारभाराबाबत  माहिती अधिकारात धर्मादाय आयुक्ताकडून सर्व माहिती घ्यावी, काही चुकीचे घडले तर कारवाई करा,गुन्हे नोंदवा पण असे बेछुट आरोप करू नका असे. आ. शिरसाट म्हणाले. 

अशा आरोप करणाऱ्यावर लोक विश्वास ठेवत नाही. खैरे यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले मात्र शासनाचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप केला आहे. याविषयी शिरसाट म्हणाले. खैरे यांना मुख्यमंत्र्याकडे जाण्यास लाज वाटत असेल तर त्यांनी मुख्य सचिवाकडे जावे आणि शासनाने नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी काय उपाययोजना केली याची माहिती घ्यावी असा टोला लगावला. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मुख्य सचिवांनी नुकतीच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे बैठक घेतली आहे.  नाशिक, छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेचीचमुख्यमंत्र्यांनी एक जागा राष्ट्रवादीला देण्याचे सांगितले होते, यामुळे नाशिकची जागा राष्ट्रवादीला हवी असल्याचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाल्याकडे आ. शिरसाट यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, महायुतीमध्ये सामजंस्याची भूमिका  मुख्यमंत्र्यांनीच घ्यायची का, असा सवाल केला.  पटेल यांनी उगाच उड्या मारू नये, नाशिकची , छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच आहे. ही मिळविण्यासाठी प्रतिष्ठा लागली  असल्याचेही ते म्हणाले.  रत्नागिरी जागेसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४