लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:स्वामीनाथन समितीच्या सर्व शिफारशी लागू करुन शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडीयाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली़ यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़देशात पहिल्यांदाच शेतकरी संपावर गेला आहे़ या संपाला एसएफआय पूर्णपणे पाठिंबा देत आहे़ एकीकडे सरकार धनदांडग्या भांडवलदारांचे कर्ज माफ करीत आहे़ तर दुसरीकडे जगाला आणि देशाला जगविणारा शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करीत आहे़ ही एकप्रकारे सरकारच्या धोरणामुळे केलेली हत्याच आहे असा आरोप संघटनेने केला़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्यात अन्यथा ९ जूनपासून जिल्हाभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे़ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ यावेळी बालाजी कलेटवाड, विकास वाठोरे, विनोद भद्रे, सुमेध सदावर्ते, प्रशांत ढगे, राहुल मोताळे, विठ्ठल यलगंदेवाड, नागेश बोड्डावार, शंकर बादावाड, नामदेव धुळेकर, अंबादास धुळेकर, प्रल्हाद इबितदार आदींची यावेळी उपस्थिती होती़
शहरात एसएफआयची निदर्शने
By admin | Updated: June 7, 2017 00:15 IST