शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

मराठवाड्यात ७ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 20:21 IST

खरीप हंगामातील मागील दोन महिन्यांत मराठवाड्यात ३७.२ टक्के पाऊस पडला आहे. ४१ लाख ८० हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.

औरंगाबाद : खरीप हंगामातील मागील दोन महिन्यांत मराठवाड्यात ३७.२ टक्के पाऊस पडला आहे. ४१ लाख ८० हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पेरणीचा हंगाम संपला असून, अजूनही ७ लाख ३० हजार ९९ हेक्टर क्षेत्र पेरणीविना खाली आहे. हिंगोलीला मागे टाकत बीड जिल्ह्याने मागील पंधरवड्यात ९३.३५ टक्के पेरणी करून अव्वल स्थान मिळविले आहे. 

मराठवाड्यात आतापर्यंत ३७.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस ४९.३ टक्के हिंगोली जिल्ह्यात पडला आहे. त्याखालोखाल नांदेड ४४.८ टक्के, लातूर ४०.७ टक्के, परभणी ३५.१ टक्के, उस्मानाबाद ३४.९ टक्के, जालना ३२.८ टक्के, बीड २९.४ टक्के व सर्वात कमी पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात २५.९ टक्के एवढा झाला आहे. पाऊस चांगला झाल्याने जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात ६३.१५ टक्के पेरण्या झाल्या होत्या. यात ७५.५२ टक्के पेरणी करून हिंगोली जिल्हा आघाडीवर होता, पण चालू पंधरवड्यात बीड जिल्ह्याने हिंगोलीला मागे टाकत ९२.२५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण केल्या आहेत. 

९०.६३ टक्के पेरण्या पूर्ण करून नांदेड जिल्हा नंबर दोनवर राहिला. लातूर ९०.३५ टक्के पेरणी करून तिसऱ्या स्थानी आहे. मागील पंधरवड्यात हिंगोली जिल्ह्यातील पेरणीची गती मंदावल्याने तो ८९.३२ टक्के पेरण्या करून चौथ्या स्थानावर राहिला. त्यापाठोपाठ उस्मानाबाद ८७.८९ टक्के, औरंगाबाद ८५.४१ टक्के, जालना ७९.५५ टक्के, परभणीने ८२.४८ टक्के क्षेत्रावर पेरणी केली. पेरणीत सर्वात मागे परभणी जिल्हा आहे. मराठवाड्यात ४१ लाख ८० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात १३ लाख ५३ हजार १०० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. कपाशीचे एकूण क्षेत्राच्या ३ लाख ६४ हजार ३०० हेक्टर क्षेत्र अजूनही लागवडीपासून खाली आहे. सोयाबीनची पेरणी एकूण क्षेत्रापैकी १६ लाख ८८ हजार ९०० हेक्टरवर (१६२.५६ टक्के) झाली. मराठवाड्यात कपाशीपेक्षा सोयाबीनची पेरणी अधिक झाली आहे. मूग ९५.४५ टक्के, मका ८५.८४ टक्के तर उडदाची पेरणी ८०.६२ टक्के झाली आहे.

...तर दुबार पेरणीचे संकट औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांना आता जोरदार पावसाची आवश्यकता असून, येथील काही तालुक्यांत येत्या आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर कोरडवाहू शेतीत दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली. 

कपाशीचे क्षेत्र घटलेमराठवाड्यात १७ लाख १७ हजार ४०० हेक्टरवर कपाशीची लागवड केली जाते. मात्र, मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेक आणि यंदा मध्यंतरीच्या काळात पावसाने मारलेली दडी, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलीच नाही. त्यामुळे केवळ १३लाख ५३ हजार १०० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.  १५ आॅगस्टपर्यंत बाजरी, तूर, मक्याची मिश्र पेरणी होऊ शकते किंवा शेतकरी रबी ज्वारीची पेरणी करतील. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडा