शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

३७ कोटींच्या शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्पात ७ वर्षांत थेंबभरही पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:28 IST

वरदान नव्हे शाप : ४० गावांचा घसा कोरडाच

विनोद जाधवलासूर स्टेशन : शेतकऱ्यांना शाप, तर पुढाºयांना वरदान ठरत असलेल्या ३७ कोटी रुपये किंमतीच्या शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्पात गेल्या सात वर्षांत एक टक्काही पाणी आलेले नाही. चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाचा उद्देश साध्य करण्यासाठी संबंधित विभागाने इतर ठिकाणाहून पाणी आणण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी जनतेतून होत आहे.गंगापूर -लासूर स्टेशन रस्त्यावर असलेला शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्प आतापर्यंत तरी परिसराला पांढरा हत्तीच ठरला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे या प्रकल्पाची मूळ जागा बदलण्यात आल्याची चर्चा आहे. राजकीय दबावापुढे प्रशासन झुकल्याने ३७ कोटी रुपये खर्चून देखील हा प्रकल्प लाभ क्षेत्रातील सिंचन व्यवस्था तर सोडाच परंतु ग्रामस्थांची तहान देखील भागवू शकलेला नाही.शिरेगाव, देवळीचे पुनर्वसन करून त्याठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ज्या गावात प्रकल्प झाला त्याच गावाची तहान गेल्या सात वर्षांपासून टँकरने भागविली जात आहे. त्यावरून या प्रकल्पाचे अपयश सातत्याने उघडे पडत आहे. असे असतानाही संबंधित विभाग या प्रकल्पात पाणी आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे.पुढाºयांकडून आश्वासनांची खैरातया प्रकल्पात पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देण्याची संधी या प्रकल्पामुळे प्रत्येक निवडणुकीच्या काळात पुढाºयांना मिळत आहे. परंतु परिसरातील तीस ते चाळीस गावातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या अपयशामुळे दरवर्षी दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण खर्च व्यर्थप्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च व्यर्थ ठरत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे दुष्काळ निवारण समितीचे तालुका अध्यक्ष दत्ता कºहाळे यांनी सांगितले. या प्रकल्पात पाणी आणण्यासाठीचे प्रयत्न राजकीय स्वार्थासाठी नव्हे तर नागरिकांच्या हितासाठी असले पाहिजे, असे शिवसेनेचे प्रशांत बनसोड यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न सुटला नाही. तर शेतीसाठी लागणारे पाणी तर अशक्यच गोष्ट आहे. पावसाच्या पाण्यावर न भरणाºया या प्रकल्पात शिवना नदीतून तात्काळ पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पुनर्वसित शिरेगावचे उपसरपंच नितीन कºहाळे यांनी सांगितले.२००९ ते २०१८ मधील पाणी परिस्थितीवर्षे पाणी साठा२००९ १८.०८ %२०१० ७०.८७ %२०११ २९.०० %२०१२ ० %२०१३ ० %२०१४ ० %२०१५ ० %२०१६ ० %२०१७ ० %२०१८ ० %

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात