शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

राजकीय वाचाळवीरांच्या विखारी भाषेची लाज वाटते; मराठवाडा साहित्य संमेलनात ठरावाद्वारे खंत

By राम शिनगारे | Updated: December 4, 2023 19:44 IST

श्री मुक्तानंद महाविद्यालयात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला.

कविवर्य ना.धों. महानोर साहित्यनगरी, गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : अलीकडे राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे. सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपापले वाचळवीर निर्माण केले आहेत. परस्परांविषयी द्वेषपूर्ण वक्तव्ये करून टोकाचा विखार निर्माण करीत सामाजिक सलोखा नष्ट करीत आहेत. अशा राजकीय पक्षांच्या वाचाळवीरांच्या भाषेची लाज वाटते. त्याबद्दल ४३वे मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोपात ठराव घेऊन खंत व्यक्त करण्यात आली.

श्री मुक्तानंद महाविद्यालयात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, मार्गदर्शक आ. सतीश चव्हाण, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष लक्ष्मणराव मनाळ, त्रिंबकराव पाथरीकर, किरण सगर, दादा गोरे, कुंडलिक अतकरे, प्राचार्य डॉ. सी.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब पवार, वैशाली बागुल, समन्वयक डॉ. गणेश मोहिते आदींची उपस्थिती हाेती. यावेळी १० ठराव मंजूर केले. त्यात शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज द्यावे, मराठवाड्यातील रेल्वेमार्ग दुहेरी करून मध्य विभागाशी जोडावा, गंगापूरमध्ये वातानुकूलीत सांस्कृतिक सभागृह बांधावे, मराठवाड्याच्या हक्काचे २२ टीएमसी पाणी विनाविलंब द्यावे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, शेतकऱ्यांना खर्चावर आधारित शेतीमालास भाव मिळावा, मराठी शाळा बंद करू नयेत आणि जायकवाडी धरणावर प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पामुळे मत्स्यमारी करणाऱ्या समूहासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प इतरत्र हलविण्यात यावा, हे ठराव संमेलनात मंजूर केले. ठरावांचे वाचन प्रा. किरण सगर यांनी केले. समारोपाच्या कार्यक्रमात कौतिकाराव ठाले पाटील यांच्यासह संमेलनाध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. समन्वयक डॉ. गणेश मोहिते यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शिवानंद भानुसे यांनी सूत्रसंचालन तर उपप्राचार्य डॉ. विशाल साबणे यांनी आभार मानले.

गंगापूरमध्ये मसापची शाखा स्थापन होणारगंगापूर शहरात साहित्य संमेलन घेण्यामागे याठिकाणी साहित्य चळवळ रुजावी हा हेतू होता. आम्ही फक्त आयोजनाचे काम केले. संमेलनातील सर्व निर्णय मसापने घेतले. आगामी काळात मसापची गंगापूर शहरात शाखा स्थापन करण्यात येईल, असे संमेलनाचे मार्गदर्शक आ. सतीश चव्हाण यांनी जाहीर केले. तसेच संमेलनात घेतलेल्या ठरावांचा पाठपुरावा राज्य शासनाकडे करण्यात येईल, असेही आ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनAurangabadऔरंगाबाद