शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्र; खबरदारी घ्या; पालकमंत्री सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 16:33 IST

समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे. प्रशासनाने ट्रेकिंग, टेस्टिंग तसेच ट्रिटमेंटवर भर द्यावा

ठळक मुद्देट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट त्रिसूत्री वापरण्याचे आवाहन

औरंगाबाद : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यात वाढीव रुग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज राहून खबरदारी घेण्याचे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केले.

समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे. प्रशासनाने ट्रेकिंग, टेस्टिंग तसेच ट्रिटमेंटवर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकमंत्री देसाई यांनी शुक्रवारी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. देसाई यांनी घाटीतील गंभीर रुग्णांचा मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे सूचित केले. ‘नो मास्क नो लाइफ’ अशा स्थितीपर्यंत परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे मास्क वापरासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन जनतेने केले पाहिजे. ऑक्सिजन साठा, वाढीव खाटा, औषधांची उपलब्धतेकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जनजागृतीबाबत आवाहन करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

जिल्ह्यात ११ हजार ७६३ बेड्सजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठकीत सांगितले, जिल्ह्यात एकूण ११५ उपचार सुविधा उपलब्ध असून, ११,७६३ आयसोलेशन बेड, २१२४ ओटु बेड, तर ५३२ आयसीयू बेड, तसेच ३०० व्हेंटिलेटर असल्याचे सांगितले. जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध राहील याकडे लक्ष आहे. ३३ ठिकाणांसह मोबाइल व्हॅनद्वारे लसीकरणाची सुविधा तयार आहे.

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणीपोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले, शहरात १० मार्चपासून मार्शल लॉकडाऊनचा आदेश काढला आहे. आजपासून रात्री ८पासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. गरजू लोकांना मास्क वाटप सुरू आहे. कठोर उपाययोजना केल्यास रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे गुप्ता म्हणाले.

दहा हजार रुग्णांवर उपचाराची सोयमहापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांनी चाचण्यासाठी ५४ मोबाइल पथके तयार केल्याचे सांगितले. २०पेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणांना कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात येईल. प्रत्येक दिवशी दहा हजार रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध करून दिली जात असल्याचा दावा पाण्डेय यांनी केला.

२५ रुग्ण असतील तेथे कन्टेन्मेंट झोनसीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले, ग्रामीण भागात आठ हजार खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन असून, चाचण्यांची क्षमता हजारांपर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. ज्या गावांमध्ये २५ पेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे त्या ठिकाणी कन्टेन्मेंट झोन तयार करून मोबाइल व्हॅनद्वारा व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.

तालुकानिहाय नाकाबंदी सुरूपोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गेल्या वर्षाप्रमाणे व्यूहरचना आखून तालुका नाकाबंदी करण्यात येत असल्याचे सांगितले. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलिसांसोबत स्थानिक यंत्रणा जनजागृती करण्यासाठी पुढे येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई