शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वाळूज उद्योगनगरीत कंपन्यांनी वाढविली सुरक्षा; उद्योजक व पोलिसांचा सुरक्षेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 18:51 IST

मराठा आरक्षण बंददरम्यान वाळूज उद्योगनगरीतील कारखान्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. या भयावह घटनेमुळे उद्योजकांनी कारखान्याच्या सुरक्षेवर भर दिला आहे.

औरंगाबाद : मराठा आरक्षण बंददरम्यान वाळूज उद्योगनगरीतील कारखान्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. या भयावह घटनेमुळे उद्योजकांनी कारखान्याच्या सुरक्षेवर भर दिला आहे. अनेक छोट-मोठ्या कारखान्यांसमोर खाजगी बाऊंसरसह अतिरिक्त सुरक्षारक्षक व पोलीस पहारा देत असल्याचे लोकमत टीमने केलेल्या पाहणीत दिसून आले.

तोडफोडीच्या घटनेमुळे उद्योजकांसह पोलीस प्रशासनानेही कारखान्याच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. आंदोलनाची धग कमी झाली असली तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उद्योजकांनी कारखान्याच्या अंतर्गत भागासह आवारात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, बाऊंसर, तसेच अतिरिक्त सुरक्षारक्षक नेमून सुरक्षा वाढविली जात आहे. पोलीस प्रशासनाकडूनही मोठ्या कारखान्याला (विशेषत: केमिकल आणि प्लास्टिक) सुरक्षा दिली जात आहे. तसेच पोलिसांनी औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर अनोळखी व्यक्तीला प्रवेशबंदी केली असून, ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जात नाही. यासाठी काही खास व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 

तोडफोडीच्या घटनेनंतर कारखान्यात सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या जात आहेत. याची लोकमतच्या टीमने सोमवारी (दि.१३) पाहणी केली असता उद्योगनगरीतील स्टरलाईटसमोर अतिरिक्त सुरक्षारक्षकासह खाजगी बाऊंसर व एसआरपीचे जवान, कॅनपॅकसमोर सुरक्षारक्षकासह आयआरबीचे जवान पहारा देत आहेत. इतर कारखान्यांतही गेटसमोरील सुरक्षारक्षकांत वाढ झाल्याचे दिसून आले. काही कारखान्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याशी चर्चा केली असता त्यांनी भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर लोकमत टीमशी बोलताना सांगितले.

एमआयडीसी प्रशासनाने केली कंपन्यांची पाहणीवाळूज येथील तोडफोड झालेल्या कंपन्यांची एमआयडीसी प्रशासनाने पाहणी केली.  वरिष्ठ कार्यालयास अहवाल देण्यात येईल, अशी माहिती  सूत्रांनी दिली.वाळूज महानगरात व्हेरॉक, इंडुरन्स, स्टरलाईटसह ६० पेक्षा अधिक उद्योगांवर जमावाने हल्ले आणि दगडफेक केल्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांच्यासह उपअभियंता आणि अधिकाऱ्यांनी कंपन्यांना भेट देत तोडफोडीची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाणार आहे. बंदच्या कालावधीत प्रथमच अनेक कंपन्यांची तोडफोड करण्यात आली. कंपन्यांबरोबर ‘एमआयडीसी’च्या अग्निशमन वाहनाची जाळपोळ करण्यात आली. हा अहवाल वरिष्ठांना  दिला जाईल, असे  अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांकडूनही पहारा; राज्य राखीव दलाचे जवान तैनातऔद्योगिकनगरीत अप्रिय घटना टाळण्यासाठी तसेच संशयित गुन्हेगारावर पाळत ठेवण्यासाठी पोलीस तैनात केले आहेत. सोमवारी (दि.१३) धनगर समाजातर्फे आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून  पोलीस प्रशासनाने औद्योगिक क्षेत्रातील वेगवेगळ्या ७ ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कोलगेट चौक, कार्तिकी हॉटेल, रुचा कंपनी, साजापूर फाटा, रांजणगाव फाटा, जोगेश्वरी प्रवशेद्वार व घाणेगाव प्रवेशद्वार या ठिकाणी २ पोलीस कर्मचारी व विशेष पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद