शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहुल; प्रशासनाच्या युध्दपातळीवर हालचाली सुरु, लॉकडाऊनचे निर्बंध पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 12:36 IST

Corona Virus in Aurangabad : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

ठळक मुद्देवर्कसाईटवर किंवा उत्पादन ठिकाणी काही कामगारांची राहण्याची व्यवस्था जर उद्योजकांना करता आली तर त्या अनुषंगाने तयारी करण्यात येणार आहे. ९६ टक्के बेड्स सध्या उपलब्ध असून, नवजात शिशू आणि बाल कोविड सेंटरची तयारी प्रशासनाने केली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेची चाहुल तसेच नवीन विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना चाचण्या वाढविणे, सकाळी ७ ते ४ या वेळेचे सर्वांनी निर्बंध पाळणे, ९६ टक्के बेड्स सध्या उपलब्ध असून, नवजात शिशू आणि बाल कोविड सेंटरची तयारी प्रशासनाने केली आहे. २ हजार ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी पूर्ण झाली आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. येत्या एक - दोन दिवसांत उद्योजकांची बैठक घेण्यात येणार आहे. वर्कसाईटवर किंवा उत्पादन ठिकाणी काही कामगारांची राहण्याची व्यवस्था जर उद्योजकांना करता आली तर त्या अनुषंगाने तयारी करण्यात येणार आहे. कामगारांचे अप - डाऊन कमी झाले तर त्याचा फायदाच होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी कोविड उपाययोजनांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी चव्हाण यांनी घेतली. बैठकीला जिल्हा परिषद सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

ऑक्सिजनचा साठा उपलब्ध ठेवापुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता ठेवण्याची खबरदारी घ्यावी. सर्व रुग्णालयांना इलेक्ट्रीक ऑडिट, ऑक्सिजन ऑडिट आणि फायर ऑडिट करण्याबाबत यापूर्वी सूचना दिल्या असून, त्याचा आढावा घेऊन संपर्क अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा. ज्या रुग्णालयांनी ऑडिट केलेले नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. साथीच्या आजाराची उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

खासगीत नियमानुसार शुल्क घ्यावेज्या खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी परवानगी मागितलेली आहे. त्यांना परवानगी देण्यात यावी. मात्र, सर्वांनी नियमानुसारच लसीकरण शुल्क आकारणे बंधनकारक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

१५ जुलैपासून ८वी ते १२वी वर्ग सुरू करणारशासन निर्देशानुसार १५ जुलैपासून ग्रामीण भागातील ८वी ते १२वीपर्यंतचे शैक्षणिक वर्ग सुरू करण्यात येणार असून, शिक्षकांच्या चाचण्या, लसीकरण प्रक्रिया पूर्ण करावी. सरपंच, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्या समिती माध्यमातून नियोजन करावे. ज्या गावात ३० दिवसांत एकही रुग्ण आढळला नाही. त्याच गावात शाळा सुरू करावयाची आहे. रुग्ण आढळल्यास वर्ग बंद करण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल, असे जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले म्हणाले. तसेच रुग्ण असलेल्या गावांमध्ये संपूर्ण गावकऱ्यांची चाचणी करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

चाचण्या वाढविण्याचे आदेशचाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे असून, संसर्गाचा फैलाव त्यामुळे रोखता येईल. कोरोनाच्या संसर्ग प्रमाणानुसार जिल्हास्तर तीनमध्ये असून, निर्बंध, अटी, शर्ती यापुढे कायम राहणार आहेत. जिल्ह्यातील बाधित दर २.७९ टक्के असून, संभाव्य डेल्टा प्लसच्या संसर्गाची तीव्रता अधिक असल्याने चाचण्यांचे आणि लसीकरणाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. रोज पाच हजारांपर्यंत चाचण्यांत वाढ करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जनतेला प्रशासनाचे आवाहनकोरोना संसर्ग वाढणार नाही, यासाठी जनतेने सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा. यादृष्टीने सकस आहार, प्राणायाम, योगासने, सकाळ, संध्याकाळ चालण्याचे व्यायाम करावेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद