शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
5
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
6
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
7
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
8
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
9
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
10
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
11
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
12
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
13
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
14
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
15
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
16
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
17
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
18
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
19
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
20
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहुल; प्रशासनाच्या युध्दपातळीवर हालचाली सुरु, लॉकडाऊनचे निर्बंध पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 12:36 IST

Corona Virus in Aurangabad : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

ठळक मुद्देवर्कसाईटवर किंवा उत्पादन ठिकाणी काही कामगारांची राहण्याची व्यवस्था जर उद्योजकांना करता आली तर त्या अनुषंगाने तयारी करण्यात येणार आहे. ९६ टक्के बेड्स सध्या उपलब्ध असून, नवजात शिशू आणि बाल कोविड सेंटरची तयारी प्रशासनाने केली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेची चाहुल तसेच नवीन विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना चाचण्या वाढविणे, सकाळी ७ ते ४ या वेळेचे सर्वांनी निर्बंध पाळणे, ९६ टक्के बेड्स सध्या उपलब्ध असून, नवजात शिशू आणि बाल कोविड सेंटरची तयारी प्रशासनाने केली आहे. २ हजार ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी पूर्ण झाली आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. येत्या एक - दोन दिवसांत उद्योजकांची बैठक घेण्यात येणार आहे. वर्कसाईटवर किंवा उत्पादन ठिकाणी काही कामगारांची राहण्याची व्यवस्था जर उद्योजकांना करता आली तर त्या अनुषंगाने तयारी करण्यात येणार आहे. कामगारांचे अप - डाऊन कमी झाले तर त्याचा फायदाच होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी कोविड उपाययोजनांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी चव्हाण यांनी घेतली. बैठकीला जिल्हा परिषद सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

ऑक्सिजनचा साठा उपलब्ध ठेवापुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता ठेवण्याची खबरदारी घ्यावी. सर्व रुग्णालयांना इलेक्ट्रीक ऑडिट, ऑक्सिजन ऑडिट आणि फायर ऑडिट करण्याबाबत यापूर्वी सूचना दिल्या असून, त्याचा आढावा घेऊन संपर्क अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा. ज्या रुग्णालयांनी ऑडिट केलेले नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. साथीच्या आजाराची उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

खासगीत नियमानुसार शुल्क घ्यावेज्या खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी परवानगी मागितलेली आहे. त्यांना परवानगी देण्यात यावी. मात्र, सर्वांनी नियमानुसारच लसीकरण शुल्क आकारणे बंधनकारक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

१५ जुलैपासून ८वी ते १२वी वर्ग सुरू करणारशासन निर्देशानुसार १५ जुलैपासून ग्रामीण भागातील ८वी ते १२वीपर्यंतचे शैक्षणिक वर्ग सुरू करण्यात येणार असून, शिक्षकांच्या चाचण्या, लसीकरण प्रक्रिया पूर्ण करावी. सरपंच, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्या समिती माध्यमातून नियोजन करावे. ज्या गावात ३० दिवसांत एकही रुग्ण आढळला नाही. त्याच गावात शाळा सुरू करावयाची आहे. रुग्ण आढळल्यास वर्ग बंद करण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल, असे जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले म्हणाले. तसेच रुग्ण असलेल्या गावांमध्ये संपूर्ण गावकऱ्यांची चाचणी करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

चाचण्या वाढविण्याचे आदेशचाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे असून, संसर्गाचा फैलाव त्यामुळे रोखता येईल. कोरोनाच्या संसर्ग प्रमाणानुसार जिल्हास्तर तीनमध्ये असून, निर्बंध, अटी, शर्ती यापुढे कायम राहणार आहेत. जिल्ह्यातील बाधित दर २.७९ टक्के असून, संभाव्य डेल्टा प्लसच्या संसर्गाची तीव्रता अधिक असल्याने चाचण्यांचे आणि लसीकरणाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. रोज पाच हजारांपर्यंत चाचण्यांत वाढ करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जनतेला प्रशासनाचे आवाहनकोरोना संसर्ग वाढणार नाही, यासाठी जनतेने सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा. यादृष्टीने सकस आहार, प्राणायाम, योगासने, सकाळ, संध्याकाळ चालण्याचे व्यायाम करावेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद