शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

जगण्यानेच नव्हे तर मरणानेही तिला छळले...; कुटुंबीयांनी पाठ फिरवल्याने १८ तासांनंतर महिलेवर अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 17:09 IST

मुलांनी सदर महिला ही आपली आई नाही, आपली आई अडीच वर्षांपूर्वीच वारल्याचे सांगितले.

ठळक मुद्देअंत्यविधीसाठी पैसे मागितल्याने मृतदेह पुन्हा घाटीतरुग्णवाहिका, खड्डे खोदणे यासाठी २,५०५ रुपये मोजावेच लागले.

औरंगाबाद : ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’, सुरेश भटांची जगण्यातील छळवाद मांडणारी ही कविताही काहीशी खोटी ठरल्याचा प्रत्यय सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांना आला. घाटीत मृत्यू पावलेल्या महिलेच्या अंत्यविधीसाठीही तिची मुले आली नाहीत, तर बेवारस म्हणून अंत्यविधी करताना पैसे उकळण्याच्या प्रकाराने स्मशानभूमीतून मृतदेह पुन्हा घाटीत न्यावा लागला. शेवटी १८ तासांनंतर पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला. 

सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सुमनबाई मारुती बनारसे ही महिला सिल्लोड येथे सरकारी रुग्णालयाबाहेर आढळली होती. माणुसकी समूहाच्या मदतीने तिला घाटीत उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना दि. २७ नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेतला; परंतु तिच्या मुलांनी आम्ही येऊ शकत नाही, असे सांगितले. मनपाने बचत गटाला अंत्यविधीचे काम सोपविले. पोलीस हेड काँस्टेबल आर. के. वर्पे यांनी फोनवर त्यांच्याशी संपर्क केला. ग्रामीण भागातील मृतदेह आहे. त्यामुळे ३ हजार रुपये लागतील, असे त्यांना गटातर्फे सांगण्यात आले. ही रक्कम कशी द्यायची, असा प्रश्न पोलिसांना पडला.

तेव्हा माणुसकी समूहाचे सुमित पंडित यांनी स्वत: अंत्यविधी करण्याचे ठरविले. ५ रुपये शुल्क देऊन सदरील स्मशानभूमीची परवानगी घेतली; परंतु स्मशानात गेल्यानंतर तुम्ही अंत्यविधी करू शकत नाही, असे बचत गटाच्या लोकांनी म्हणत विरोध केला. माणुसकी समूहाने खड्डा खोदायला सुरुवात केली; पण बचत गटाच्या लोकांनी फावडे हिसकावून घेतले. त्यामुळे मृतदेह स्मशानभूमीतून पुन्हा घाटीत नेण्यात आला. सदरील घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली. सोमवारी दुपारी १२.३० वाजता पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला. 

आई मृत्यू पावल्याचे सांगितले सदर मयत महिला ही सिल्लोडमध्ये एकटीच राहत होती. चौकशी, माहितीवरून एका कुटुंबातील सदस्यांना विचारपूस केली, तेव्हा या कुटुंबातील मुलांनी सदर महिला ही आपली आई नाही, आपली आई अडीच वर्षांपूर्वीच वारल्याचे सांगितले. इतर कोणी नातेवाईकही सापडले नाहीत. नातेवाईक शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; परंतु कोणीही मिळाले नाही. त्यामुळे अंत्यविधी करण्यात आला. -आर. के. वर्पे, पोलीस हेडकान्स्टेबल, सिल्लोड

...यामुळे करावे लागते दफनअशा मृत्यूच्या घटनांनंतर अनेकदा कायदेशीर बाबी, वाद उद्भवण्याची शक्यता असते. नातेवाईक समोर येऊन मृत्यूविषयी आरोप- प्रत्यारोप होतात. त्यामुळे मृतदेह दफन करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले

रुग्णवाहिका, खड्डे खोदण्यासाठी पैसेरुग्णवाहिका, खड्डे खोदणे यासाठी २,५०५ रुपये मोजावेच लागले. यासाठी सिल्लोडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, बेगमपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पो. हे. कॉ. आर. के. वर्पे, पोलीस नाईक श्याम जाधव, अमोल ढाकरे, दिगंबर सोनटक्के, सुमित पंडित आदींनी मदतकार्य केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू