शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्र; खबरदारी घ्या; पालकमंत्री सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 16:33 IST

समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे. प्रशासनाने ट्रेकिंग, टेस्टिंग तसेच ट्रिटमेंटवर भर द्यावा

ठळक मुद्देट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट त्रिसूत्री वापरण्याचे आवाहन

औरंगाबाद : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यात वाढीव रुग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज राहून खबरदारी घेण्याचे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केले.

समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे. प्रशासनाने ट्रेकिंग, टेस्टिंग तसेच ट्रिटमेंटवर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकमंत्री देसाई यांनी शुक्रवारी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. देसाई यांनी घाटीतील गंभीर रुग्णांचा मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे सूचित केले. ‘नो मास्क नो लाइफ’ अशा स्थितीपर्यंत परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे मास्क वापरासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन जनतेने केले पाहिजे. ऑक्सिजन साठा, वाढीव खाटा, औषधांची उपलब्धतेकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जनजागृतीबाबत आवाहन करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

जिल्ह्यात ११ हजार ७६३ बेड्सजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठकीत सांगितले, जिल्ह्यात एकूण ११५ उपचार सुविधा उपलब्ध असून, ११,७६३ आयसोलेशन बेड, २१२४ ओटु बेड, तर ५३२ आयसीयू बेड, तसेच ३०० व्हेंटिलेटर असल्याचे सांगितले. जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध राहील याकडे लक्ष आहे. ३३ ठिकाणांसह मोबाइल व्हॅनद्वारे लसीकरणाची सुविधा तयार आहे.

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणीपोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले, शहरात १० मार्चपासून मार्शल लॉकडाऊनचा आदेश काढला आहे. आजपासून रात्री ८पासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. गरजू लोकांना मास्क वाटप सुरू आहे. कठोर उपाययोजना केल्यास रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे गुप्ता म्हणाले.

दहा हजार रुग्णांवर उपचाराची सोयमहापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांनी चाचण्यासाठी ५४ मोबाइल पथके तयार केल्याचे सांगितले. २०पेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणांना कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात येईल. प्रत्येक दिवशी दहा हजार रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध करून दिली जात असल्याचा दावा पाण्डेय यांनी केला.

२५ रुग्ण असतील तेथे कन्टेन्मेंट झोनसीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले, ग्रामीण भागात आठ हजार खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन असून, चाचण्यांची क्षमता हजारांपर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. ज्या गावांमध्ये २५ पेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे त्या ठिकाणी कन्टेन्मेंट झोन तयार करून मोबाइल व्हॅनद्वारा व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.

तालुकानिहाय नाकाबंदी सुरूपोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गेल्या वर्षाप्रमाणे व्यूहरचना आखून तालुका नाकाबंदी करण्यात येत असल्याचे सांगितले. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलिसांसोबत स्थानिक यंत्रणा जनजागृती करण्यासाठी पुढे येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई