शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहुल; प्रशासनाच्या युध्दपातळीवर हालचाली सुरु, लॉकडाऊनचे निर्बंध पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 12:36 IST

Corona Virus in Aurangabad : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

ठळक मुद्देवर्कसाईटवर किंवा उत्पादन ठिकाणी काही कामगारांची राहण्याची व्यवस्था जर उद्योजकांना करता आली तर त्या अनुषंगाने तयारी करण्यात येणार आहे. ९६ टक्के बेड्स सध्या उपलब्ध असून, नवजात शिशू आणि बाल कोविड सेंटरची तयारी प्रशासनाने केली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेची चाहुल तसेच नवीन विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना चाचण्या वाढविणे, सकाळी ७ ते ४ या वेळेचे सर्वांनी निर्बंध पाळणे, ९६ टक्के बेड्स सध्या उपलब्ध असून, नवजात शिशू आणि बाल कोविड सेंटरची तयारी प्रशासनाने केली आहे. २ हजार ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी पूर्ण झाली आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. येत्या एक - दोन दिवसांत उद्योजकांची बैठक घेण्यात येणार आहे. वर्कसाईटवर किंवा उत्पादन ठिकाणी काही कामगारांची राहण्याची व्यवस्था जर उद्योजकांना करता आली तर त्या अनुषंगाने तयारी करण्यात येणार आहे. कामगारांचे अप - डाऊन कमी झाले तर त्याचा फायदाच होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी कोविड उपाययोजनांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी चव्हाण यांनी घेतली. बैठकीला जिल्हा परिषद सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

ऑक्सिजनचा साठा उपलब्ध ठेवापुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता ठेवण्याची खबरदारी घ्यावी. सर्व रुग्णालयांना इलेक्ट्रीक ऑडिट, ऑक्सिजन ऑडिट आणि फायर ऑडिट करण्याबाबत यापूर्वी सूचना दिल्या असून, त्याचा आढावा घेऊन संपर्क अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा. ज्या रुग्णालयांनी ऑडिट केलेले नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. साथीच्या आजाराची उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

खासगीत नियमानुसार शुल्क घ्यावेज्या खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी परवानगी मागितलेली आहे. त्यांना परवानगी देण्यात यावी. मात्र, सर्वांनी नियमानुसारच लसीकरण शुल्क आकारणे बंधनकारक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

१५ जुलैपासून ८वी ते १२वी वर्ग सुरू करणारशासन निर्देशानुसार १५ जुलैपासून ग्रामीण भागातील ८वी ते १२वीपर्यंतचे शैक्षणिक वर्ग सुरू करण्यात येणार असून, शिक्षकांच्या चाचण्या, लसीकरण प्रक्रिया पूर्ण करावी. सरपंच, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्या समिती माध्यमातून नियोजन करावे. ज्या गावात ३० दिवसांत एकही रुग्ण आढळला नाही. त्याच गावात शाळा सुरू करावयाची आहे. रुग्ण आढळल्यास वर्ग बंद करण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल, असे जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले म्हणाले. तसेच रुग्ण असलेल्या गावांमध्ये संपूर्ण गावकऱ्यांची चाचणी करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

चाचण्या वाढविण्याचे आदेशचाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे असून, संसर्गाचा फैलाव त्यामुळे रोखता येईल. कोरोनाच्या संसर्ग प्रमाणानुसार जिल्हास्तर तीनमध्ये असून, निर्बंध, अटी, शर्ती यापुढे कायम राहणार आहेत. जिल्ह्यातील बाधित दर २.७९ टक्के असून, संभाव्य डेल्टा प्लसच्या संसर्गाची तीव्रता अधिक असल्याने चाचण्यांचे आणि लसीकरणाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. रोज पाच हजारांपर्यंत चाचण्यांत वाढ करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जनतेला प्रशासनाचे आवाहनकोरोना संसर्ग वाढणार नाही, यासाठी जनतेने सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा. यादृष्टीने सकस आहार, प्राणायाम, योगासने, सकाळ, संध्याकाळ चालण्याचे व्यायाम करावेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद