शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्र; खबरदारी घ्या; पालकमंत्री सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 16:33 IST

समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे. प्रशासनाने ट्रेकिंग, टेस्टिंग तसेच ट्रिटमेंटवर भर द्यावा

ठळक मुद्देट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट त्रिसूत्री वापरण्याचे आवाहन

औरंगाबाद : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यात वाढीव रुग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज राहून खबरदारी घेण्याचे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केले.

समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे. प्रशासनाने ट्रेकिंग, टेस्टिंग तसेच ट्रिटमेंटवर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकमंत्री देसाई यांनी शुक्रवारी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. देसाई यांनी घाटीतील गंभीर रुग्णांचा मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे सूचित केले. ‘नो मास्क नो लाइफ’ अशा स्थितीपर्यंत परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे मास्क वापरासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन जनतेने केले पाहिजे. ऑक्सिजन साठा, वाढीव खाटा, औषधांची उपलब्धतेकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जनजागृतीबाबत आवाहन करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

जिल्ह्यात ११ हजार ७६३ बेड्सजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठकीत सांगितले, जिल्ह्यात एकूण ११५ उपचार सुविधा उपलब्ध असून, ११,७६३ आयसोलेशन बेड, २१२४ ओटु बेड, तर ५३२ आयसीयू बेड, तसेच ३०० व्हेंटिलेटर असल्याचे सांगितले. जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध राहील याकडे लक्ष आहे. ३३ ठिकाणांसह मोबाइल व्हॅनद्वारे लसीकरणाची सुविधा तयार आहे.

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणीपोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले, शहरात १० मार्चपासून मार्शल लॉकडाऊनचा आदेश काढला आहे. आजपासून रात्री ८पासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. गरजू लोकांना मास्क वाटप सुरू आहे. कठोर उपाययोजना केल्यास रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे गुप्ता म्हणाले.

दहा हजार रुग्णांवर उपचाराची सोयमहापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांनी चाचण्यासाठी ५४ मोबाइल पथके तयार केल्याचे सांगितले. २०पेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणांना कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात येईल. प्रत्येक दिवशी दहा हजार रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध करून दिली जात असल्याचा दावा पाण्डेय यांनी केला.

२५ रुग्ण असतील तेथे कन्टेन्मेंट झोनसीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले, ग्रामीण भागात आठ हजार खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन असून, चाचण्यांची क्षमता हजारांपर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. ज्या गावांमध्ये २५ पेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे त्या ठिकाणी कन्टेन्मेंट झोन तयार करून मोबाइल व्हॅनद्वारा व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.

तालुकानिहाय नाकाबंदी सुरूपोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गेल्या वर्षाप्रमाणे व्यूहरचना आखून तालुका नाकाबंदी करण्यात येत असल्याचे सांगितले. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलिसांसोबत स्थानिक यंत्रणा जनजागृती करण्यासाठी पुढे येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई