शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

कुस्तीकडे करिअर म्हणून पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:29 IST

कुस्ती हा खेळ वेळ घालवण्यासाठी नव्हे तर करिअर करण्यासाठी आहे. कुठल्याही खेळाला राजाश्रय मिळाल्याशिवाय त्याचा विकास होत नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी केले.

राजेश टोपे : आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घाटनजालना : कुस्ती हा खेळ वेळ घालवण्यासाठी नव्हे तर करिअर करण्यासाठी आहे. कुठल्याही खेळाला राजाश्रय मिळाल्याशिवाय त्याचा विकास होत नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी केले.येथील रामचंद्र सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित, श्री आर. डी. भक्त फार्मसी विद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. कैलास गोरंट्याल यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, मत्स्योदरी महाविद्यालयाचे (अंबड) प्राचार्य डॉ.भागवतराव कटारे, उद्योजक संजय खोतकर, कुस्ती खेळातील छत्रपती पुरस्कारप्राप्त पर्वत कासुरे, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष किशनलाल भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मणराव सुपारकर, प्रा. नारायणराव शिरसाट, अ‍ॅड. सेवकचंद बाखरिया, हरिसिंग राजपूत, सूरजमामा मेघावाले, जीवनलाल डोंगरे, सीताराम पहाडिये, प्रभाकर विधाते, मारोती शिंदे आदींची उपस्थिती होती.गोरंट्याल म्हणाले की, कुस्ती आणि येथील पहेलवानांमुळे पूर्वी छोटा कोल्हापूर म्हणून जालन्याची ओळख होती, परंतु कालांतराने कुस्तीचे आकर्षण कमी झाले. युवा पिढी आता क्रिकेट व अन्य खेळांकडे वळत आहे. प्रथम आमदार झालो तेव्हा शहरात महाराष्ट्र केसरी कुस्ती घेतली. त्यानंतर खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा घेतली. लवकरच आपण जालन्यात हिंंद केसरी स्पर्धेचे आयोजन करू.उद्घाटनानंतर औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाची रुपाली वरधे आणि बिडकीन येथील शीतल जाधव यांच्यात पहिला सामना खेळविण्यात आला. या सामन्यात रुपालीने विजय मिळविला. स्पर्धेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाºया ६८ महाविद्यालयातील २५० ते ३०० महिला व पुरूष मल्ल सहभागी झाले आहेत. यात राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्लांचा सहभाग आहे. समारोप मंगळवारी होणार आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा.मंगेश डोंगरे, प्रा.डॉ.शेखर शिरसाट, प्रा. डॉ. हंसराज डोंगरे, प्रा. डॉ. रामेश्वर विधाते, प्रा. हरिदास म्हस्के, प्रा. नितेश काबलिये हे काम पाहत आहेत. रमेश थोरवे यांनी सूत्रसंचालन केले, तर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दयानंद भक्त यांनी आभार मानले..... तो पहेलवानी डूब जायेगीप्रास्ताविक करताना स्पर्धेचे आयोजक प्राचार्य डॉ. दयानंद भक्त यांनी ‘पानी नही आयेगा तो नदी सुख जायेगी और नये पहेलवान नही बनेंगे तो पहेलवानी डूब जायेगी’ या शेरव्दारे युवकांना कुस्तीकडे येण्याचे आवाहन केले. त्यांचे वडील स्व. चरण पहेलवान यांचे स्वप्न होते की, जालन्यातून महाराष्ट्र केसरी निर्माण व्हावा. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुरू रामचरण वस्ताद भक्त कुस्ती आखाड्याच्या माध्यमातून नवीन मल्ल तयार करण्याचे कार्य करीत आहेत.