शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

राजकीय वाचाळवीरांच्या विखारी भाषेची लाज वाटते; मराठवाडा साहित्य संमेलनात ठरावाद्वारे खंत

By राम शिनगारे | Updated: December 4, 2023 19:44 IST

श्री मुक्तानंद महाविद्यालयात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला.

कविवर्य ना.धों. महानोर साहित्यनगरी, गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : अलीकडे राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे. सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपापले वाचळवीर निर्माण केले आहेत. परस्परांविषयी द्वेषपूर्ण वक्तव्ये करून टोकाचा विखार निर्माण करीत सामाजिक सलोखा नष्ट करीत आहेत. अशा राजकीय पक्षांच्या वाचाळवीरांच्या भाषेची लाज वाटते. त्याबद्दल ४३वे मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोपात ठराव घेऊन खंत व्यक्त करण्यात आली.

श्री मुक्तानंद महाविद्यालयात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, मार्गदर्शक आ. सतीश चव्हाण, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष लक्ष्मणराव मनाळ, त्रिंबकराव पाथरीकर, किरण सगर, दादा गोरे, कुंडलिक अतकरे, प्राचार्य डॉ. सी.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब पवार, वैशाली बागुल, समन्वयक डॉ. गणेश मोहिते आदींची उपस्थिती हाेती. यावेळी १० ठराव मंजूर केले. त्यात शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज द्यावे, मराठवाड्यातील रेल्वेमार्ग दुहेरी करून मध्य विभागाशी जोडावा, गंगापूरमध्ये वातानुकूलीत सांस्कृतिक सभागृह बांधावे, मराठवाड्याच्या हक्काचे २२ टीएमसी पाणी विनाविलंब द्यावे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, शेतकऱ्यांना खर्चावर आधारित शेतीमालास भाव मिळावा, मराठी शाळा बंद करू नयेत आणि जायकवाडी धरणावर प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पामुळे मत्स्यमारी करणाऱ्या समूहासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प इतरत्र हलविण्यात यावा, हे ठराव संमेलनात मंजूर केले. ठरावांचे वाचन प्रा. किरण सगर यांनी केले. समारोपाच्या कार्यक्रमात कौतिकाराव ठाले पाटील यांच्यासह संमेलनाध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. समन्वयक डॉ. गणेश मोहिते यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शिवानंद भानुसे यांनी सूत्रसंचालन तर उपप्राचार्य डॉ. विशाल साबणे यांनी आभार मानले.

गंगापूरमध्ये मसापची शाखा स्थापन होणारगंगापूर शहरात साहित्य संमेलन घेण्यामागे याठिकाणी साहित्य चळवळ रुजावी हा हेतू होता. आम्ही फक्त आयोजनाचे काम केले. संमेलनातील सर्व निर्णय मसापने घेतले. आगामी काळात मसापची गंगापूर शहरात शाखा स्थापन करण्यात येईल, असे संमेलनाचे मार्गदर्शक आ. सतीश चव्हाण यांनी जाहीर केले. तसेच संमेलनात घेतलेल्या ठरावांचा पाठपुरावा राज्य शासनाकडे करण्यात येईल, असेही आ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनAurangabadऔरंगाबाद