शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

साडेपाचशे पाणीपुरवठा योजनांचा पुरवठा खंडित

By admin | Updated: March 25, 2017 00:01 IST

जालना : जिल्ह्यातील ९९१ पाणीपुरवठा योजनांपैकी साडेपाचशे पेक्षा अधिक योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

जालना : जिल्ह्यातील ९९१ पाणीपुरवठा योजनांपैकी साडेपाचशे पेक्षा अधिक योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे या गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बिल भरल्याशिवाय पुरवठा सुरू करणार नसल्याचा पवित्रा महावितरणने घेतल्याने खळबळ उडाली आहे. अनेक गावांत उन्हामुळे पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. त्यातच आठवडाभरापासून महावितरण कंपनीने थकित बिलापोटी पुरवठा खंडित करण्याचा सपाटाला लावला आहे. त्यामुळे आहे ते पाणी मिळणेही बंद झाल्याने संकटात भर पडली आहे. महावितरणच्या आकडेवारीनुसार जालना विभाग एक अंतर्गत बदनापूर शहर व ग्रामीण भाग मिळून १११, भोकरदन १९४, जाफराबाद १४०, जालना शहर १२, जालना ग्रामीण १९६ मिळून ६५४ पाणीपुरवठा योजना आहेत तर विभाग दोन मध्ये अंबड ९३, घनसावंगी ८१, मंठा ९५, परतूर ७७ मिळून ३४९ योजना आहेत. या योजनांकडे १९ कोटी चाळीस लाख रूपयांची थकबाकी आहे. बहुतांश योजनांची वीज देयके नियमित भरली जात नसल्याने ही आकडेवारी वाढत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. विभाग एकमध्ये ११ कोटी ८० लाखांखी थकबाकी आहे तर विभाग दोन मध्ये ७ कोटी ६३ लाखांची थकबाकी आहे. आठवडाभरापासून पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित असल्यामुळे या गावांतील पाणी पुरवठा बंद आहे. टँकरही नसल्याने पायपीट करून महिलांना पाणी आणावे लागत आहे. (प्रतिनिधी)